शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

"लोकशाहीची हत्या तुम्हाला विनोद वाटतो का?"; मुख्यमंत्री फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 22:52 IST

Uddhav Thackeray on Rahul Gandhi PC: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत अनेक गैरप्रकार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते ...

Uddhav Thackeray on Rahul Gandhi PC: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत अनेक गैरप्रकार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शरद पवार गटाचा खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीआधी तब्बल ३९ लाख मतदार वाढले कसे सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला. राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यावर मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. 

राहुल गांधी यांनी खासदार संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी राहुल गांधी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानावरुन निवडणूक आयोगावर निशाणा साधला. मतदार याद्यांमध्ये अनेक अनियमितता आढळून आल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या प्रौढ लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या अधिक आहे असा दावाही राहुल गांधी यांनी केला. निवडणूक आयोगाने तातडीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठीची फोटोसह असलेली मतदार यादी द्यावी आपल्याला द्यावी अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.  त्यावर प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरे निवडणूक आयोगाने दिली असल्याचे म्हटलं होतं.

राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. लोकशाहीची जी हत्या केली आहे तो तुम्हाला विनोद वाटत आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

"राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन मतदार संख्या कशी वाढली याबाबत प्रश्न उपस्थित केला. पाच महिन्यांमध्ये ४० लाख मतदार कसे वाढले. हे मतदार आले कुठून त्यावर आपल्या मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. तोच तोच विनोद सांगितला की पुन्हा कोणाला हसायला येत नाही, असं त्यांनी म्हटलं. तुम्ही लोकशाहीची जी हत्या केली आहे तो तुम्हाला विनोद वाटत आहे का? आजच्या पत्रकार परिषदेत आमचा ईव्हीएमवर आक्षेप नव्हता तर तुम्ही ज्या बोगस पद्धतीने मतदार घुसवले आहेत त्यावर होता," असं उद्धव ठाकरे म्हणाले.

"त्यांनी लोकसभा निकालाचा अभ्यास केला असं म्हणतात. कोणत्या मतदारसंघात त्यांना आघाडी मिळाली, कोणत्या मतदारसंघात आघाडी मिळाली तरी जिंकू शकत नाही याचा त्यांनी अभ्यास केला. त्यातले त्यांनी मतदार बरोबर हेरले आणि बाजूच्या मतदार संघात ते नोंदवले आणि त्यांच्या उमेदवाराला मतदान करून घेतलं," असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRahul Gandhiराहुल गांधी