शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

जिल्ह्यात पावसाचा मुक्काम वाढला

By admin | Updated: April 28, 2015 00:19 IST

शेतकरी धास्तावला : जिल्ह्यातील स्थिती; अपवाद केवळ फेब्रुवारी महिन्याचा!

नरेंद्र रानडे - सांगली -ग्लोबल वॉर्मिंगमुळे मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यातील बहुतांशी भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे प्रमाण वाढत चालले आहे. हवामान खात्याने केलेल्या नोंदीनुसार मागील दहा महिन्यांचा आढावा घेतला, तर जिल्ह्यात कोठे ना कोठे वरुणराजाचा मुक्काम हमखास आहेच. अपवाद केवळ फेब्रुवारी महिन्याचा. अवेळी पडणाऱ्या या पावसाने शेतकरी मात्र धास्तावला असून, त्यांच्या पिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. भारतीय ऋतुचक्रानुसार जून ते आॅक्टोबर हे पावसाचेच महिने आहेत. २०१४ मध्ये या पाच महिन्यात जिल्ह्यात सरासरी ५१०.६ मि.मी. इतका पाऊस झाला, तर नोव्हेंबर ते मार्च या कालावधित अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. वरुणराजाच्या वाढत्या मुक्कामाने शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे. त्याने कष्टाने लावलेली पिके डोळ्यादेखत जमीनदोस्त होताना त्याला पाहावी लागत आहेत. हवामान खात्याच्या नोंदीनुसार जिल्ह्याची स्थिती पाहिल्यास नोव्हेंबर महिन्यात सरासरी ४७.६ मि.मी., डिसेंबरमध्ये २८.३ मि.मी., जानेवारीत ६.३ मि.मी., तर मार्चमध्ये ६५.७ मि.मी. इतका पाऊस पडला आहे. अवकाळी पावसाने मिरज, खानापूर, आटपाडी, वाळवा, शिराळा, तासगाव या तालुक्यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शासनस्तरावरून पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले असले, तरी अद्यापपर्यंत त्यांच्या हातात शासकीय मदत मिळालेली नाही. बदलत्या शहरीकरणाच्या संकल्पनेमुळे वाहने आणि अन्य प्रकारांनी वातावरणातील प्रदूषणात भर पडत आहे. परिणामी तापमानात वाढ होत आहे. साहजिकच ऋतुचक्र बदलत चालले आहे. हे बदल केवळ भारतातच नव्हे, तर जगातदेखील होत आहेत. याला प्रतिबंध घालणे हे आपल्यासमोरील एक आव्हानच आहे. - सुभाष आर्वे, हवामानतज्ज्ञ, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, पुणे.भविष्यात अवकाळी पावसाने होणारे नुकसान कमी होईल, यासाठी शेतकऱ्यांनी पारंपरिक पीक पध्दतीत बदल केला पाहिजे. संभाव्य धोका लक्षात घेऊन काही शेती बंदिस्त पध्दतीने केली पाहिजे. विमा उतरविलेल्या पिकांची नुकसानभरपाई शासनाने वैयक्तिक नुकसान गृहीत धरुन दिली पाहिजे. - संजय कोले, प्रदेश संघटक, शेतकरी संघटना युवा आघाडी.जून ते आॅक्टोबरमधील तालुकानिहाय आकडेसरासरी पाऊस (मि.मी.मध्ये) मिरज४९२.०तासगाव४७६.०क. महांकाळ४५७.०जत४५७.७विटा४९४.९आटपाडी३५५.०पलूस४७६.०कडेगाव४४७.०वाळवा५६५.८शिराळा८८४.७ अवकाळी पाऊस (मि.मी.मध्ये) मिरज२७७.७तासगाव७०५.०क. महांकाळ२३९.७जत२९१.४विटा६०३.०आटपाडी२०७.०पलूस४०८.०कडेगाव४५६.५वाळवा७०८.४शिराळा३९१.०