शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

शेतकरीप्रश्नी लोकसभेत घुमतोय महाराष्ट्राचा आवाज !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 10:44 IST

महाराष्ट्रातील तीनही नवनिर्वाचित खासदारांनी शेतकरी आत्महत्येचा मुद्दा आणि शेतकऱ्यांच्या समस्या लोकसभेत मांडल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तसेच सोशल मीडियावर या तिन्ही खासदारांचे कौतुक होत आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत देशात राष्ट्रवादाचा मुद्दा चांगलाच गाजला. पाकिस्तान आणि भारत यांच्यातील बिघडलेले संबंध निवडणुकीच्या केंद्रस्थानी होते. या निवडणुकीत शेतकरी प्रश्नांवर फारसा कुणी जोर दिला नाही. परंतु, लोकसभेत शेतकरी प्रश्न सध्या गाजत आहेत.

महाराष्ट्रातील नवनिर्वाचित खासदार महाराष्ट्रातील शेतकरी समस्या लोकसभेत मांडताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे, नवनीत राणा आणि एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी लोकसभेत शेतकरी समस्यांवर जोर दिला. त्यामुळे या तिन्ही खासदारांचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

खासदार अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांची रणनिती वापरावी अशी मागणी केली. शेतकरी आत्महत्या, बैलगाडा शर्यती, ग्रामीण पर्यटन या प्रश्नांवरुन आकडेवारी मांडत सरकारच्या शेतकरी धोरणांसंदर्भात कोल्हे यांनी प्रश्न उपस्थित केले. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू नका असं, शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं. शेतकऱ्यांसंदर्भात सरकारकडून आम्हाला तशीच अपेक्षा असल्याचे कोल्हे यांनी म्हटले होते.

खासदार नवनीत राणा यांनी देखील शेतकरी आत्महत्येवर आणि दुष्काळामुळे शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या अडचणींचा पाढाच वाचून दाखवला. यंदाही राज्यात अद्याप चांगला पाऊस झालेला नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाची योग्य किंमत मिळत नाही. राज्य सरकारने शेतकऱ्यांकडून डायरेक्ट खरेदी करावी, यासाठी आपण आदेश द्यावेत, अशी मागणी राणा यांनी लोकसभा अध्यक्षांकडे केली. तसेच शेतकऱ्यांच्या मुलांची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. आज शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाच्या समस्या निर्माण होत आहे. शेतकरी म्हटलं की, स्थळ येत नाहीत. शेतकऱ्याच्या घरी आपल्या मुलीला दोन वेळचं जेवन मिळणार नाही, असा विचार मुलींकडचे करत आहेत. ही परिस्थिती भीषण असल्याचे नवनीत राणा यांनी नमूद केले.

खासदार इम्तियाज जलील यांनी शेतकरी आत्महत्येचा मुद्दा लोकसभेत मांडला. त्यांनी मागील तीन वर्षातील शेतकरी आत्महत्येची आकडेवारी मांडली. यावेळी त्यांनी पत्रकारितेतील शेतकरी आत्महत्येसंदर्भातील आपले अनुभव सांगितले. पूर्वी शेतकरी आत्महत्या झाली की, आम्हाला धावत जावून माहिती घ्यावी लागत होती. पहिल्या पानावर बातमी यायची. परंतु, शेतकरी आत्महत्या एवढ्या नित्याच्या झाल्या की, आता त्याच्या बातम्या येणेही बंद झाले. मागील तीन महिन्यातच ८०० आत्महत्या झाल्याचे त्यांनी नमूद केले.

एकूणच तीनही नवनिर्वाचित खासदारांनी शेतकरी आत्महत्येचा मुद्दा आणि शेतकऱ्यांच्या समस्या लोकसभेत मांडल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तसेच सोशल मीडियावर या तिन्ही खासदारांचे कौतुक होत आहे.