शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

पावसाचा तडाखा, ६ ठार

By admin | Updated: May 21, 2014 03:49 IST

गिरी, लातूर, पुणे : कोकण व मराठवाड्यात झालेल्या पावसाने सहा जणांचे बळी घेतले. लांजा आणि राजापूर तालुक्यात तीन तास पडलेल्या पावसाने तीन बळी घेतले तर चौघांना जखमी केले आहे.

रत्नागिरी, लातूर, पुणे : कोकण व मराठवाड्यात झालेल्या पावसाने सहा जणांचे बळी घेतले. लांजा आणि राजापूर तालुक्यात तीन तास पडलेल्या पावसाने तीन बळी घेतले तर चौघांना जखमी केले आहे. मराठवाड्यात लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील हंडरगुळी शिवारात मंगळवारी सायंकाळी ५च्या सुमारास वादळी वार्‍यासह मान्सूनपूर्व पाऊस झाला. वीज पडल्याने शिवशंकर दिगंबर धुप्पे (वय ३०), सोजरबाई साधू पेंढारकर (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील कडगाव येथे वीज पडून १४ बकर्‍या मृत्युमुखी पडल्या. गेल्या आठवड्यात राज्याच्या काही भागांवर असलेले वळवाच्या पावसाचे ढग आज पूर्ण राज्यावर पसरले. पुढील ४८ तासांत कोकण, मध्य महाराष्टÑ, विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. मंगळवारी पहाटे सुरुवातीला हलक्या स्वरूपाचा वाटणारा पाऊस नंतर आक्रमक झाला. या पावसाने लांजा, राजापूर आणि संगमेश्वर तालुक्याला झोडपून काढले. लांजा तालुक्यातील देवधे येथे मुंबई-गोवा महामार्गावर एका चालत्या रिक्षावर वडाचे झाड कोसळून सुरेखा राजाराम कुरूप (६0), उज्ज्वला एकनाथ खामकर (५0, दोघीही रा. देवधे) जागीच ठार झाल्या. दुसर्‍या एका घटनेत लांजा तालुक्यात वेरवली येथे धरणात बुडून अंत होण्याची घटना घडली आहे. राजापूर तालुक्यात पेंडखळे येथील वठारवाडीमधील अक्षय गुरव या युवकाचा जागीच मृत्यू झाला. लांजा तालुक्यात वेरळ येथे दुचाकी अपघातात अभिषेक अशोक लांजेकर (३५) या तरुणाचा मृत्यू झाला तर पन्हळे धरणावरील कामगार हरिदास लिंबाजी धनद्रव्ये (५५) यांचा धरणात बुडून मृत्यू झाला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)