शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

Maharashtra Election 2019 : राफेलचे पूजन ही अंधश्रद्धा नव्हे, तर श्रद्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 05:51 IST

राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन : भाजपची सुपरसॉनिक घोडदौड सुरू असल्याचा दावा

मीरा रोड : पॅरिसमध्ये राफेल विमानाची पूजा करणे, ही अंधश्रद्धा नसून त्यामध्ये आपण कोणतीही चूक केलेली नाही. विजयादशमीला शस्त्रांची पूजा करणे, ही आपली परंपरा असून आपण त्याचेच पालन केले, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी मीरा रोड येथील भाजप उमेदवार नरेंद्र मेहता यांच्या प्रचारसभेत केले.

राजनाथ सिंह म्हणाले की, आपण दरवर्षी विजयादशमीला शस्त्रांची पूजा करतो. यावेळी पॅरिसला असल्याने तेथे शस्त्रे कुठे मिळणार? पण, राफेलसारखे सर्वात मोठे शस्त्र समोर असल्याने त्याचीच पूजा करण्याचा विचार मनात आला. त्यामुळे आपण विमानावर ‘ओम’ ही अक्षरे लिहिली. टायरपाशी लिंबे ठेवली, यात अंधश्रद्धा नसून ती आपली श्रद्धा आहे. ‘ओम’ला सर्वजण मानतात व स्मरण करतात, असेही राजनाथ सिंह म्हणाले.

काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी जेव्हा आत्मघातकी हल्ला करून ४० जवान शहीद केले, त्यावेळी जर आपल्याकडे राफेल असते, तर आपण त्याच दिवशी पाकिस्तानला नेस्तनाबूत केले असते, असे ते बालाकोट हल्ल्याचा उल्लेख करून बोलले. पॅरिसमध्ये जेव्हा राफेलमध्ये बसलो, तेव्हा सोबत फक्त वैमानिकच होता. राफेल ज्या वेगाने उडाले, तो अनुभव चिरकाल स्मरणात राहील, असा रोमहर्षक होता. या निर्णयाचे सर्व श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना देईन, असे राजनाथ म्हणाले.

भाजप आज राफेलसारखा सुपरसॉनिक वेगाने उडत असून त्याच गतीने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस खाली जात आहे, असे सांगून राजनाथ म्हणाले की, काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम आम्ही हटवून दाखवले. आमच्या काळात कुठेही दंगली झाल्या नाहीत. मोदींच्या नेतृत्वाखाली देशाचा, तर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षांत राज्याचा विकास झाला आहे. भाजप-शिवसेनेची सत्ता आल्यावर पुन्हा फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार, असेही ते म्हणाले. यावेळी भाजपचे उमेदवार नरेंद्र मेहता, महापौर डिम्पल मेहता उपस्थित होते.

उत्तर भारतीयांच्या समर्थनासाठी राजनाथ मुंबईतमुंबई : उत्तर भारतीयांना एकत्र करत त्यांनी पक्षाच्या उमेदवाराला मदत करावी, या उद्देशाने केंद्रीय रक्षामंत्री राजनाथ सिंह मुंबईत दाखल झाले. ‘लोकांचा उत्साह पाहता त्यांनी विद्या ठाकूर यांनाच विधानसभेत निवडून देण्याचे नक्की केले आहे, असा विश्वास सिंह यांनी व्यक्त केला. तर चारकोपमध्ये योगेश सागर यांच्या सभेतही त्यांनी ‘प्राण जाये पर वचन न जाये’ या शब्दांत भाजप सरकार त्यांनी दिलेली वचने नक्की पूर्ण करेल, असे आश्वासन दिले. कार्यक्रमास खा. गोपाळ शेट्टी, रामदास आठवले, योगेश सागर, मनीषा चौधरी, प्रकाश सुर्वे, महामंत्री अमरजीत मिश्रा तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.