शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

‘रायगडा’वर दुरवस्था, पुरातत्त्व विभागाने जबाबदारी झटकली; शिवप्रेमींकडून नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 08:52 IST

त्याचदिवशी राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी संबंधित विभागाची बैठक घेऊन याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. 

जमीर काझी  अलिबाग : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावरील दुरवस्था दूर करण्याबाबतचे राज्याचे पर्यटनमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले निर्देश ५० दिवसांपासून कागदावरच राहिले आहेत. केंद्रीय पुरातत्त्व विभागाने गडावरील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची असल्याचे कळवून आपली जबाबदारी झटकली आहे. 

रायगड किल्ल्यावरील दुरवस्था, महाराजांच्या कथित श्वानाच्या चौथाऱ्याच्या रक्षणासाठी सुरक्षा रक्षकांकडून ऐतिहासिक ओवरीचा वापर चौकीसारखा करणे, कपडे वाळविणे, स्वच्छतागृह उभारल्याबाबतचे वृत्त १८ ऑक्टोबरला ‘ लोकमत’ने ‘शिवरायांच्या समाधीचे पावित्र्य जपण्यात पुरातत्त्वची बेफिकिरी’ या शीर्षकाअंतर्गत दिले होते. त्याचदिवशी राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी संबंधित विभागाची बैठक घेऊन याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. 

त्यानंतर २१ ऑक्टोबरला रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक, उपविभागीय दंडाधिकारी, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, उपविभाग महाडचे संरक्षण सहायक यांना  चौकशी करून नियमोचित कार्यवाही केल्याबद्दलचा ७ दिवसांमध्ये वस्तुनिष्ठ अहवाल देण्याचे आदेश दिले होते. मात्र डिसेंबरचा पहिला आठवडा उलटूनही किल्ल्यावरील परिस्थिती तशीच आहे. या अनास्थेबद्दल शिवप्रेमींकडून नाराजी व्यक्त होत आहे.

याबाबत पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याशी दोन दिवसापांसून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध झाले नाही. त्यांचे ओएसडी प्रवीण बोंडे यांनी हा विषय सांस्कृतिक विभागाच्या अखत्यारित असून पर्यटनमंत्री केवळ निर्देश देऊ शकतात, याबाबत जिल्हा प्रशासनाने काय कार्यवाही केली आहे माहीत नाही, ती मिळाल्यानंतर कळवितो, असे सांगितले.

रायगड किल्ल्यातील दुरवस्थेबाबत प्रशासनाबरोबर पोलिस विभागाकडूनही अहवाल मागविला होता. त्यांनी काय कार्यवाही केली त्याबाबत माहिती मागवून घेतो. -  डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी, रायगड

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या गडातील दुरवस्थेबाबत केंद्रीय पुरातत्त्व विभाग व प्रशासनाची उदासीनता दुर्दैवी आणि शिवप्रेमींत संताप निर्माण करणारी आहे. याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून तातडीने आदेश देण्याची आवश्यकता आहे. - इंद्रजित सावंत, इतिहास संशोधक

टॅग्स :Raigadरायगड