शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

बाजार समितीवर भाजपचा कब्जा, सभापतीपदी राधाकिसन पठाडे विजयी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 17:00 IST

अखेर जाधववाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुलावर भाजपचा झेंडा फडकला. येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदाच्या निवडणूकीत १३ विरूद्ध ४ अशा मोठ्या फरकाने काँग्रेसचे उमेदवार राहूल सावंत यांच्यावर मात करीत भाजपाचे उमेदवार राधाकिसन पठाडे यांनी बाजी मारली. 

ठळक मुद्दे१३ विरूद्ध ४ अशा मोठ्या फरकाने काँग्रेसचे उमेदवार राहूल सावंत यांच्यावर मात अपक्ष उमेदवार विकास दांडगे यांनी तटस्थ राहिले. 

औरंगाबाद, दि. 1 : अखेर जाधववाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुलावर भाजपचा झेंडा फडकला. येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदाच्या निवडणूकीत १३ विरूद्ध ४ अशा मोठ्या फरकाने काँग्रेसचे उमेदवार राहूल सावंत यांच्यावर मात करीत भाजपाचे उमेदवार राधाकिसन पठाडे यांनी बाजी मारली. 

बाजार समितीचे माजी सभापती संजय औताडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव परित होऊन आज १० दिवस पूर्ण झाले. शुक्रवारी सभापतीपदासाठीची निवडणूक प्रक्रियेला सकाळी ११.३० वाजता सुरुवात झाली. भाजपातर्फे राधाकिसन पठाडे यांनी तर काँग्रेसतर्फे राहूल सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या दोघांनी आपली उमेदवारी मागे घेतली नाही. अखेर ‘हात’ वरती करुन मतदान घेण्यात आले. यावेळी पठाडे यांना १३ मते पडली. काँग्रेसचे सावंत यांना ४ मते पडली व अपक्ष उमेदवार विकास दांडगे यांनी तटस्थ रहाणे पसंत केले.

दुपारी २.३० वाजता सहनिबंधक निवडणूक अधिकारी सहाय्यक निबंधक देवयानी वहाणे (भारस्वाडकर) यांनी राधाकिसन पठाडे विजयी झाल्याचे जाहीर केले. आणि बाजारसमितीच्या कार्यालयासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. फटाक्यांची आतशबाजी आणि डिजे लावून या विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कार्यकर्तांनी आणलेला गुलाबाचा जेम्बो हार यावेळी सभापती राधाकिसन पठाडे, उपसभापती भागचंद ठोंबरे, नगरसेवक राजू शिंदे यांच्या गळ्यात घालण्यात आला. 

आता बाजारसमितीमधील सभापती व उपसभापती दोन्ही प्रमुखपद भाजपाकडे आले आहे. यामुळे विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना आपल्या मतदार संघातील बाजार समितीवर वर्चस्वस्थापन करण्यात पुन्हा एकदा यश आले आहे. मात्र, यासाठी त्यांना दोन वर्षाचा कालावधी लागला हे मात्र, तेवढेच खरे. भाजपाचे ७ संचालक ज्यात भागचंद ठोंबरे, रघुनाथ काळे, गणेश दहिहंडे, दामोधर नवपुते, राम शेळके, अल्काबाई दहिहंडे, संगिता मदगे तसेच काँग्रेसमधून भाजपात आलेले ३ संचालक राधाकिसन पठाडे, शिवाजी वाघ, बाबासाहेब मुगदल, २ व्यापारी संचालक प्रशांत सोकीया, हरीशंकर दायमा व  १ हमालमापाडी संचालक देवीदास किर्तीशाही असे १३ जण होते. तर काँग्रेसचे संजय औताडे, नारायण मते, दत्तु तारो, राहूल सावंत हे चौघे पक्षाशी एकनिष्ठ राहिले.  अपक्ष उमेदवार विकास दांडगे यांनी तटस्थ राहिले.