शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बाजार समितीवर भाजपचा कब्जा, सभापतीपदी राधाकिसन पठाडे विजयी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 17:00 IST

अखेर जाधववाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुलावर भाजपचा झेंडा फडकला. येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदाच्या निवडणूकीत १३ विरूद्ध ४ अशा मोठ्या फरकाने काँग्रेसचे उमेदवार राहूल सावंत यांच्यावर मात करीत भाजपाचे उमेदवार राधाकिसन पठाडे यांनी बाजी मारली. 

ठळक मुद्दे१३ विरूद्ध ४ अशा मोठ्या फरकाने काँग्रेसचे उमेदवार राहूल सावंत यांच्यावर मात अपक्ष उमेदवार विकास दांडगे यांनी तटस्थ राहिले. 

औरंगाबाद, दि. 1 : अखेर जाधववाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुलावर भाजपचा झेंडा फडकला. येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदाच्या निवडणूकीत १३ विरूद्ध ४ अशा मोठ्या फरकाने काँग्रेसचे उमेदवार राहूल सावंत यांच्यावर मात करीत भाजपाचे उमेदवार राधाकिसन पठाडे यांनी बाजी मारली. 

बाजार समितीचे माजी सभापती संजय औताडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव परित होऊन आज १० दिवस पूर्ण झाले. शुक्रवारी सभापतीपदासाठीची निवडणूक प्रक्रियेला सकाळी ११.३० वाजता सुरुवात झाली. भाजपातर्फे राधाकिसन पठाडे यांनी तर काँग्रेसतर्फे राहूल सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या दोघांनी आपली उमेदवारी मागे घेतली नाही. अखेर ‘हात’ वरती करुन मतदान घेण्यात आले. यावेळी पठाडे यांना १३ मते पडली. काँग्रेसचे सावंत यांना ४ मते पडली व अपक्ष उमेदवार विकास दांडगे यांनी तटस्थ रहाणे पसंत केले.

दुपारी २.३० वाजता सहनिबंधक निवडणूक अधिकारी सहाय्यक निबंधक देवयानी वहाणे (भारस्वाडकर) यांनी राधाकिसन पठाडे विजयी झाल्याचे जाहीर केले. आणि बाजारसमितीच्या कार्यालयासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. फटाक्यांची आतशबाजी आणि डिजे लावून या विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कार्यकर्तांनी आणलेला गुलाबाचा जेम्बो हार यावेळी सभापती राधाकिसन पठाडे, उपसभापती भागचंद ठोंबरे, नगरसेवक राजू शिंदे यांच्या गळ्यात घालण्यात आला. 

आता बाजारसमितीमधील सभापती व उपसभापती दोन्ही प्रमुखपद भाजपाकडे आले आहे. यामुळे विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना आपल्या मतदार संघातील बाजार समितीवर वर्चस्वस्थापन करण्यात पुन्हा एकदा यश आले आहे. मात्र, यासाठी त्यांना दोन वर्षाचा कालावधी लागला हे मात्र, तेवढेच खरे. भाजपाचे ७ संचालक ज्यात भागचंद ठोंबरे, रघुनाथ काळे, गणेश दहिहंडे, दामोधर नवपुते, राम शेळके, अल्काबाई दहिहंडे, संगिता मदगे तसेच काँग्रेसमधून भाजपात आलेले ३ संचालक राधाकिसन पठाडे, शिवाजी वाघ, बाबासाहेब मुगदल, २ व्यापारी संचालक प्रशांत सोकीया, हरीशंकर दायमा व  १ हमालमापाडी संचालक देवीदास किर्तीशाही असे १३ जण होते. तर काँग्रेसचे संजय औताडे, नारायण मते, दत्तु तारो, राहूल सावंत हे चौघे पक्षाशी एकनिष्ठ राहिले.  अपक्ष उमेदवार विकास दांडगे यांनी तटस्थ राहिले.