शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

"लोकशाहीची हत्या तुम्हाला विनोद वाटतो का?"; मुख्यमंत्री फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 22:52 IST

Uddhav Thackeray on Rahul Gandhi PC: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत अनेक गैरप्रकार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते ...

Uddhav Thackeray on Rahul Gandhi PC: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत अनेक गैरप्रकार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शरद पवार गटाचा खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीआधी तब्बल ३९ लाख मतदार वाढले कसे सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला. राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यावर मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. 

राहुल गांधी यांनी खासदार संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी राहुल गांधी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानावरुन निवडणूक आयोगावर निशाणा साधला. मतदार याद्यांमध्ये अनेक अनियमितता आढळून आल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या प्रौढ लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या अधिक आहे असा दावाही राहुल गांधी यांनी केला. निवडणूक आयोगाने तातडीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठीची फोटोसह असलेली मतदार यादी द्यावी आपल्याला द्यावी अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.  त्यावर प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरे निवडणूक आयोगाने दिली असल्याचे म्हटलं होतं.

राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. लोकशाहीची जी हत्या केली आहे तो तुम्हाला विनोद वाटत आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

"राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन मतदार संख्या कशी वाढली याबाबत प्रश्न उपस्थित केला. पाच महिन्यांमध्ये ४० लाख मतदार कसे वाढले. हे मतदार आले कुठून त्यावर आपल्या मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. तोच तोच विनोद सांगितला की पुन्हा कोणाला हसायला येत नाही, असं त्यांनी म्हटलं. तुम्ही लोकशाहीची जी हत्या केली आहे तो तुम्हाला विनोद वाटत आहे का? आजच्या पत्रकार परिषदेत आमचा ईव्हीएमवर आक्षेप नव्हता तर तुम्ही ज्या बोगस पद्धतीने मतदार घुसवले आहेत त्यावर होता," असं उद्धव ठाकरे म्हणाले.

"त्यांनी लोकसभा निकालाचा अभ्यास केला असं म्हणतात. कोणत्या मतदारसंघात त्यांना आघाडी मिळाली, कोणत्या मतदारसंघात आघाडी मिळाली तरी जिंकू शकत नाही याचा त्यांनी अभ्यास केला. त्यातले त्यांनी मतदार बरोबर हेरले आणि बाजूच्या मतदार संघात ते नोंदवले आणि त्यांच्या उमेदवाराला मतदान करून घेतलं," असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRahul Gandhiराहुल गांधी