शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
2
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
3
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
4
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
5
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
6
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
9
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
10
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?
11
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
12
कर्नाटकात वाघीण अन् तिच्या ४ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू; विष देऊन मारल्याला संशय
13
भाविकांसाठी आनंदवार्ता! आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचं २४ तास दर्शन सुरू
14
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
15
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
16
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
17
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
18
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
19
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
20
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार

ऐनवेळी बदलला राहुल यांनी प्लान

By admin | Updated: May 1, 2015 02:08 IST

अमरावती जिल्ह्णात आयोजित किसान पदयात्रेत सहभागी होण्यासाठी अ.भा.काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नागपुरातून कारने जायचे की रेल्वेने हे गुरुवारी पहाटे ४ पर्यंत निश्चित नव्हते.

रेल्वे प्रवासाचा होता विचार : नियोजन कोलमडले असतेनागपूर : अमरावती जिल्ह्णात आयोजित किसान पदयात्रेत सहभागी होण्यासाठी अ.भा.काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नागपुरातून कारने जायचे की रेल्वेने हे गुरुवारी पहाटे ४ पर्यंत निश्चित नव्हते. सकाळच्या रेल्वेने धामणागाव पर्यंत जाता येईल का, याची चाचपणी बुधवारी करण्यात आली होती. मात्र, ऐनवेळी नियोजित वेळापत्रक कोलमडू नये म्हणून प्रवासातील बदल टाळण्यात आला व राहुल गांधी हे कारनेच अमरावतीसाठी रवाना झाले. ऐनवेळी राहुल गांधी हे पहाटे ५.४० ची नागपूर-भुसावळ पॅसेंजर किंवा सकाळी ६.३६ ला सुटणारी जबलपूर-अमरावती एक्सप्रेस या दोन रेल्वे गाड्यांपैकी एकाने धामणगावपर्यंत जाऊ शकतात, अशी शक्यता काँग्रेस पदाधिकारी वर्तवित होते. याशिवाय सेवाग्राम येथे सकाळी रेल्वे पोहचून बापुकुटीचे दर्शन घ्यायचे व नंतर पुढील प्रवास सुरू करायचा, असाही विचार पुढे आला होता. असे झाले तर राहुल यांचा विदर्भातील प्रवास रेल्वे, कार व पायी असा तिन्ही प्रकारे होईल. तीन वेगवेगळ्या प्रवासातून वेगवेगळ्या नागरिकांशी संवाद साधता येईल व तो जास्त परिणामकारक असेल, असा विचार काही काँग्रेस नेत्यांनी मांडला होता. मात्र, अमरावती जिल्ह्णातील ज्या गावांना व शेतकरी कुटुंबांना राहुल गांधी भेट देणार आहेत तेथे दोन दिवसांपूर्वीच वेळेसह निरोप देण्यात आले आहेत. धामणगावपर्यंत रेल्वेने प्रवास केला तर पुढचे वेळापत्रक कोलमडेल. शिवाय अमरावती मार्गावर रस्त्यात काही ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी राहुल गांधी यांच्या स्वागताची तयारी करून ठेवली होती. तसे निरोप ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहचविले होते. अशात ऐनवेळी कार प्रवास रद्द करून रेल्वे प्रवास केला तर संबंधित कार्यकर्ते व शेतकऱ्यांचा हिरमोड होईल व यातून चांगले संकेत जाणार नाहीत, असे काही पदाधिकाऱ्यांचे मत होते. शिवाय ऐनवेळी दौऱ्यात बदल केला तर सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असता. त्यामुळे शेवटी रेल्वे प्रवास टाळून नियोजित कार्यक्रमानुसार कारनेच जाण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. विदर्भाच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी रणरणत्या उन्हात अमरावतीतील गुंजी ते रामगावपर्यंत १५ किमीची पदयात्रा करून आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. तेथील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांविषयी चर्चा केली. ह्यकर्जाच्या ओज्याने पिचलेले अनेक शेतकरी आत्महत्या करत असताना काही मंत्री मात्र तीनच शेतक-यांनी आत्महत्या केल्याचा दावा करतात तर काही जण त्या शेतक-यांची भेकड म्हणून अवहलेना करतातह्ण असे सांगत त्यांनी भाजपच्या मंत्र्यांवर टीकास्त्र सोडले. शेतकरी कर्जमाफीची मागणी करत असताना राज्य व केंद्र सरकार मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. हे सरकार शेतकरी वा मजुरांचे नव्हे तर उद्योगपतींचे सरकार असल्याची घणाघाती टीका राहुल गांधी यांनी केली. (प्रतिनिधी)