शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
2
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
3
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
4
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
5
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
6
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
7
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
8
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
9
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
10
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
11
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
12
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
13
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
14
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
15
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
16
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
17
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
18
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
19
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
20
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?

शेतकरीप्रश्नी लोकसभेत घुमतोय महाराष्ट्राचा आवाज !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 10:44 IST

महाराष्ट्रातील तीनही नवनिर्वाचित खासदारांनी शेतकरी आत्महत्येचा मुद्दा आणि शेतकऱ्यांच्या समस्या लोकसभेत मांडल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तसेच सोशल मीडियावर या तिन्ही खासदारांचे कौतुक होत आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत देशात राष्ट्रवादाचा मुद्दा चांगलाच गाजला. पाकिस्तान आणि भारत यांच्यातील बिघडलेले संबंध निवडणुकीच्या केंद्रस्थानी होते. या निवडणुकीत शेतकरी प्रश्नांवर फारसा कुणी जोर दिला नाही. परंतु, लोकसभेत शेतकरी प्रश्न सध्या गाजत आहेत.

महाराष्ट्रातील नवनिर्वाचित खासदार महाराष्ट्रातील शेतकरी समस्या लोकसभेत मांडताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे, नवनीत राणा आणि एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी लोकसभेत शेतकरी समस्यांवर जोर दिला. त्यामुळे या तिन्ही खासदारांचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

खासदार अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांची रणनिती वापरावी अशी मागणी केली. शेतकरी आत्महत्या, बैलगाडा शर्यती, ग्रामीण पर्यटन या प्रश्नांवरुन आकडेवारी मांडत सरकारच्या शेतकरी धोरणांसंदर्भात कोल्हे यांनी प्रश्न उपस्थित केले. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू नका असं, शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं. शेतकऱ्यांसंदर्भात सरकारकडून आम्हाला तशीच अपेक्षा असल्याचे कोल्हे यांनी म्हटले होते.

खासदार नवनीत राणा यांनी देखील शेतकरी आत्महत्येवर आणि दुष्काळामुळे शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या अडचणींचा पाढाच वाचून दाखवला. यंदाही राज्यात अद्याप चांगला पाऊस झालेला नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाची योग्य किंमत मिळत नाही. राज्य सरकारने शेतकऱ्यांकडून डायरेक्ट खरेदी करावी, यासाठी आपण आदेश द्यावेत, अशी मागणी राणा यांनी लोकसभा अध्यक्षांकडे केली. तसेच शेतकऱ्यांच्या मुलांची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. आज शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाच्या समस्या निर्माण होत आहे. शेतकरी म्हटलं की, स्थळ येत नाहीत. शेतकऱ्याच्या घरी आपल्या मुलीला दोन वेळचं जेवन मिळणार नाही, असा विचार मुलींकडचे करत आहेत. ही परिस्थिती भीषण असल्याचे नवनीत राणा यांनी नमूद केले.

खासदार इम्तियाज जलील यांनी शेतकरी आत्महत्येचा मुद्दा लोकसभेत मांडला. त्यांनी मागील तीन वर्षातील शेतकरी आत्महत्येची आकडेवारी मांडली. यावेळी त्यांनी पत्रकारितेतील शेतकरी आत्महत्येसंदर्भातील आपले अनुभव सांगितले. पूर्वी शेतकरी आत्महत्या झाली की, आम्हाला धावत जावून माहिती घ्यावी लागत होती. पहिल्या पानावर बातमी यायची. परंतु, शेतकरी आत्महत्या एवढ्या नित्याच्या झाल्या की, आता त्याच्या बातम्या येणेही बंद झाले. मागील तीन महिन्यातच ८०० आत्महत्या झाल्याचे त्यांनी नमूद केले.

एकूणच तीनही नवनिर्वाचित खासदारांनी शेतकरी आत्महत्येचा मुद्दा आणि शेतकऱ्यांच्या समस्या लोकसभेत मांडल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तसेच सोशल मीडियावर या तिन्ही खासदारांचे कौतुक होत आहे.