शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईसह राज्यभरात पावसाची पुन्हा दमदार हजेरी; उन्हाच्या झळांनी त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 08:54 IST

 मुंबईसह राज्यभरात पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे.

ठळक मुद्दे मुंबईसह राज्यभरात पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे.मंगळवारी मध्यरात्रीपासून राज्याच्या अनेक भागात विजाच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाच्या जोरदार पुनरागमनामुळे बळीराजा काहीप्रमाणात सुखावला असून, उन्हाच्या झळांनी त्रस्त झालेल्या नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.

मुंबई, दि. 13-  मुंबईसह राज्यभरात पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून राज्याच्या अनेक भागात विजाच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाच्या जोरदार पुनरागमनामुळे बळीराजा काहीप्रमाणात सुखावला असून, उन्हाच्या झळांनी त्रस्त झालेल्या नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाने कमबॅक केलं आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरात मध्यरात्रीपासून विजांच्या कडकडासह मुसळधार पाऊस सुरू आहे. तर अलिबाग, पेण, पनवेल, कर्जतमध्ये ही पावसाच्या सरी बरसत आहेत.पालघरमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस पडतो आहे. कोल्हापूर, नाशिक आणि लातुरातही मुसधळधार पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. बीडमध्येही काल मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. पावसानं शहरातील सर्व नाले ओसंडून वाहत आहेत. मुंबईमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस असला तरी त्याचा परिणाम रेल्वे सेवेवर झालेला नाही. तिन्ही मार्गावरील लोकल सेवा सुरळीत सुरू असल्याचं समजतं आहे. 

दुसरीकडे उरणमध्ये पावसाची रिपरिप पाहायला मिळते आहे तर विजांचा कडकडाट मात्र कायम आहे.  तर मुसळधार पावसाने नवी मुंबईकरांनाही काही प्रमाणात दिलासा दिला आहे. विजांच्या कडकडासह मुसळधार पाऊस नवी मुंबईमध्ये सुरू आहे. वसई-विरार-मीरा भाईंदरमध्ये पावसाची रिपरिप सुरू असून रायगडमध्ये काही भागात मुसळधार पाऊस पडतो आहे. पुढील ३ ते ४ तास मुंबईसह कोकणात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडले, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान विभागाकडून मिळते आहे.

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईकरांना उन्हाची झळ सोसावी लागत होती.पण मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावासानं हवेत गारवा निर्माण झाला आहे. मध्यरात्रीपासून मुंबईत तुफान पावसानं हजेरी लावली. तब्बल 1 ते दीड तास मुंबईत विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला. अजूनही मुंबईतल्या अनेक उपनगरांत पावसाची रिपरिप सुरुच आहे. त्यामुळे मुंबई गारेगार झालेली पाहायला मिळते आहे. नवी मुंबईतही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसतो आहे. मध्यरात्री 2 च्या सुमारास विजांच्या कडकडांटासह पावसाला सुरुवात झाल्यानंतर कामोठे आणि आसपासच्या परिसरातील वीजपुरवठा खंडीत करावा लागला होता. 

नाशिकमध्येही काल रात्री विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसानं हजेरी लावली. पावसाचा जोर पाहता शहरातील अनेक भागांमधला वीजपुरवठा खंडीत झाला आहे. गेल्या दोन्ही वेळेस मुसळधार पावसामुळे नाशकात पूरपरिस्थिती ओढवली होती. त्यामुळे आता तिसऱ्यांदाही पावसाचा जोर पाहता नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. 

टॅग्स :Mumbaiमुंबई