शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
3
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
4
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
5
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
6
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
7
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
8
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
9
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
10
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
11
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
12
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
13
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
14
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
15
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
16
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
17
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
18
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
19
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
20
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार

तूर खरेदीची चौकशी करणार

By admin | Updated: April 26, 2017 02:19 IST

राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांनीच तुरीची विक्री नाफेडला करीत, स्वत:चे चांगभलं करून घेतल्याचे वृत्त आज ‘लोकमत’ने दिल्यानंतर त्याची गंभीर दखल घेत

मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांनीच तुरीची विक्री नाफेडला करीत, स्वत:चे चांगभलं करून घेतल्याचे वृत्त आज ‘लोकमत’ने दिल्यानंतर त्याची गंभीर दखल घेत, या प्रकरणी चौकशीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. २२ एप्रिलपर्यंत खरेदी केंद्रांवर आणलेल्या संपूर्ण तुरीची खरेदी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत खरेदी करण्यात आलेल्या ४० लाख क्विंटल तुरीपैकी निम्मी तूर ही व्यापाऱ्यांनी कमी भावाने शेतकऱ्यांकडून आधीच खरेदी करून नंतर नाफेडला ५ हजार ५० रुपये क्विंटलने विकल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज कृषी, पणन, सहकार आणि अन्न व नागरी पुरवठा विभागाचे मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक मंत्रालयात घेतली. केंद्रावर आलेल्या शंभर शेतकऱ्यांपैकी कोणत्याही दहा शेतकऱ्यांची नावे निवडून चौकशी केली जाईल. सॅटेलाइटचा उपयोग करण्यात येईल. केंद्रावर आलेला माल त्या शेतकऱ्याचाच होता की, त्याच्या नावावर व्यापाऱ्यांनी मलिदा लाटला, हे चौकशीतून उघड होईल व तसे असल्यास जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी आजच्या बैठकीत दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. (विशेष प्रतिनिधी) शेतकरी उत्पादक कंपन्यांतही व्यापाऱ्यांनीच लाटला मलिदा!नाफेडच्या खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांच्या नावे व्यापाऱ्यांनीच तूर टाकून कोट्यवधी रुपये कमावल्याचा गंभीर आरोप होत असताना, आता शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या खरेदी केंद्रांवरही व्यापाऱ्यांनीच तूर विकून मलिदा लाटल्याचे आरोप होत आहेत. नाफेड व्यतिरिक्त ११७ शेतकरी उत्पादक कंपन्यांना तूर खरेदीचे अधिकार देण्यात आले होते.व्यापाऱ्यांनी कमी भावाने शेतकऱ्यांकडून (तीन ते साडेतीन हजार रुपये क्विंटल) तुरीची खरेदी केली आणि नंतर तीच तूर शेतकऱ्यांच्या नावावर शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या खरेदी केंद्रांवर ५ हजार ५० रुपये दरात विकली आणि प्रचंड नफा कमावल्याचे म्हटले जाते. या प्रकरणी चौकशी झाल्यास धक्कादायक माहिती समोर येऊ शकते. मंत्रालयाच्या दारात विक्रीयवतमाळ, करमाळा, पंढरपूर येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुुटुंबातील महिलांनी आणलेली तूरडाळ मंत्रालयाजवळ विकण्याचे आंदोलन आज जनता दल युनायटेडने केले. तासभरात शंभर किलो डाळ विकण्यात आली. प्रदेशाध्यक्ष आ.कपिल पाटील यांच्या नेतृत्वात सरकारी अनास्थेचा निषेध करण्यात आला.राज्यात आतापर्यंत ४० लाख क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली असून, आणखी १० लाख क्विंटल तुरीची खरेदी केली जाईल. २२ एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांनी केंद्रांवर आणलेल्या (ज्यांना टोकन दिलेले आहेत अशा) सर्व तुरीची खरेदी करण्यात येईल, अशी हमी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. आतापर्यंत ५ हजार ५० रुपये क्विंटल या आधारभूत किमतीने २ लाख ५८ हजार शेतकऱ्यांची ४० लाख क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. त्याची किंमत १ हजार ८३९ कोटी रुपये इतकी आहे. आणखी तूर खरेदीसाठी राज्य शासन एक हजार कोटी रुपये देणार आहे.