शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदीची चौकशी करणार

By admin | Updated: April 26, 2017 02:19 IST

राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांनीच तुरीची विक्री नाफेडला करीत, स्वत:चे चांगभलं करून घेतल्याचे वृत्त आज ‘लोकमत’ने दिल्यानंतर त्याची गंभीर दखल घेत

मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांनीच तुरीची विक्री नाफेडला करीत, स्वत:चे चांगभलं करून घेतल्याचे वृत्त आज ‘लोकमत’ने दिल्यानंतर त्याची गंभीर दखल घेत, या प्रकरणी चौकशीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. २२ एप्रिलपर्यंत खरेदी केंद्रांवर आणलेल्या संपूर्ण तुरीची खरेदी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत खरेदी करण्यात आलेल्या ४० लाख क्विंटल तुरीपैकी निम्मी तूर ही व्यापाऱ्यांनी कमी भावाने शेतकऱ्यांकडून आधीच खरेदी करून नंतर नाफेडला ५ हजार ५० रुपये क्विंटलने विकल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज कृषी, पणन, सहकार आणि अन्न व नागरी पुरवठा विभागाचे मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक मंत्रालयात घेतली. केंद्रावर आलेल्या शंभर शेतकऱ्यांपैकी कोणत्याही दहा शेतकऱ्यांची नावे निवडून चौकशी केली जाईल. सॅटेलाइटचा उपयोग करण्यात येईल. केंद्रावर आलेला माल त्या शेतकऱ्याचाच होता की, त्याच्या नावावर व्यापाऱ्यांनी मलिदा लाटला, हे चौकशीतून उघड होईल व तसे असल्यास जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी आजच्या बैठकीत दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. (विशेष प्रतिनिधी) शेतकरी उत्पादक कंपन्यांतही व्यापाऱ्यांनीच लाटला मलिदा!नाफेडच्या खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांच्या नावे व्यापाऱ्यांनीच तूर टाकून कोट्यवधी रुपये कमावल्याचा गंभीर आरोप होत असताना, आता शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या खरेदी केंद्रांवरही व्यापाऱ्यांनीच तूर विकून मलिदा लाटल्याचे आरोप होत आहेत. नाफेड व्यतिरिक्त ११७ शेतकरी उत्पादक कंपन्यांना तूर खरेदीचे अधिकार देण्यात आले होते.व्यापाऱ्यांनी कमी भावाने शेतकऱ्यांकडून (तीन ते साडेतीन हजार रुपये क्विंटल) तुरीची खरेदी केली आणि नंतर तीच तूर शेतकऱ्यांच्या नावावर शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या खरेदी केंद्रांवर ५ हजार ५० रुपये दरात विकली आणि प्रचंड नफा कमावल्याचे म्हटले जाते. या प्रकरणी चौकशी झाल्यास धक्कादायक माहिती समोर येऊ शकते. मंत्रालयाच्या दारात विक्रीयवतमाळ, करमाळा, पंढरपूर येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुुटुंबातील महिलांनी आणलेली तूरडाळ मंत्रालयाजवळ विकण्याचे आंदोलन आज जनता दल युनायटेडने केले. तासभरात शंभर किलो डाळ विकण्यात आली. प्रदेशाध्यक्ष आ.कपिल पाटील यांच्या नेतृत्वात सरकारी अनास्थेचा निषेध करण्यात आला.राज्यात आतापर्यंत ४० लाख क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली असून, आणखी १० लाख क्विंटल तुरीची खरेदी केली जाईल. २२ एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांनी केंद्रांवर आणलेल्या (ज्यांना टोकन दिलेले आहेत अशा) सर्व तुरीची खरेदी करण्यात येईल, अशी हमी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. आतापर्यंत ५ हजार ५० रुपये क्विंटल या आधारभूत किमतीने २ लाख ५८ हजार शेतकऱ्यांची ४० लाख क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. त्याची किंमत १ हजार ८३९ कोटी रुपये इतकी आहे. आणखी तूर खरेदीसाठी राज्य शासन एक हजार कोटी रुपये देणार आहे.