शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

‘रास्ता रोको’शी संबंध नाही!- रवींद्र पाटील

By admin | Updated: November 17, 2016 04:04 IST

मराठा आरक्षणासाठी राज्यभर मूक मोर्चे निघत असले, तरी सरकार मूग गिळून गप्प आहे. त्यामुळे ९ डिसेंबरपर्यंत शासनाने भूमिका

मुंबई : मराठा आरक्षणासाठी राज्यभर मूक मोर्चे निघत असले, तरी सरकार मूग गिळून गप्प आहे. त्यामुळे ९ डिसेंबरपर्यंत शासनाने भूमिका जाहीर केली नाही, तर राज्यात ‘बोलके मोर्चे’ निघतील, असा इशारा ‘मराठा आरक्षण समन्वय’ समितीने दिला आहे. मात्र, समन्वय समितीशी ‘मराठा क्रांती मूक मोर्चा’चा काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण औरंगाबादचे समन्वयक रवींद्र काळे-पााटील यांनी दिले आहे.या आधी लातूरमध्ये पत्रकार परिषद घेत, मराठा आरक्षण समन्वय समितीने शासनाला ९ डिसेंबरचा अल्टिमेटम दिला आहे. त्यात समितीने सांगितले की, शासनाने ९ डिसेंबरपर्यंत भूमिका जाहीर करावी. नाहीतर ९ डिसेंबरला मराठा समाजबांधव सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान बैलगाडी आणि पशुधनासह रस्त्यावर उतरून ठिय्या आंदोलन करतील. त्यानंतर, राज्यात मराठा समाजाचे ‘बोलके मोर्चे’ निघतील. या आंदोलनात समन्वय समितीसोबत राज्यातील ४३ मराठा संघटनांचा समावेश असल्याचा दावाही केला आहे. मात्र, मराठा क्रांती मूक मोर्चा या आंदोलनात सामील होणार नसल्याचे रवींद्र काळे पाटील यांनी सांगितले.ते म्हणाले की, ‘मराठा क्रांती मूक मोर्चाने नागपूर अधिवेशनावर १४ डिसेंबर रोजी महामोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या महामोर्चाच्या तयारीसाठी १८ नोव्हेंबरला अमरावती येथे मराठा क्रांती मूक मोर्चाची राज्यव्यापी बैठक होणार आहे. इतर मोर्चांप्रमाणेच हा महामोर्चाची मूक असेल,’ असेही काळे पाटील यांनी सांगितले. मात्र, त्या आधी कोणताही ‘रास्ता रोको’ किंवा ‘बोलके मोर्चे’ काढणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.