शहरं
Join us  
Trending Stories
1
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
2
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
3
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
4
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
5
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
6
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
7
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
8
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
9
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
10
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
11
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
12
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
13
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
14
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
15
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
16
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
17
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
18
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
19
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
20
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य

राज्यात पावसाची विश्रांती!

By admin | Updated: June 29, 2015 02:15 IST

मागील चार दिवसांपासून पावसाने राज्यात विश्रांती घेतली आहे. अनुकूल स्थिती नसल्याने पावसाने संपूर्ण राज्याकडेच पाठ फिरविल्याचे चित्र आहे.

मुंबई/पुणे : मागील चार दिवसांपासून पावसाने राज्यात विश्रांती घेतली आहे. अनुकूल स्थिती नसल्याने पावसाने संपूर्ण राज्याकडेच पाठ फिरविल्याचे चित्र आहे. समुद्र सपाटीवर दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीलगत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता कमी झाल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे. पुढील काही दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता नाही, असे विभागातर्फे सांगण्यात आले. पावसासाठी कमी दाबाचा पट्टा निर्माण होणे आवश्यक आहे. मात्र, सध्या दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीलगत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता आणखी कमी झाली आहे. मागील २४ तासांत कोकणात सावंतवाडी येथे तर विदर्भात आरमोरी व देसाईगंज येथे तुरळक पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात गेल्या २४ तासांत कुठेच पाऊस झालेला नाही.ऊन-पावसाचा खेळ!> रविवारी रंगलेल्या ऊन-पावसाच्या खेळाने मुंबापुरीतील वातावरण काहीसे आल्हादायक झाले. मागील आठवडाभर मुंबईसह उपनगरात पावसाने धुमाकूळ घातला होता. मात्र गेल्या सोमवारपासून पावसाने विश्रांती घेतली. मंगळवार वगळता पुढील चार दिवस पाऊस रजेवरच राहिला. रविवारी सकाळी मात्र त्याने पुन्हा एकदा आगमनाचे संकेत दिले.> परंतु ढगांची गडद चादर विखुरल्याने मुंबईत दुपारचे काही क्षण वगळता दिवसभर प्रखर सूर्यप्रकाश राहिला. दुपारी लालबाग, परळ, लोअर-परळ अशा काही ठिकाणी पावसाची किंचित सर आली. नंतर मात्र शहरात वातावरण ढगाळ असूनही पाऊस पडला नाही.> महापालिका नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत शहरात ०.३७, पूर्व उपनगरात ०.२३ आणि पश्चिम उपनगरात ०.३६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मालाडमधील चेतना कुंज सोसायटीचा काही भाग पडल्याची घटना घडली. > मरिन प्लाझाजवळ शालीमार इमारतीच्या चौथ्या मजल्यावर दुरुस्तीचे काम सुरू असताना स्लॅब आणि बाल्कनीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. शहरात २, पूर्व उपनगरात १ आणि पश्चिम उपनगरात ५ अशा एकूण ८ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. > शहरात २, पूर्व उपनगरात ४ आणि पश्चिम उपनगरात १ अशा एकूण  ७ ठिकाणी झाडे पडली. पुढील २४ तासांत मुंबई आणि उपनगरात पावसाच्या हलक्या सरी पडतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.