शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

रेल्वेमुळेच देशाचा विकास शक्य!

By admin | Updated: May 23, 2017 03:29 IST

रेल्वेमुळेच देशाचा विकास शक्य आहे, असे सांगत ‘रेल बढे, देश बढे’ असा उद्घोष रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुुंबई : रेल्वेमुळेच देशाचा विकास शक्य आहे, असे सांगत ‘रेल बढे, देश बढे’ असा उद्घोष रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केला. सोमवारी दादर येथे मध्य आणि हार्बर रेल्वेवरील स्थानकांतील प्रवासी सेवांच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी देशातील सर्वात जलद ‘तेजस’ एक्स्प्रेसला (मुंबई-करमळी) त्यांनी हिरवा झेंडा दाखवला.देशातील ४० हजारांपेक्षा जास्त रेल्वे डब्यांत सुरक्षिततेच्या दृष्टीने काही त्रुटी आहेत. तीन वर्षांत ही सगळी कामे उरकणे शक्य झाले नाही. आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रवासी सुरक्षिततेच्या दृष्टीने परिपूर्ण असे ४० हजार नवे डबे सेवेत आणणार आहे. प्रवासी सुरक्षिततेसाठी एक लाख कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे आहे. शंभराहून अधिक स्थानकांतील वाय-फाय सुविधा दोन वर्षांत ४०० स्थानकांमध्ये देण्यात येणार आहे. तसेच दिव्यांगासाठी १५० शौचालये बांधण्यात येणार आहेत, अशी माहितीही प्रभू यांनी दिली.नेत्यांची मंदियाळी : कार्यक्रमाला खासदार अरविंद सांवत, गोपाळ शेट्टी, राहुल शेवाळे, हुसैन दलवाई, किरीट सौमय्या, डॉ. श्रीकांत शिंदे आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे उपस्थित होते. त्याचबरोबर, ‘मरे’चे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा, ‘परे’चे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता, आरसीएफ महाव्यवस्थापक आर.पी.नि. बरिया, एमआरव्हीसीचे सीएमडी प्रभात सहाय, आयआरसीटीसीचे सीएमडी ए. के. मनोचा उपस्थित होते.३५ मिनिटांचा लेटमार्क‘तेजस’ एक्स्प्रेसला पहिल्याच दिवशी ३५ मिनिटांचा लेटमार्क लागला. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या विमानाला विलंब झाल्यामुळे त्यांना दादर येथे पोहोचण्यास उशीर झाला. मात्र, कार्यक्रमस्थळी पोहोचताच रेल्वेमंत्र्यांनी उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत, ‘तेजस’ला हिरवा झेंडा दाखवला.‘महाराज’ म्हणा : कर्नाटक येथील ‘जय महाराष्ट्र’ वादाचा दाखला देत, खासदार अरविंद सावंत यांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मराठी शिका आणि मराठीतच बोला, असा सज्जड दम दिला. त्याचबरोबर, सूत्रसंचालन करणाऱ्याला छत्रपती शिवाजी ‘महाराज’ टर्मिनस असा उल्लेख करा, अशी आठवण केली. या वेळी रेल्वेने डबलडेकर ट्रेनबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, ‘तेजस’ला कणकवली येथे थांबा देण्याची मागणी सावंत यांनी या वेळी केली.