शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अनुत्तरितच

By admin | Updated: June 6, 2016 03:34 IST

भूसंपादन, पुनर्वसनाबाबत प्रकल्पग्रस्तांच्या तक्रारींचे निराकरण करणाऱ्या यंत्रणेचे कामकाज अध्यक्षविना तीन वर्षांपासून ठप्प झाले आहे. त्यामुळे मराठवाडा आणि नाशिक महसूल विभागातील

संजय देशपांडे,  औरंगाबादभूसंपादन, पुनर्वसनाबाबत प्रकल्पग्रस्तांच्या तक्रारींचे निराकरण करणाऱ्या यंत्रणेचे कामकाज अध्यक्षविना तीन वर्षांपासून ठप्प झाले आहे. त्यामुळे मराठवाडा आणि नाशिक महसूल विभागातील १३ जिल्ह्यांतील प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या लहान-मोठ्या तक्रारी घेऊन मंत्रालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.प्रकल्पग्रस्तांच्या तक्रारींचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी २००७मध्ये आघाडी सरकारने ‘प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व गाऱ्हाणे निराकरण यंत्रणे’ची स्थापना केली. औरंगाबाद, पुणे आणि नागपूर या तीन ठिकाणी यंत्रणेची कार्यालये थाटण्यात आली. यंत्रणेच्या अध्यक्षपदी सेवानिवृत्त सनदी अधिकाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली होती.मराठवाडा आणि नाशिक महसूल विभागासाठी औरंगाबादेतील मानव विकास मिशनच्या जागेत यंत्रणेचे कार्यालय सुरू करण्यात आले. या दोन्ही विभागांतील १३ जिल्ह्यांसाठी यंत्रणेचे अध्यक्षपद राज्याचे तत्कालीन मानव विकास आयुक्त कृष्णा भोगे यांच्याकडे सोपविण्यात आले. भोगे यांनी अध्यक्षपदाच्या सहा वर्षांच्या कार्यकाळात प्रकल्पग्रस्तांच्या पाचशेपेक्षा जास्त तक्रारी निकाली काढल्या. २००७ ते २०१३ या कालावधीत यंत्रणेचे कामकाज नियमित सुरूहोते. २०१३मध्ये भोगे यांची मानव विकास मिशनच्या आयुक्तपदाची मुदत संपली. त्यांच्या जागी भास्कर मुंढे यांची नियुक्ती झाली. परंतु ‘प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व गाऱ्हाणे निराकरण यंत्रणे’चे अध्यक्षपद मात्र रिक्तच ठेवण्यात आले. अध्यक्षच नसल्याने गेल्या तीन वर्षांपासून कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले आहे.गाऱ्हाणे निराकरण यंत्रणेच्या कार्यालयाचे आता मार्गदर्शन केंद्रात रूपांतरझाले आहे. एक वरिष्ठ लिपिक आणि एक शिपाई असे दोन कर्मचारी तेथे कार्यरत आहेत. यंत्रणेला कोणी वाली उरलेला नसल्याने हे दोन कर्मचारी कामाशिवाय बसून आहेत. ‘प्रकल्पग्रस्त तक्रारी घेऊन येतात, परंतु अध्यक्ष नसल्याने आम्ही त्या स्वीकारत नाही. तक्रारींचा निपटारा करण्यासाठी कोणाकडे अर्ज करायचा याचे मार्गदर्शन करण्याचे काम आम्ही करीत आहोत,’ असे एका कर्मचाऱ्याने सांगितले.जायकवाडीसाठीदिली जमीनप्रकल्प पूर्ण झाल्यानंतरही अनेक वर्षांपर्यंत प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटत नाहीत. जायकवाडी प्रकल्पाचे उदाहरण याबाबत बोलके आहे. धरण पूर्ण होऊन ४० वर्षे झाल्यानंतरही प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न कायम आहेत.सरकारी कामाचा नमुनासरकारी कामकाज कसे चालते, याचा नमुना म्हणून या कार्यालयाकडे पाहावे लागेल. वार्षिक १ कोटी रुपयांच्या खर्चात १३ जिल्ह्यांचे कामकाज तेथे चालत होते. मानव विकास आयुक्तपदाची माझी मुदत संपल्यानंतर हे कार्यालय बंद पडले आहे. यंत्रणेच्या अध्यक्षपदी सक्षम व्यक्तीची निवड होणे गरजेचे होते; परंतु दुर्दैवाने तसा निर्णय घेण्यात आला नाही.- कृष्णा भोगे, सेवानिवृत्त सनदी अधिकारी