शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"लोकशाहीची हत्या तुम्हाला विनोद वाटतो का?"; मुख्यमंत्री फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 22:52 IST

Uddhav Thackeray on Rahul Gandhi PC: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत अनेक गैरप्रकार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते ...

Uddhav Thackeray on Rahul Gandhi PC: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत अनेक गैरप्रकार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शरद पवार गटाचा खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीआधी तब्बल ३९ लाख मतदार वाढले कसे सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला. राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यावर मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. 

राहुल गांधी यांनी खासदार संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी राहुल गांधी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानावरुन निवडणूक आयोगावर निशाणा साधला. मतदार याद्यांमध्ये अनेक अनियमितता आढळून आल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या प्रौढ लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या अधिक आहे असा दावाही राहुल गांधी यांनी केला. निवडणूक आयोगाने तातडीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठीची फोटोसह असलेली मतदार यादी द्यावी आपल्याला द्यावी अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.  त्यावर प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरे निवडणूक आयोगाने दिली असल्याचे म्हटलं होतं.

राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. लोकशाहीची जी हत्या केली आहे तो तुम्हाला विनोद वाटत आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

"राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन मतदार संख्या कशी वाढली याबाबत प्रश्न उपस्थित केला. पाच महिन्यांमध्ये ४० लाख मतदार कसे वाढले. हे मतदार आले कुठून त्यावर आपल्या मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. तोच तोच विनोद सांगितला की पुन्हा कोणाला हसायला येत नाही, असं त्यांनी म्हटलं. तुम्ही लोकशाहीची जी हत्या केली आहे तो तुम्हाला विनोद वाटत आहे का? आजच्या पत्रकार परिषदेत आमचा ईव्हीएमवर आक्षेप नव्हता तर तुम्ही ज्या बोगस पद्धतीने मतदार घुसवले आहेत त्यावर होता," असं उद्धव ठाकरे म्हणाले.

"त्यांनी लोकसभा निकालाचा अभ्यास केला असं म्हणतात. कोणत्या मतदारसंघात त्यांना आघाडी मिळाली, कोणत्या मतदारसंघात आघाडी मिळाली तरी जिंकू शकत नाही याचा त्यांनी अभ्यास केला. त्यातले त्यांनी मतदार बरोबर हेरले आणि बाजूच्या मतदार संघात ते नोंदवले आणि त्यांच्या उमेदवाराला मतदान करून घेतलं," असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRahul Gandhiराहुल गांधी