शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
2
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
3
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
4
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
5
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
6
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
7
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
8
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
9
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
10
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
12
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
13
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
14
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
15
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
16
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
17
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
18
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
19
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
20
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन

दिघी बंदराला रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ठोकले टाळे

By admin | Updated: May 3, 2017 04:01 IST

दिघी, नानवली, सावर्डेकर आणि मणेर या चार गावांना पाण्याचे टँकर न पुरवल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने गेल्या गुरुवारी दिघी

मुंबई : दिघी, नानवली, सावर्डेकर आणि मणेर या चार गावांना पाण्याचे टँकर न पुरवल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने गेल्या गुरुवारी दिघी बंदरासह रायगड जिल्हाधिकाऱ्यांना ‘कारणे-दाखवा’ नोटीस बजावली. या नोटीसनंतर रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी २८ एप्र्रिलला दिघी बंदराला टाळे ठोकले. या कारवाईमुळे दिघी बंदराचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे या निर्णयाविरुद्ध दिघी बंदर व्यवस्थापनाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.२०११मध्ये दिघी बंदराचे वाढीव बांधकाम करताना व्यवस्थापनाने दिघी, नानवली, सावर्डेकर, मणेरी आदी गावांना वीज व टँकरने पाणी पुरवण्याचे आश्वासन न्यायालयाला दिले होते. त्यानुसार काही दिवस दिघी गावकऱ्यांना सुविधा उपलब्ध करूनही दिल्या. मात्र दिघीजवळील कुडकी गावाने पाणी देण्यास नकार दिल्याची सबब पुढे करत संबंधित गावांना टँकरने पाणी पुरवण्यास नकार दिला. याविरुद्ध रहिवाशांनी याचिका दाखल केली. ग्रामस्थांना पाणी पुरवण्यासाठी गेली पाच वर्षे व्यवस्थापनाने सुविधा उपलब्ध न केल्याने २५ एप्रिलला न्यायालयाने संतापत दिघी बंदरासह नगरविकास विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालय, रायगडचे जिल्हाधिकारी व महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड यांना त्यांच्यावर कारवाई का करण्यात येऊ नये? याचे स्पष्टीकरण देण्यासाठी ‘कारणे-दाखवा’ नोटीस बजावली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बंदराला टाळे ठोकले. (प्रतिनिधी) बुधवारी पुढील सुनावणी दिघी बंदराला कोट्यवधी रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे. दिघी बंदराला मारलेले टाळे काढण्याचे निर्देश रायगड जिल्हाधिकाऱ्यांना द्यावेत, अशी विनंती दिघी बंदर व्यवस्थापनाने उच्च न्यायालयाला केली आहे. ‘आम्ही कारवाई केल्यानंतर सर्व कामाला लागेल. गेली पाच वर्षे कुणीच काही केले नाही. त्यामुळे आम्ही ही कारवाई मागे घेण्यास सांगणार नाही. गेली पाच वर्षे तुम्ही काय केलेत, ते पाहा,’ असे म्हणत उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या वकिलांना उपस्थित राहण्याचे निर्देश देत दिघी बंदराच्या अर्जावरील सुनावणी बुधवारी ठेवली.