शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

लोकल खोळंब्याविषयी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू मात्र गप्प!

By admin | Updated: November 19, 2014 05:11 IST

गेल्या काही महिन्यांपासून मध्य रेल्वेचा काहीना काही कारणास्तव बोऱ्या वाजत असून त्याचा लाखो प्रवाशांना मनस्ताप होत आहे. हा त्रास दूर करण्याचे आश्वासन

सुशांत मोरे, मुंबईगेल्या काही महिन्यांपासून मध्य रेल्वेचा काहीना काही कारणास्तव बोऱ्या वाजत असून त्याचा लाखो प्रवाशांना मनस्ताप होत आहे. हा त्रास दूर करण्याचे आश्वासन देऊनही तो दूर होताना दिसत नाही. याबाबत नवे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनाही गांभीर्य नसल्याचेच दिसून आले आहे. मुंबईच्या उपनगरीय लोकलमधून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांची मनस्तापातून कधी सुटका होईल, याविषयी रेल्वेमंत्र्यांनी बोलण्यास नकार दिला. मात्र सातत्याने विचारूनही त्यांनी अन्य विषयावरच बोलणे पसंत केले. मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावरून दररोज ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र या प्रवाशांना दररोज अनेक कारणाने मनस्तापाला सामोरे जावे लागते. मध्य रेल्वेच्या मेन लाइनचा वक्तशीरपणा बिघडल्याचे दिसून येते. ओव्हरहेड वायर आणि सिग्नल यंत्रणेत बिघाड होणे, रुळांत आणि लोकलमध्ये बिघाड होणे अशा अनेक कारणांमुळे सध्या मध्य रेल्वे प्रवाशांचा प्रवास रखडतरखडत सुरू आहे. ही समस्या सोडवण्यासाठी मध्य रेल्वेने रविवारबरोबरच शनिवारीही मेगाब्लॉक घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कामकाजादिवशी प्रवाशांना डबल मनस्ताप होतो. निधीअभावी देखभाल आणि दुरुस्तीचा प्रश्न सतावत असल्याचेही रेल्वेकडून सांगण्यात आले. म्हणूनच ९0 कोटी रुपयांची मागणी नुकतीच रेल्वेकडून रेल्वेमंत्रालयाकडे करण्यात आली होती. त्यावर ६0 कोटी रुपये देण्यावर रेल्वेकडून विचार सुरू आहे. याबाबत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी आपण रेल्वेसाठी पोर्टल तयार करण्यावर भर देत असल्याचे सांगितले. मात्र सध्या मुंबईतील लोकल सेवेला तांत्रिक समस्या सतावत असून त्या नक्की कधी सुटतील आणि प्रवाशांना दिलासा मिळेल का, तसेच तयार करण्यात येणारे पोर्टल कुणासाठी, असे विचारूनही फक्त पोर्टलविषयीच बोलत ते संपूर्ण रेल्वेसाठी असणार असल्याचे सांगितले. मुंबईतील उपनगरीय लोकल प्रवाशांना होणाऱ्या मनस्तापाबद्दल पुन्हा एकदा विचारले असता, मी बैठकीत आहे, असे सांगून त्यांनी फोन ठेवून दिला.