शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

रेल्वे ठप्प करणारे अटकेत

By admin | Updated: July 2, 2016 05:08 IST

पश्चिम रेल्वेच्या माहीम येथील वीज उपकेंद्रातून बॅटऱ्या चोरून तीन तास लोकल ठप्प करणाऱ्या तीन चोरांना अटक करण्यात आली

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या माहीम येथील वीज उपकेंद्रातून बॅटऱ्या चोरून तीन तास लोकल ठप्प करणाऱ्या तीन चोरांना अटक करण्यात आली आहे. या चोरांनी पश्चिम रेल्वेबरोबरच मध्य आणि कोकण रेल्वे मार्गांवरही बॅटऱ्यांची चोरी केल्याचे आरपीएफच्या (रेल्वे सुरक्षा दल) तपासात उघडकीस आले. यातील मुख्य आरोपी हा रेल्वेचाच जुना कंत्राटदार असल्याची माहिती पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाकडून देण्यात आली. १९ जूनच्या मध्यरात्री पश्चिम रेल्वेच्या माहीम येथील वीज उपकेंद्रातून १८ बॅटऱ्यांची चोरी करण्यात आली होती. त्यामुळे २0 जून रोजी सकाळपासून पश्चिम रेल्वेची संपूर्ण लोकल सेवा ठप्प झाली आणि ७0 फेऱ्या रद्द करण्याबरोबरच अनेक लोकल फेऱ्यांना लेटमार्क लागला होता. या घटनेनंतर रेल्वे मालत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. रेल्वे सुरक्षा दलाकडून या घटनेची गंभीर दखल घेत बॅटरी चोरांचा शोध घेण्यात येत होता. पोलिसांना मिळालेल्या माहितीनंतर, नालासोपारा पूर्व येथून आसिक नावाच्या व्यक्तीला पकडण्यात आले. त्याची सखोल चौकशी केल्यानंतर अनुप पासवान या त्याच्या सहकाऱ्याचीही माहिती मिळाली आणि त्यालाही ताब्यात घेण्यात आले. या दोघांनी बॅटऱ्या वसई येथील अब्बू हरेरा याच्या भंगारात विकल्या, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आनंद झा यांनी दिली. या तिघांनाही ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून आणखी माहिती मिळविण्यात येत आहे. त्यापूर्वी १ जून रोजीच्या मध्यरात्रीही त्याच ठिकाणी पश्चिम रेल्वेबरोबरच मध्य रेल्वेच्या वीज उपकेंद्रातून मिळून एकूण ११0 बॅटऱ्यांची त्यांनी चोरी केली होती. आसिक हा सराईत गुन्हेगार असून, त्याने आणि सहकाऱ्यांनी पश्चिम रेल्वेबरोबरच मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावर अनेक बॅटऱ्यांची चोरी केल्याचे झा म्हणाले. आसिक हा रेल्वेचा जुना कंत्राटदार आहे. या प्रकरणी फिरोज आणि कद्दू नावाच्या आणखी दोन आरोपींचा शोध सुरू आहे.>१ जूनच्या मध्यरात्री माहीम येथील वीज उपकेंद्राचा टाळा तोडून ११0 बॅटऱ्या चोरल्या आणि त्या सर्व बॅटऱ्या टेम्पोत टाकून पळवल्या. त्यांची भंगारात २४ हजार रुपयांना विक्री केली. १९ जूनच्या मध्यरात्री याच केंद्रातून आणि त्याच्या बाजूच्याच असलेल्या मध्य रेल्वेच्या वीज केंद्रातून एकूण १८ बॅटऱ्या चोरल्या. त्यांची १८ हजार रुपयांना भंगारात विक्री केली. >सर्वांत जास्त चोऱ्या पावसाळ्यातरेल्वे मालमत्तांच्या सर्वांत जास्त चोऱ्या या पावसाळ्यात होतात. यात बॅटरी, केबलच्या चोऱ्या अधिक होत असल्याची माहिती देण्यात आली. मागच्या १० दिवसांत आणखी दोन बॅटऱ्यांची चोरी झाली आहे. पावसाळ्यात ट्रॅकवर रेल्वे कर्मचारी कमी प्रमाणात जातात. हीच बाब हेरून बॅटऱ्या चोरण्यात येतात, असे झा यांनी सांगितले.पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात ४0४ चोरांना अटकपश्चिम रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे मार्गांवर २0१४पासून आतापर्यंत रेल्वेची मालमत्ता चोरणाऱ्या ४0४ चोरांना अटक करण्यात आली आहे. यात २0१४मध्ये १४७, २0१५मध्ये १८९ आणि २0१६मध्ये ६८ चोरांना अटक करण्यात आल्याचे सांगितले. तर १४ लाख ६१ हजारांची मालमत्ता चोरीला गेली आहे.