शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पक्षी स्थलांतराचे कोडे अद्याप न उलगडलेले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 11:11 IST

मागोवा घेण्याचे काम सुरू; ‘पाणथळ जागा व स्थलांतरित पक्षी’ यावर आंतरराष्ट्रीय परिषद

लोणावळा : पक्ष्यांचे स्थलांतर अद्यापही न उलगडलेले कोडे आहे, असे मत बर्ड लाइफ इंटरनॅशनलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पँट्रीशिया झुरीटा यांनी व्यक्त केले. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतर्फे लोणावळा येथे १८ ते २२ नोव्हेंबर दरम्यान ‘पाणथळ जागा व स्थलांतरित पक्षी’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी दुपारी या परिषदेचे उद्घाटन झुरीटा यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या वेळी त्या बोलत होत्या. पक्ष्यांच्या जीवनातील स्थलांतर हा अत्यंत अविभाज्य भाग असून, पक्ष्यांच्या स्थलातराच्या प्रश्नांचा मागोवा घेण्याचे काम जगभरात सुरू झाले आहे, असेही त्या म्हणाल्या.आंतरराष्ट्रीय परिषदेच्या मंचावर बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे अध्यक्ष होमी खुसरोखान, संचालक डॉ. दीपक आपटे उपस्थित होते. या परिषदेला केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालय, राज्य शासन व मन्ग्रोव्ह फाउंडेशन यांचे सहकार्य मिळाले आहे.पँट्रीशिया झुरीटा या वेळी म्हणाल्या, पक्ष्यांच्या जीवनातील स्थलांतर हा अत्यंत अविभाज्य भाग आहे. याबाबतचे तंत्रज्ञान प्रगत झाले आहे. पक्ष्यांंचे उड्डाणमार्ग समजू लागले आहेत. पण आर्क्टिक टर्नसारखा शंभर ग्रॅम वजनाचा पक्षी १९ हजार मैलांचे अंतर पार करतो तेव्हा थक्क होण्यास होते. हे तो कसे करतो, कशासाठी करतो यासह अनेक प्रश्नांचा मागोवा घेण्याचे काम जगभरात सुरू आहे. समृद्ध पाणथळीबाबत बोलताना त्या म्हटल्या की, या जागा संपन्न पर्यावरणाचे द्योतक आहे.डॉ. दीपक आपटे म्हणाले, पक्षी स्थलांतर अभ्यासाची बीएनएचएसला नऊ दशकांची परंपरा आहे. या विषयावर दीर्घ संशोधन सुरू आहे. या विषयाचे महत्त्व सरकारी पातळीवर नेऊन पाणथळ जागांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आज देशातील एकोणीस राज्यांतील पाणथळींचा अभ्यास सुरू असून त्यासाठी राष्ट्रीय कृती आराखड्याची स्थापना झाली आहे. दरम्यान, होमी खुसरोखान यांनी बीएनएचएसच्या वाटचालीचा आढावा घेतला. या पाच दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी ४५ राष्ट्रीय व २८ आंतरराष्ट्रीय वक्ते उपस्थित आहेत. याशिवाय अनेक पक्षी अभ्यासकही येथे उपस्थित आहेत.पाणथळी जागा अमूल्य असे वरदान!नेदरलँड्स येथील वेटलँड इंटरनॅशनलचे वरिष्ठ तांत्रिक अधिकारी आणि पक्षी अभ्यासक डॉक्टर तेज मुंडकुर म्हणाले, समृद्ध पाणथळी जागा या स्थलांतरित पक्ष्यांसाठी अमूल्य, असे वरदान आहे. जगभरातील पाणथळी जागा बिकट अवस्थेत आहेत. सांडपाणी, पाणीप्रदूषण, वेगाने होणारे शहरीकरण, धरणे, हवामान बदलासह अनेक बाबींमुळे ही बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.या सर्वांचा फटका स्थलांतरित पक्ष्यांना बसत आहे. गेल्या काही वर्षांतील अभ्यासातून ही बाब पुढे आली आहे. लोकसंख्या वाढ, पक्ष्यांच्या अभ्यासाबाबत अनास्था, स्थलांतराबाबत अपुरी माहिती, दोन देशांत या विषयाबाबत समन्वय नसणे, अपुरी साधनसामग्री यावरही त्यांनी विवेचन केले.