शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

प्रश्न १८३३ कोटींचा : वसुलीपेक्षा खर्च मोठा, सिंचन पाणीपट्टी माफ करणार

By अतुल कुलकर्णी | Updated: June 24, 2018 05:38 IST

१८३३ कोटींची पाणीपट्टी वसुली करण्यासाठी जलसंपदा विभागाने तीन वर्षात वसुलीच्या दीडपट खर्च केला आहे़

मुंबई : १८३३ कोटींची पाणीपट्टी वसुली करण्यासाठी जलसंपदा विभागाने तीन वर्षात वसुलीच्या दीडपट खर्च केला आहे़ वसुलीतील भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांची अडवणूक थांबवण्यासाठी सिंचनाची पाणीपट्टीच माफ करण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे़राज्यात सिंचन आणि बिगर सिंचन अशी दोन प्रकारची पाणीपट्टी वसूल केली जाते. २०१५-१६ ते २०१७-१८ या काळात दोन्हींची मिळून १८३३.६३ कोटी रुपये वसुली झाली. मात्र यासाठी वेतन व वेतनेतर, कार्यालयीन आणि देखभाल दुरुस्ती असा एकूण खर्च २५०० कोटींच्या घरात गेला.सिंचनाची पाणीपट्टी शेतकºयांकडून वसूल केली जाते. ती करताना पाटकरी, शाखाधिकारी शेतकºयांना भीती दाखवून ‘वरकमाई’ करतात. हे सगळ्या जलसंपदा विभागाला माहिती आहे, पण त्यासाठी वरिष्ठांचे अभय असल्याने शेतकºयांची पिळवणूक सुरूच आहे़ नोव्हेंबर २०१६ च्या जीआरनुसार पाणी वापर संस्थेद्वारे सिंचन व्यवस्थापन करणे बंधनकारक होते. कागदोपत्री अशा संस्था भरपूर आहेत, मात्र पाणी सोडण्याच्या व त्याच्या नियोजनाच्या किल्ल्या राजकारण्यांच्याच हाती आहेत. साधे ठेकेदाराचे बिल कधी द्यायचे यासाठीही ‘वरतून’ सूचना येण्याची वाट पाहणारे अधिकारी पाणी वाटपाचे निर्णय शेतकºयांच्या हाती कसे देतील, अशी टीकाही एका निवृत्त सचिवाने केली.ते म्हणाले, शेतकºयाने स्वत:चे शेत प्रमाणित करून द्यावे व त्याबदल्यात शासनाने देखभाल दुरुस्तीपोटी होणारा खर्च अनुदान म्हणून पाणी वापर संस्थांना द्यावा असे केले तर पाणी वापर संस्थाही बळकट होतील. शिवाय या सगळ्या व्यवहारातला भ्रष्टाचारही कमी होईल. पण हे करण्याची कोणाची मानसिकता नाही.बिगर सिंचनाचीवसुली कमी खर्चातबिगर सिंचनाची पाणीपट्टी महापालिका, नगरपालिका, विविध प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना, एम.आय.डी.सी. आदींकडून वसूल केली जाते. मीटरनुसार बिलही दिले जाते व ते शासनाचे अन्य विभाग भरूनही टाकतात. त्यामुळे त्यासाठी फार खर्च आणि कष्ट होत नाहीत.पाण्यावर चालतेस्थानिक राजकारणकोणत्या गावाला किती व कधी पाणी सोडायचे यावर स्थानिक नेत्यांचे राजकारण अवलंबून आहे. पाण्यावरून वेठीस धरून राजकारण करण्याची परंपरा खंडित करण्याची मानसिकता कोणाचीही नाही, ही वस्तुस्थिती आहे.पाटकरी, शाखाधिकारी यांच्याकडून गडबड होते हे खरे आहे. यासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याचे व मानवी हस्तक्षेप कमी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यात सुधारणा होतील. देखभाल दुरुस्तीअभावी मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जाते ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठी जास्तीचा निधी लागेल.- गिरीश महाजन, जलसंपदामंत्री२०१५-१६ ते २०१७-१८ या तीन वर्षांतील खर्चवर्ष वेतन/वेतनेतर कार्यालयीन खर्च देखभाल दुरुस्ती२०१५-१६ ६८२.०६ ६.५८ १८१.३५२०१६-१७ ६५३.०७ ७.७३ १४०.७७२०१७-१८ ६९८.६७ १०.०० अंदाजे १५०.०० अंदाजे