शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

प्रश्न १८३३ कोटींचा : वसुलीपेक्षा खर्च मोठा, सिंचन पाणीपट्टी माफ करणार

By अतुल कुलकर्णी | Updated: June 24, 2018 05:38 IST

१८३३ कोटींची पाणीपट्टी वसुली करण्यासाठी जलसंपदा विभागाने तीन वर्षात वसुलीच्या दीडपट खर्च केला आहे़

मुंबई : १८३३ कोटींची पाणीपट्टी वसुली करण्यासाठी जलसंपदा विभागाने तीन वर्षात वसुलीच्या दीडपट खर्च केला आहे़ वसुलीतील भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांची अडवणूक थांबवण्यासाठी सिंचनाची पाणीपट्टीच माफ करण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे़राज्यात सिंचन आणि बिगर सिंचन अशी दोन प्रकारची पाणीपट्टी वसूल केली जाते. २०१५-१६ ते २०१७-१८ या काळात दोन्हींची मिळून १८३३.६३ कोटी रुपये वसुली झाली. मात्र यासाठी वेतन व वेतनेतर, कार्यालयीन आणि देखभाल दुरुस्ती असा एकूण खर्च २५०० कोटींच्या घरात गेला.सिंचनाची पाणीपट्टी शेतकºयांकडून वसूल केली जाते. ती करताना पाटकरी, शाखाधिकारी शेतकºयांना भीती दाखवून ‘वरकमाई’ करतात. हे सगळ्या जलसंपदा विभागाला माहिती आहे, पण त्यासाठी वरिष्ठांचे अभय असल्याने शेतकºयांची पिळवणूक सुरूच आहे़ नोव्हेंबर २०१६ च्या जीआरनुसार पाणी वापर संस्थेद्वारे सिंचन व्यवस्थापन करणे बंधनकारक होते. कागदोपत्री अशा संस्था भरपूर आहेत, मात्र पाणी सोडण्याच्या व त्याच्या नियोजनाच्या किल्ल्या राजकारण्यांच्याच हाती आहेत. साधे ठेकेदाराचे बिल कधी द्यायचे यासाठीही ‘वरतून’ सूचना येण्याची वाट पाहणारे अधिकारी पाणी वाटपाचे निर्णय शेतकºयांच्या हाती कसे देतील, अशी टीकाही एका निवृत्त सचिवाने केली.ते म्हणाले, शेतकºयाने स्वत:चे शेत प्रमाणित करून द्यावे व त्याबदल्यात शासनाने देखभाल दुरुस्तीपोटी होणारा खर्च अनुदान म्हणून पाणी वापर संस्थांना द्यावा असे केले तर पाणी वापर संस्थाही बळकट होतील. शिवाय या सगळ्या व्यवहारातला भ्रष्टाचारही कमी होईल. पण हे करण्याची कोणाची मानसिकता नाही.बिगर सिंचनाचीवसुली कमी खर्चातबिगर सिंचनाची पाणीपट्टी महापालिका, नगरपालिका, विविध प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना, एम.आय.डी.सी. आदींकडून वसूल केली जाते. मीटरनुसार बिलही दिले जाते व ते शासनाचे अन्य विभाग भरूनही टाकतात. त्यामुळे त्यासाठी फार खर्च आणि कष्ट होत नाहीत.पाण्यावर चालतेस्थानिक राजकारणकोणत्या गावाला किती व कधी पाणी सोडायचे यावर स्थानिक नेत्यांचे राजकारण अवलंबून आहे. पाण्यावरून वेठीस धरून राजकारण करण्याची परंपरा खंडित करण्याची मानसिकता कोणाचीही नाही, ही वस्तुस्थिती आहे.पाटकरी, शाखाधिकारी यांच्याकडून गडबड होते हे खरे आहे. यासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याचे व मानवी हस्तक्षेप कमी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यात सुधारणा होतील. देखभाल दुरुस्तीअभावी मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जाते ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठी जास्तीचा निधी लागेल.- गिरीश महाजन, जलसंपदामंत्री२०१५-१६ ते २०१७-१८ या तीन वर्षांतील खर्चवर्ष वेतन/वेतनेतर कार्यालयीन खर्च देखभाल दुरुस्ती२०१५-१६ ६८२.०६ ६.५८ १८१.३५२०१६-१७ ६५३.०७ ७.७३ १४०.७७२०१७-१८ ६९८.६७ १०.०० अंदाजे १५०.०० अंदाजे