शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

कोकण वगळता पावसाची विश्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 04:45 IST

राज्यात कोकण वगळता पावसाने विश्रांती घेतली आहे. मुंबईतही पाऊस पूर्णपणे थांबला आहे. २ ते ४ सप्टेंबरदरम्यान कोकण-गोव्यात बºयाच ठिकाणी, मध्य-महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल

पुणे : राज्यात कोकण वगळता पावसाने विश्रांती घेतली आहे. मुंबईतही पाऊस पूर्णपणे थांबला आहे. २ ते ४ सप्टेंबरदरम्यान कोकण-गोव्यात बºयाच ठिकाणी, मध्य-महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.सौराष्ट्र व लगतच्या गुजरात प्रदेशाच्या उत्तरेकडील भागावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र आता कच्छ व लगतच्या दक्षिण पाकिस्तान आणि ईशान्य अरबी समुद्राच्या भागावर आहे़ कर्नाटक ते केरळ किनारपट्टीवर असलेले द्रोणीय क्षेत्र आता विरून गेले आहे़ त्यामुळे गेले तीन दिवस धुमशान कोसळलेल्या पावसाने आता विश्रांती घेतली आहे़ गुरुवारी दिवसभरात कोकणात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला़ मध्य महाराष्ट्रात घाटमाथ्यावरही जोरदार सरी पडल्या.पावसाने विश्रांती घेतली असली तरी मुंबईत दिवसभर चांगलेच ऊन पडले होते़ दोन दिवस असलेला हवेतील गारवा अचानक बंद झाल्याने मुंबईकर उन्हाने काही प्रमाणात हैराण झाले़ पाऊस थांबल्याने गौरी-गणपतीचे विसर्जन मात्र उत्साहात झाले़