शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
3
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
4
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
5
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
6
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
7
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
8
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
9
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
10
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
11
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
12
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
13
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
14
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
15
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
16
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
17
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
18
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
19
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
20
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?

ऐनवेळी बदलला राहुल यांनी प्लान

By admin | Updated: May 1, 2015 02:08 IST

अमरावती जिल्ह्णात आयोजित किसान पदयात्रेत सहभागी होण्यासाठी अ.भा.काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नागपुरातून कारने जायचे की रेल्वेने हे गुरुवारी पहाटे ४ पर्यंत निश्चित नव्हते.

रेल्वे प्रवासाचा होता विचार : नियोजन कोलमडले असतेनागपूर : अमरावती जिल्ह्णात आयोजित किसान पदयात्रेत सहभागी होण्यासाठी अ.भा.काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नागपुरातून कारने जायचे की रेल्वेने हे गुरुवारी पहाटे ४ पर्यंत निश्चित नव्हते. सकाळच्या रेल्वेने धामणागाव पर्यंत जाता येईल का, याची चाचपणी बुधवारी करण्यात आली होती. मात्र, ऐनवेळी नियोजित वेळापत्रक कोलमडू नये म्हणून प्रवासातील बदल टाळण्यात आला व राहुल गांधी हे कारनेच अमरावतीसाठी रवाना झाले. ऐनवेळी राहुल गांधी हे पहाटे ५.४० ची नागपूर-भुसावळ पॅसेंजर किंवा सकाळी ६.३६ ला सुटणारी जबलपूर-अमरावती एक्सप्रेस या दोन रेल्वे गाड्यांपैकी एकाने धामणगावपर्यंत जाऊ शकतात, अशी शक्यता काँग्रेस पदाधिकारी वर्तवित होते. याशिवाय सेवाग्राम येथे सकाळी रेल्वे पोहचून बापुकुटीचे दर्शन घ्यायचे व नंतर पुढील प्रवास सुरू करायचा, असाही विचार पुढे आला होता. असे झाले तर राहुल यांचा विदर्भातील प्रवास रेल्वे, कार व पायी असा तिन्ही प्रकारे होईल. तीन वेगवेगळ्या प्रवासातून वेगवेगळ्या नागरिकांशी संवाद साधता येईल व तो जास्त परिणामकारक असेल, असा विचार काही काँग्रेस नेत्यांनी मांडला होता. मात्र, अमरावती जिल्ह्णातील ज्या गावांना व शेतकरी कुटुंबांना राहुल गांधी भेट देणार आहेत तेथे दोन दिवसांपूर्वीच वेळेसह निरोप देण्यात आले आहेत. धामणगावपर्यंत रेल्वेने प्रवास केला तर पुढचे वेळापत्रक कोलमडेल. शिवाय अमरावती मार्गावर रस्त्यात काही ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी राहुल गांधी यांच्या स्वागताची तयारी करून ठेवली होती. तसे निरोप ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहचविले होते. अशात ऐनवेळी कार प्रवास रद्द करून रेल्वे प्रवास केला तर संबंधित कार्यकर्ते व शेतकऱ्यांचा हिरमोड होईल व यातून चांगले संकेत जाणार नाहीत, असे काही पदाधिकाऱ्यांचे मत होते. शिवाय ऐनवेळी दौऱ्यात बदल केला तर सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असता. त्यामुळे शेवटी रेल्वे प्रवास टाळून नियोजित कार्यक्रमानुसार कारनेच जाण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. विदर्भाच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी रणरणत्या उन्हात अमरावतीतील गुंजी ते रामगावपर्यंत १५ किमीची पदयात्रा करून आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. तेथील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांविषयी चर्चा केली. ह्यकर्जाच्या ओज्याने पिचलेले अनेक शेतकरी आत्महत्या करत असताना काही मंत्री मात्र तीनच शेतक-यांनी आत्महत्या केल्याचा दावा करतात तर काही जण त्या शेतक-यांची भेकड म्हणून अवहलेना करतातह्ण असे सांगत त्यांनी भाजपच्या मंत्र्यांवर टीकास्त्र सोडले. शेतकरी कर्जमाफीची मागणी करत असताना राज्य व केंद्र सरकार मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. हे सरकार शेतकरी वा मजुरांचे नव्हे तर उद्योगपतींचे सरकार असल्याची घणाघाती टीका राहुल गांधी यांनी केली. (प्रतिनिधी)