शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
2
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
3
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
4
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
5
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
6
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
7
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
8
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
9
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
10
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
11
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
12
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
13
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
14
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
15
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
16
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
17
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
18
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
19
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
20
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!

‘घोटभर’ पाण्यासाठी पुणेकरांचा ‘घसा’ कोरडा

By admin | Updated: August 3, 2016 00:34 IST

जिल्ह्यातील सिंचन योजनांसाठी गेल्या २0 दिवसांपासून दरदिवशी एक हजार क्युसेक्स पाणी सोडले

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून जिल्ह्यातील सिंचन योजनांसाठी गेल्या २0 दिवसांपासून दरदिवशी एक हजार क्युसेक्स पाणी सोडले जात असतानाच; पुणे महापालिकेस दिवसाआड असलेली पाणीकपात मागे घेण्यासाठी अवघे २00 एमएलडी पाणी देण्यास पाटबंधारे विभागाकडून नकार दिला जात आहे. विशेष म्हणजे गेल्या २0 दिवसांपासून हे पाणी कालव्याच्या माध्यमातून शहरातूनच जात असताना ते पालिकेला मिळत नसल्याने ऐन पावसाळ्यातही पुणेकरांना दिवसाआड पाणीकपातीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, पाण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये राजकारण रंगले असल्याने अवघ्या ‘घोटभर’ पाण्यासाठी पुणेकरांचा घसा कोरडाच असल्याचे चित्र दिसत आहे. >हवे अवघे २00 एमएलडी पाणी पाणीकपात मागे घेऊन पुणे शहराला दररोज एकवेळ पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेस अवघ्या २00 एमएलडी अतिरिक्त पाण्याची गरज आहे. शहराला दोन वेळ पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेस प्रतिदिन १२५0 एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी ११५0 एमएलडी आणि दिवसाआड पाणीपुरवठ्यासाठी ९५0 एमएलडी पाण्याची गरज आहे. हे जादा पाणी खडकवासला बंद जलवाहिनीतून घेणे शक्य आहे. त्यातच गेल्या २0 दिवसांपासून खडकवासला धरणातून दररोज ११00 क्युसेक्स पाणी सोडले जात आहे. या पाण्यातील अवघे २00 एमएलडी पाणी शहराला दिवसातून एकदा पुरविण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने आडमुठेपणा केला नसता तर २0 दिवसांपूर्वीच पाणीकपात मागे घेणे शक्य होते, अशी टीका होत आहे.>श्रेयवादाचा फटका पुणेकरांना का ? जूनच्या अखेरीस खडकवासला धरणसाखळीमधील धरणांमध्ये अवघा १.४२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. त्यातच जुलैच्या पहिल्याच आठवड्यात दमदार पाऊस सुरू झाल्याने धरणसाठा वाढण्यास सुरुवात झाली होती. या वेळी पाणीसाठा १0 टीएमसीच्या वर जाताच महापौरांनी घाईगडबडीने जलपूजन करून पाणीकपात मागे घेतली असल्याची घोषणा केली. मात्र, पालकमंत्री बापट यांनी त्यास नकार देत आॅगस्ट महिन्यात निर्णय घेण्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, पुन्हा पाऊस सुरू झाल्याने पाणीसाठा मागील वर्षीपेक्षा चार टीएमसीने अधिक आहे. त्यामुळे कालव्यातून जाणाऱ्या पाण्यातून पुणेकरांना जादा पाणी का नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. पाणीसाठा १९ टीएमसीवरमागील वर्षी खडकवासला धरणसाखळीत आॅक्टोबर २0१५ अखेर अवघे १५ टीएमसी पाणी होते. यातील केवळ साडेसात ते आठ टीएमसी पाणीच महापालिकेने गेल्या दहा महिन्यांत वापरले आहे. मात्र, या वर्षी आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच धरणांचा पाणीसाठा १९ टीएमसीच्या घरात पोहोचला आहे. तर आणखी दोन महिने चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविलेली आहे. तर ही धरणे ६४ टक्के भरलेली आहेत. त्यामुळे ही धरणे ८0 टक्के भरल्यानंतर पुढील पावसाचा विचार करून मर्यादित पाणीसाठा धरणांमध्ये ठेवावा लागणार असल्याने हे पाणी पुन्हा नदीत सोडले जाणार आहे. त्यामुळे अत्ता पासून महापालिकेस दररोज 100 एमएलडी जादा पाणी मिळाल्यास पुणेकरांना सहज दररोज एकवेळ पाणी देता येणार आहे.