शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

रेल्वेमुळेच देशाचा विकास शक्य!

By admin | Updated: May 23, 2017 03:29 IST

रेल्वेमुळेच देशाचा विकास शक्य आहे, असे सांगत ‘रेल बढे, देश बढे’ असा उद्घोष रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुुंबई : रेल्वेमुळेच देशाचा विकास शक्य आहे, असे सांगत ‘रेल बढे, देश बढे’ असा उद्घोष रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केला. सोमवारी दादर येथे मध्य आणि हार्बर रेल्वेवरील स्थानकांतील प्रवासी सेवांच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी देशातील सर्वात जलद ‘तेजस’ एक्स्प्रेसला (मुंबई-करमळी) त्यांनी हिरवा झेंडा दाखवला.देशातील ४० हजारांपेक्षा जास्त रेल्वे डब्यांत सुरक्षिततेच्या दृष्टीने काही त्रुटी आहेत. तीन वर्षांत ही सगळी कामे उरकणे शक्य झाले नाही. आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रवासी सुरक्षिततेच्या दृष्टीने परिपूर्ण असे ४० हजार नवे डबे सेवेत आणणार आहे. प्रवासी सुरक्षिततेसाठी एक लाख कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे आहे. शंभराहून अधिक स्थानकांतील वाय-फाय सुविधा दोन वर्षांत ४०० स्थानकांमध्ये देण्यात येणार आहे. तसेच दिव्यांगासाठी १५० शौचालये बांधण्यात येणार आहेत, अशी माहितीही प्रभू यांनी दिली.नेत्यांची मंदियाळी : कार्यक्रमाला खासदार अरविंद सांवत, गोपाळ शेट्टी, राहुल शेवाळे, हुसैन दलवाई, किरीट सौमय्या, डॉ. श्रीकांत शिंदे आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे उपस्थित होते. त्याचबरोबर, ‘मरे’चे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा, ‘परे’चे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता, आरसीएफ महाव्यवस्थापक आर.पी.नि. बरिया, एमआरव्हीसीचे सीएमडी प्रभात सहाय, आयआरसीटीसीचे सीएमडी ए. के. मनोचा उपस्थित होते.३५ मिनिटांचा लेटमार्क‘तेजस’ एक्स्प्रेसला पहिल्याच दिवशी ३५ मिनिटांचा लेटमार्क लागला. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या विमानाला विलंब झाल्यामुळे त्यांना दादर येथे पोहोचण्यास उशीर झाला. मात्र, कार्यक्रमस्थळी पोहोचताच रेल्वेमंत्र्यांनी उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत, ‘तेजस’ला हिरवा झेंडा दाखवला.‘महाराज’ म्हणा : कर्नाटक येथील ‘जय महाराष्ट्र’ वादाचा दाखला देत, खासदार अरविंद सावंत यांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मराठी शिका आणि मराठीतच बोला, असा सज्जड दम दिला. त्याचबरोबर, सूत्रसंचालन करणाऱ्याला छत्रपती शिवाजी ‘महाराज’ टर्मिनस असा उल्लेख करा, अशी आठवण केली. या वेळी रेल्वेने डबलडेकर ट्रेनबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, ‘तेजस’ला कणकवली येथे थांबा देण्याची मागणी सावंत यांनी या वेळी केली.