शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

क्वीन्स नेकलेस अखेर लखलखणार !

By admin | Updated: August 13, 2015 03:01 IST

महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी मरिन ड्राइव्हवर लवकरात लवकर पिवळे एलईडी दिवे लावण्याचे निर्देश एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हिस लिमिटेड कंपनीला दिले आहेत.

मुंबई : महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी मरिन ड्राइव्हवर लवकरात लवकर पिवळे एलईडी दिवे लावण्याचे निर्देश एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हिस लिमिटेड कंपनीला दिले आहेत. त्यामुळे रया गेलेला मुंबापुरीचा क्वीन नेकलेस आता पुन्हा एकदा पिवळ्या दिव्यांनी लखलखणार आहे. मुंबईची गेलेली शोभा परतणार आहे.मुंबई उच्च न्यायालयाने मरिन ड्राइव्हच्या रस्त्यांवर पुन्हा जुनेच पिवळे दिवे लावण्याचे आदेश शुक्रवारी राज्य शासनाला दिले होते. यावर एनर्जी एफिशन्सी सर्व्हिसेस लिमिटेडने न्यायालयात पिवळे एलईडी दिवे लावण्यासंदर्भात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. या पुनर्विचार याचिकेवर न्यायालयाने मरिन ड्राइव्हवर पिवळे एलईडी दिवे लावण्याची परवानगी दिली आहे, अशी माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली. न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिका आयुक्तांनीही एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हिस लिमिटेडला मरिन ड्राइव्हवर पिवळे एलईडी दिवे लावण्याच्या सूचना केल्या आहेत.(प्रतिनिधी)एलईडी वापरल्यास १० कोटी युनिट वीज वाचेल : एलईडी दिवे बसविण्याहून महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये रंगलेला वाद चव्हाट्यावर आला होता. शिवसेनेने क्वीन नेकलेसवरील दिवे बदलण्यास विरोध दर्शविला असतानाच ही योजना पर्यावरणपूरक, ऊर्जा बचत करणारी आणि महापालिकेचा पैसा वाचविणारी असल्याचा सूर भाजपाने लावला होता. रस्त्यांवर एलईडी दिव्यांचा वापर सुरू केल्यानंतर १० कोटी युनिट वीज वाचेल, असा दावा भाजपाने केला होता. भाजपप्रणीत योजनेला शिवसेनेने विरोध दर्शविल्याने त्याचे राजकारणात पडसाद उमटले होते.