शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विदर्भ, खान्देशात जोरधारा! हतनूर धरणाचे सर्व ४१ दरवाजे उघडले, गोसी खुर्दमधूनही विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2023 09:48 IST

नागपूर जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाचा जोर असून पेंच तोतलाडोह व नवेगाव खैरी धरण ओव्हर फ्लो झाले असून, धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.

जळगाव/नागपूर : पूर्व विदर्भ आणि खान्देशात पावसाचा जोर वाढला असून नद्यांना पूर आला आहे. धरणातून विसर्ग करण्यात येत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील हतनूर तर विदर्भातील गोसी खूर्द, तोतलाडोह, नवेगाव खैरी ही धरणे ओव्हर फ्लो झाली असून त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. 

नागपूर जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाचा जोर असून पेंच तोतलाडोह व नवेगाव खैरी धरण ओव्हर फ्लो झाले असून, धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मध्यम व लघु प्रकल्पातील धरणे जवळपास पूर्ण क्षमतेने भरली आहेत. भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. परिसरातील ग्रामस्थांना स्थलांतरित केले जात आहे. गडचिरोलीतही पाऊस असून, गोसीखुर्दमधून विसर्ग सुरू आहे. गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टी असून संजय सरोवरचे चार दरवाजे उघडले. अमरावतीमधील तीन तालुक्यांत अतिवृष्टी असून अपर वर्धा १०० टक्के भरले आहे.