शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचा तडाखा, ६ ठार

By admin | Updated: May 21, 2014 03:49 IST

गिरी, लातूर, पुणे : कोकण व मराठवाड्यात झालेल्या पावसाने सहा जणांचे बळी घेतले. लांजा आणि राजापूर तालुक्यात तीन तास पडलेल्या पावसाने तीन बळी घेतले तर चौघांना जखमी केले आहे.

रत्नागिरी, लातूर, पुणे : कोकण व मराठवाड्यात झालेल्या पावसाने सहा जणांचे बळी घेतले. लांजा आणि राजापूर तालुक्यात तीन तास पडलेल्या पावसाने तीन बळी घेतले तर चौघांना जखमी केले आहे. मराठवाड्यात लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील हंडरगुळी शिवारात मंगळवारी सायंकाळी ५च्या सुमारास वादळी वार्‍यासह मान्सूनपूर्व पाऊस झाला. वीज पडल्याने शिवशंकर दिगंबर धुप्पे (वय ३०), सोजरबाई साधू पेंढारकर (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील कडगाव येथे वीज पडून १४ बकर्‍या मृत्युमुखी पडल्या. गेल्या आठवड्यात राज्याच्या काही भागांवर असलेले वळवाच्या पावसाचे ढग आज पूर्ण राज्यावर पसरले. पुढील ४८ तासांत कोकण, मध्य महाराष्टÑ, विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. मंगळवारी पहाटे सुरुवातीला हलक्या स्वरूपाचा वाटणारा पाऊस नंतर आक्रमक झाला. या पावसाने लांजा, राजापूर आणि संगमेश्वर तालुक्याला झोडपून काढले. लांजा तालुक्यातील देवधे येथे मुंबई-गोवा महामार्गावर एका चालत्या रिक्षावर वडाचे झाड कोसळून सुरेखा राजाराम कुरूप (६0), उज्ज्वला एकनाथ खामकर (५0, दोघीही रा. देवधे) जागीच ठार झाल्या. दुसर्‍या एका घटनेत लांजा तालुक्यात वेरवली येथे धरणात बुडून अंत होण्याची घटना घडली आहे. राजापूर तालुक्यात पेंडखळे येथील वठारवाडीमधील अक्षय गुरव या युवकाचा जागीच मृत्यू झाला. लांजा तालुक्यात वेरळ येथे दुचाकी अपघातात अभिषेक अशोक लांजेकर (३५) या तरुणाचा मृत्यू झाला तर पन्हळे धरणावरील कामगार हरिदास लिंबाजी धनद्रव्ये (५५) यांचा धरणात बुडून मृत्यू झाला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)