शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

गणेशोत्सवासाठी रेल्वे फुल्ल

By admin | Updated: May 11, 2017 03:11 IST

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची रेल्वे प्रशासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जातात. मात्र, तिकीट बुकिंग एजंटपुढे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची रेल्वे प्रशासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जातात. मात्र, तिकीट बुकिंग एजंटपुढे रेल्वे प्रशासन हतबल ठरल्याचे दिसून येत आहे. आगामी गणेशोत्सव काळातील ट्रेनचे बुकिंग अवघ्या काही मिनिटांत फुल्ल झाल्याने प्रवासी हतबल झाले आहेत. शिवाय वेटिंग लिस्टही ४०० पर्यंत पोहोचल्याने मनस्तापात आणखीच भर पडली आहे. परिणामी, कोकण रेल्वे प्रवासी सध्या विशेष गाड्यांच्या प्रतीक्षेत आहेत.गणेशोत्सव काळातील ट्रेनच्या आरक्षणासाठी नुकतीच सुरुवात झाली आहे. कोकणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी चाकरमानी कोकणाकडे मोठ्या संख्येने जातो. याचा फायदा घेत एजंट तिकीट बुक करतात. परिणामी, कोकण कन्या, मांडवी, राज्यराणी आणि जनशताब्दी एक्स्प्रेस या सर्व गाड्या फुल्ल झाल्या आहेत, शिवाय ट्रेनची वेटिंग लिस्ट ही ४०० पर्यंत पोहोचली आहे. ही स्थिती कायम राहिल्यास वेटिंग लिस्टही बंद होण्याची शक्यता आहे, तर गणेशोत्सव काळातील ट्रेनची बुकिंग नियमांनुसारच होत असल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हणणे आहे.‘विशेष ट्रेन’वर अवलंबून सीएसटी ते कल्याण-कर्जत आणि चर्चगेट ते बोरीवल पट्ट्यात कोकणातील रहिवासी वास्तव्य करतात. रेल्वेचा प्रवास आरामदायक आणि खिशाला परवडणारा असल्यामुळे, चाकरमानी रस्ते वाहतुकीपेक्षा कोकण रेल्वेला प्राधान्य देतात. कोकणात जाणाऱ्या ट्रेन सद्यस्थितीत फुल्ल झाल्यामुळे प्रवाशांना कोकण रेल्वेच्या गणपती विशेष ट्रेनवर अवलंबून राहावे लागणार आहे.