शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
3
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
4
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
5
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
6
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
7
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
8
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
9
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
10
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
11
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
12
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
13
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
14
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
15
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
16
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
17
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
18
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
19
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
20
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या

बाजार समितीवर भाजपचा कब्जा, सभापतीपदी राधाकिसन पठाडे विजयी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 17:00 IST

अखेर जाधववाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुलावर भाजपचा झेंडा फडकला. येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदाच्या निवडणूकीत १३ विरूद्ध ४ अशा मोठ्या फरकाने काँग्रेसचे उमेदवार राहूल सावंत यांच्यावर मात करीत भाजपाचे उमेदवार राधाकिसन पठाडे यांनी बाजी मारली. 

ठळक मुद्दे१३ विरूद्ध ४ अशा मोठ्या फरकाने काँग्रेसचे उमेदवार राहूल सावंत यांच्यावर मात अपक्ष उमेदवार विकास दांडगे यांनी तटस्थ राहिले. 

औरंगाबाद, दि. 1 : अखेर जाधववाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुलावर भाजपचा झेंडा फडकला. येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदाच्या निवडणूकीत १३ विरूद्ध ४ अशा मोठ्या फरकाने काँग्रेसचे उमेदवार राहूल सावंत यांच्यावर मात करीत भाजपाचे उमेदवार राधाकिसन पठाडे यांनी बाजी मारली. 

बाजार समितीचे माजी सभापती संजय औताडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव परित होऊन आज १० दिवस पूर्ण झाले. शुक्रवारी सभापतीपदासाठीची निवडणूक प्रक्रियेला सकाळी ११.३० वाजता सुरुवात झाली. भाजपातर्फे राधाकिसन पठाडे यांनी तर काँग्रेसतर्फे राहूल सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या दोघांनी आपली उमेदवारी मागे घेतली नाही. अखेर ‘हात’ वरती करुन मतदान घेण्यात आले. यावेळी पठाडे यांना १३ मते पडली. काँग्रेसचे सावंत यांना ४ मते पडली व अपक्ष उमेदवार विकास दांडगे यांनी तटस्थ रहाणे पसंत केले.

दुपारी २.३० वाजता सहनिबंधक निवडणूक अधिकारी सहाय्यक निबंधक देवयानी वहाणे (भारस्वाडकर) यांनी राधाकिसन पठाडे विजयी झाल्याचे जाहीर केले. आणि बाजारसमितीच्या कार्यालयासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. फटाक्यांची आतशबाजी आणि डिजे लावून या विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कार्यकर्तांनी आणलेला गुलाबाचा जेम्बो हार यावेळी सभापती राधाकिसन पठाडे, उपसभापती भागचंद ठोंबरे, नगरसेवक राजू शिंदे यांच्या गळ्यात घालण्यात आला. 

आता बाजारसमितीमधील सभापती व उपसभापती दोन्ही प्रमुखपद भाजपाकडे आले आहे. यामुळे विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना आपल्या मतदार संघातील बाजार समितीवर वर्चस्वस्थापन करण्यात पुन्हा एकदा यश आले आहे. मात्र, यासाठी त्यांना दोन वर्षाचा कालावधी लागला हे मात्र, तेवढेच खरे. भाजपाचे ७ संचालक ज्यात भागचंद ठोंबरे, रघुनाथ काळे, गणेश दहिहंडे, दामोधर नवपुते, राम शेळके, अल्काबाई दहिहंडे, संगिता मदगे तसेच काँग्रेसमधून भाजपात आलेले ३ संचालक राधाकिसन पठाडे, शिवाजी वाघ, बाबासाहेब मुगदल, २ व्यापारी संचालक प्रशांत सोकीया, हरीशंकर दायमा व  १ हमालमापाडी संचालक देवीदास किर्तीशाही असे १३ जण होते. तर काँग्रेसचे संजय औताडे, नारायण मते, दत्तु तारो, राहूल सावंत हे चौघे पक्षाशी एकनिष्ठ राहिले.  अपक्ष उमेदवार विकास दांडगे यांनी तटस्थ राहिले.