शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
5
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
6
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
7
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
8
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
9
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
10
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
11
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
12
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
13
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
14
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
15
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
16
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
17
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
18
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
19
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
20
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी

जिल्ह्यात पावसाचा मुक्काम वाढला

By admin | Updated: April 28, 2015 00:19 IST

शेतकरी धास्तावला : जिल्ह्यातील स्थिती; अपवाद केवळ फेब्रुवारी महिन्याचा!

नरेंद्र रानडे - सांगली -ग्लोबल वॉर्मिंगमुळे मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यातील बहुतांशी भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे प्रमाण वाढत चालले आहे. हवामान खात्याने केलेल्या नोंदीनुसार मागील दहा महिन्यांचा आढावा घेतला, तर जिल्ह्यात कोठे ना कोठे वरुणराजाचा मुक्काम हमखास आहेच. अपवाद केवळ फेब्रुवारी महिन्याचा. अवेळी पडणाऱ्या या पावसाने शेतकरी मात्र धास्तावला असून, त्यांच्या पिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. भारतीय ऋतुचक्रानुसार जून ते आॅक्टोबर हे पावसाचेच महिने आहेत. २०१४ मध्ये या पाच महिन्यात जिल्ह्यात सरासरी ५१०.६ मि.मी. इतका पाऊस झाला, तर नोव्हेंबर ते मार्च या कालावधित अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. वरुणराजाच्या वाढत्या मुक्कामाने शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे. त्याने कष्टाने लावलेली पिके डोळ्यादेखत जमीनदोस्त होताना त्याला पाहावी लागत आहेत. हवामान खात्याच्या नोंदीनुसार जिल्ह्याची स्थिती पाहिल्यास नोव्हेंबर महिन्यात सरासरी ४७.६ मि.मी., डिसेंबरमध्ये २८.३ मि.मी., जानेवारीत ६.३ मि.मी., तर मार्चमध्ये ६५.७ मि.मी. इतका पाऊस पडला आहे. अवकाळी पावसाने मिरज, खानापूर, आटपाडी, वाळवा, शिराळा, तासगाव या तालुक्यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शासनस्तरावरून पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले असले, तरी अद्यापपर्यंत त्यांच्या हातात शासकीय मदत मिळालेली नाही. बदलत्या शहरीकरणाच्या संकल्पनेमुळे वाहने आणि अन्य प्रकारांनी वातावरणातील प्रदूषणात भर पडत आहे. परिणामी तापमानात वाढ होत आहे. साहजिकच ऋतुचक्र बदलत चालले आहे. हे बदल केवळ भारतातच नव्हे, तर जगातदेखील होत आहेत. याला प्रतिबंध घालणे हे आपल्यासमोरील एक आव्हानच आहे. - सुभाष आर्वे, हवामानतज्ज्ञ, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, पुणे.भविष्यात अवकाळी पावसाने होणारे नुकसान कमी होईल, यासाठी शेतकऱ्यांनी पारंपरिक पीक पध्दतीत बदल केला पाहिजे. संभाव्य धोका लक्षात घेऊन काही शेती बंदिस्त पध्दतीने केली पाहिजे. विमा उतरविलेल्या पिकांची नुकसानभरपाई शासनाने वैयक्तिक नुकसान गृहीत धरुन दिली पाहिजे. - संजय कोले, प्रदेश संघटक, शेतकरी संघटना युवा आघाडी.जून ते आॅक्टोबरमधील तालुकानिहाय आकडेसरासरी पाऊस (मि.मी.मध्ये) मिरज४९२.०तासगाव४७६.०क. महांकाळ४५७.०जत४५७.७विटा४९४.९आटपाडी३५५.०पलूस४७६.०कडेगाव४४७.०वाळवा५६५.८शिराळा८८४.७ अवकाळी पाऊस (मि.मी.मध्ये) मिरज२७७.७तासगाव७०५.०क. महांकाळ२३९.७जत२९१.४विटा६०३.०आटपाडी२०७.०पलूस४०८.०कडेगाव४५६.५वाळवा७०८.४शिराळा३९१.०