शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

रेल्वे ठप्प करणारे अटकेत

By admin | Updated: July 2, 2016 05:08 IST

पश्चिम रेल्वेच्या माहीम येथील वीज उपकेंद्रातून बॅटऱ्या चोरून तीन तास लोकल ठप्प करणाऱ्या तीन चोरांना अटक करण्यात आली

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या माहीम येथील वीज उपकेंद्रातून बॅटऱ्या चोरून तीन तास लोकल ठप्प करणाऱ्या तीन चोरांना अटक करण्यात आली आहे. या चोरांनी पश्चिम रेल्वेबरोबरच मध्य आणि कोकण रेल्वे मार्गांवरही बॅटऱ्यांची चोरी केल्याचे आरपीएफच्या (रेल्वे सुरक्षा दल) तपासात उघडकीस आले. यातील मुख्य आरोपी हा रेल्वेचाच जुना कंत्राटदार असल्याची माहिती पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाकडून देण्यात आली. १९ जूनच्या मध्यरात्री पश्चिम रेल्वेच्या माहीम येथील वीज उपकेंद्रातून १८ बॅटऱ्यांची चोरी करण्यात आली होती. त्यामुळे २0 जून रोजी सकाळपासून पश्चिम रेल्वेची संपूर्ण लोकल सेवा ठप्प झाली आणि ७0 फेऱ्या रद्द करण्याबरोबरच अनेक लोकल फेऱ्यांना लेटमार्क लागला होता. या घटनेनंतर रेल्वे मालत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. रेल्वे सुरक्षा दलाकडून या घटनेची गंभीर दखल घेत बॅटरी चोरांचा शोध घेण्यात येत होता. पोलिसांना मिळालेल्या माहितीनंतर, नालासोपारा पूर्व येथून आसिक नावाच्या व्यक्तीला पकडण्यात आले. त्याची सखोल चौकशी केल्यानंतर अनुप पासवान या त्याच्या सहकाऱ्याचीही माहिती मिळाली आणि त्यालाही ताब्यात घेण्यात आले. या दोघांनी बॅटऱ्या वसई येथील अब्बू हरेरा याच्या भंगारात विकल्या, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आनंद झा यांनी दिली. या तिघांनाही ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून आणखी माहिती मिळविण्यात येत आहे. त्यापूर्वी १ जून रोजीच्या मध्यरात्रीही त्याच ठिकाणी पश्चिम रेल्वेबरोबरच मध्य रेल्वेच्या वीज उपकेंद्रातून मिळून एकूण ११0 बॅटऱ्यांची त्यांनी चोरी केली होती. आसिक हा सराईत गुन्हेगार असून, त्याने आणि सहकाऱ्यांनी पश्चिम रेल्वेबरोबरच मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावर अनेक बॅटऱ्यांची चोरी केल्याचे झा म्हणाले. आसिक हा रेल्वेचा जुना कंत्राटदार आहे. या प्रकरणी फिरोज आणि कद्दू नावाच्या आणखी दोन आरोपींचा शोध सुरू आहे.>१ जूनच्या मध्यरात्री माहीम येथील वीज उपकेंद्राचा टाळा तोडून ११0 बॅटऱ्या चोरल्या आणि त्या सर्व बॅटऱ्या टेम्पोत टाकून पळवल्या. त्यांची भंगारात २४ हजार रुपयांना विक्री केली. १९ जूनच्या मध्यरात्री याच केंद्रातून आणि त्याच्या बाजूच्याच असलेल्या मध्य रेल्वेच्या वीज केंद्रातून एकूण १८ बॅटऱ्या चोरल्या. त्यांची १८ हजार रुपयांना भंगारात विक्री केली. >सर्वांत जास्त चोऱ्या पावसाळ्यातरेल्वे मालमत्तांच्या सर्वांत जास्त चोऱ्या या पावसाळ्यात होतात. यात बॅटरी, केबलच्या चोऱ्या अधिक होत असल्याची माहिती देण्यात आली. मागच्या १० दिवसांत आणखी दोन बॅटऱ्यांची चोरी झाली आहे. पावसाळ्यात ट्रॅकवर रेल्वे कर्मचारी कमी प्रमाणात जातात. हीच बाब हेरून बॅटऱ्या चोरण्यात येतात, असे झा यांनी सांगितले.पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात ४0४ चोरांना अटकपश्चिम रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे मार्गांवर २0१४पासून आतापर्यंत रेल्वेची मालमत्ता चोरणाऱ्या ४0४ चोरांना अटक करण्यात आली आहे. यात २0१४मध्ये १४७, २0१५मध्ये १८९ आणि २0१६मध्ये ६८ चोरांना अटक करण्यात आल्याचे सांगितले. तर १४ लाख ६१ हजारांची मालमत्ता चोरीला गेली आहे.