शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
3
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
4
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
5
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
6
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
7
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
8
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
9
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
10
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
11
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
12
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
13
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
14
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
15
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
16
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
17
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
18
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
19
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
20
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी

राज्यातील रेल्वे स्टेशनही शहरांप्रमाणेच अस्वच्छ

By admin | Updated: May 18, 2017 04:26 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाडक्या ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील बहुतांश शहरे गलिच्छ ठरल्यानंतर, बुधवारी देशातील

- लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाडक्या ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील बहुतांश शहरे गलिच्छ ठरल्यानंतर, बुधवारी देशातील प्रमुख रेल्वे स्टेशनची स्वच्छता क्रमवारी जाहीर झाली आणि राज्यातील शहरांप्रमाणे रेल्वे स्टेशनही स्वच्छतेऐवजी अस्वच्छतेत पुढे असल्याचे दिसून आले.‘क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडिया’ या त्रयस्थ संस्थेकडून करून घेण्यात आलेल्या देशातील रेल्वे स्टेशनच्या स्वच्छता सर्वेक्षणाचा अहवाल व क्रमवारी रेल्वेमंत्री सुरेश प्रभाकर प्रभू यांनी प्रसिद्ध केला, त्याच वेळी प्रभू यांनी ‘स्वच्छ रेल पोर्टल’चेही उद््घाटन केले.‘ए १’ श्रेणीतील ७५ व ‘ए’ श्रेणीतील ३३२ अशा एकूण ४०७ प्रमुख रेल्वे स्थानकांचे हे स्वच्छता सर्वेक्षण केले गेले होते. या दोन्ही श्रेणींमध्ये स्वच्छतेच्या दृष्टीने पहिले १० क्रमांक पटकाविणाऱ्या स्टेशनमध्ये महाराष्ट्रातील तीन स्थानकांचा समावेश आहे. ‘ए-१’ श्रेणीमध्ये पुणे नवव्या तर ‘ए’ श्रेणीमध्ये अहमदनगर स्टेशन क्रमवारीत तिसऱ्या आणि बडनेरा सहाव्या क्रमांकावर आले. संपूर्ण देशाचा श्रेणीनिरपेक्ष विचार केला, तर पुण्याला १९ वा तर बडनेराचा ११ क्रमांक लागला. सर्वात महत्वाचे म्हणजे प्रवासी व ये-जा करणाऱ्या गाड्यांच्या दृष्टीने देशातील सर्वात गजबजलेली स्टेशन अशी ओळख असलेल्या मुंबईतील मुंबई सेंट्रल, छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीएम) ही स्टेशन स्वच्छतेच्या क्रमवारीत पार तळाला गेली. मुंबई सेंट्रलला ८६ वा, ‘सीएसटी’ला १५३ वा आणि ‘एलटीएम’ला २७८ वा क्रमांक मिळाला. या सर्वेक्षणात राज्यातील एकूण ३४ रेल्वे स्टेशनमधील स्वच्छतेचा लेखाजोखा घेतला गेला. यापैकी क्रमवारीत चौथे आलेले अहमदनगर सर्वात वरच्या स्थानवर तर नगरसूल ३९३ व्या स्थानावर आले.राज्यातील रेल्वे स्टेशनची क्रमवारी...अहमदनगर (४), बडनोरा (११), पुणे (१७), अमरावती (२२), बल्लारशा (३३), चंद्रपूर (३८), भुसावळ (४२), लोणावळा (४७), अकोला (६४), सोलापूर (६७), शिर्डी (७३), लातूर (७७), कोपरगाव (७८), मुंबई सेंट्रल (८६), परभणी (११५), गोंदिया (११६), कोल्हापूर (१४१), मिरज (१४६), मुंबई सीएसटी (१५३), पनवेल (१५६), जळगाव (१६०), नांदेड (१६१), नाशिक रोड (१६९), औरंगाबाद (१७९), जालना (१८६), मनमाड (२२७), नागपूर (२३७), चाळीसगाव (२४०), शेगाव (२४९), लोकमान्य टिळक टर्मिनस (२७८), कल्याण (३०२), ठाणे (३०६), दादर (३३०) आणि नगरसूल (३९३).मनमाड-जळगाव दरम्यान तिसऱ्या रेल्वेलाइनला मंजुरी...

वाहतुकीच्या दृष्टीने देशातील सर्वात गजबजलेल्या रेल्वेमार्गांपैकी एक असलेल्या मनमाड ते जळगाव दरम्यान तिसरी रेल्वेलाइन टाकण्याच्या कामास केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक बाबीविषयक समितीने बुधवारी मंजुरी दिली.या निर्णयाची माहिती देताना ऊजामंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, १६० किमी लांबीच्या या रेल्वेलाइनसाठी १,१९९ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, हे काम पाच वर्षांत पूर्ण केले जाईल.मुंबई-दिल्ली व मुंबई-कोलकाता या मार्गावर मनमाड-जळगाव हा प्रवासी व मालवाहतुकीच्या दृष्टीने खूप गजबजलेला रूट आहे. अतिरिक्त रेल्वेलाइनमुळे या दोन्ही मार्गांवरील वाहतूक अधिक सुलभ होईल.