शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

दिघी बंदराला रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ठोकले टाळे

By admin | Updated: May 3, 2017 04:01 IST

दिघी, नानवली, सावर्डेकर आणि मणेर या चार गावांना पाण्याचे टँकर न पुरवल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने गेल्या गुरुवारी दिघी

मुंबई : दिघी, नानवली, सावर्डेकर आणि मणेर या चार गावांना पाण्याचे टँकर न पुरवल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने गेल्या गुरुवारी दिघी बंदरासह रायगड जिल्हाधिकाऱ्यांना ‘कारणे-दाखवा’ नोटीस बजावली. या नोटीसनंतर रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी २८ एप्र्रिलला दिघी बंदराला टाळे ठोकले. या कारवाईमुळे दिघी बंदराचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे या निर्णयाविरुद्ध दिघी बंदर व्यवस्थापनाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.२०११मध्ये दिघी बंदराचे वाढीव बांधकाम करताना व्यवस्थापनाने दिघी, नानवली, सावर्डेकर, मणेरी आदी गावांना वीज व टँकरने पाणी पुरवण्याचे आश्वासन न्यायालयाला दिले होते. त्यानुसार काही दिवस दिघी गावकऱ्यांना सुविधा उपलब्ध करूनही दिल्या. मात्र दिघीजवळील कुडकी गावाने पाणी देण्यास नकार दिल्याची सबब पुढे करत संबंधित गावांना टँकरने पाणी पुरवण्यास नकार दिला. याविरुद्ध रहिवाशांनी याचिका दाखल केली. ग्रामस्थांना पाणी पुरवण्यासाठी गेली पाच वर्षे व्यवस्थापनाने सुविधा उपलब्ध न केल्याने २५ एप्रिलला न्यायालयाने संतापत दिघी बंदरासह नगरविकास विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालय, रायगडचे जिल्हाधिकारी व महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड यांना त्यांच्यावर कारवाई का करण्यात येऊ नये? याचे स्पष्टीकरण देण्यासाठी ‘कारणे-दाखवा’ नोटीस बजावली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बंदराला टाळे ठोकले. (प्रतिनिधी) बुधवारी पुढील सुनावणी दिघी बंदराला कोट्यवधी रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे. दिघी बंदराला मारलेले टाळे काढण्याचे निर्देश रायगड जिल्हाधिकाऱ्यांना द्यावेत, अशी विनंती दिघी बंदर व्यवस्थापनाने उच्च न्यायालयाला केली आहे. ‘आम्ही कारवाई केल्यानंतर सर्व कामाला लागेल. गेली पाच वर्षे कुणीच काही केले नाही. त्यामुळे आम्ही ही कारवाई मागे घेण्यास सांगणार नाही. गेली पाच वर्षे तुम्ही काय केलेत, ते पाहा,’ असे म्हणत उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या वकिलांना उपस्थित राहण्याचे निर्देश देत दिघी बंदराच्या अर्जावरील सुनावणी बुधवारी ठेवली.