शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

‘घोटभर’ पाण्यासाठी पुणेकरांचा ‘घसा’ कोरडा

By admin | Updated: August 3, 2016 00:34 IST

जिल्ह्यातील सिंचन योजनांसाठी गेल्या २0 दिवसांपासून दरदिवशी एक हजार क्युसेक्स पाणी सोडले

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून जिल्ह्यातील सिंचन योजनांसाठी गेल्या २0 दिवसांपासून दरदिवशी एक हजार क्युसेक्स पाणी सोडले जात असतानाच; पुणे महापालिकेस दिवसाआड असलेली पाणीकपात मागे घेण्यासाठी अवघे २00 एमएलडी पाणी देण्यास पाटबंधारे विभागाकडून नकार दिला जात आहे. विशेष म्हणजे गेल्या २0 दिवसांपासून हे पाणी कालव्याच्या माध्यमातून शहरातूनच जात असताना ते पालिकेला मिळत नसल्याने ऐन पावसाळ्यातही पुणेकरांना दिवसाआड पाणीकपातीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, पाण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये राजकारण रंगले असल्याने अवघ्या ‘घोटभर’ पाण्यासाठी पुणेकरांचा घसा कोरडाच असल्याचे चित्र दिसत आहे. >हवे अवघे २00 एमएलडी पाणी पाणीकपात मागे घेऊन पुणे शहराला दररोज एकवेळ पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेस अवघ्या २00 एमएलडी अतिरिक्त पाण्याची गरज आहे. शहराला दोन वेळ पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेस प्रतिदिन १२५0 एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी ११५0 एमएलडी आणि दिवसाआड पाणीपुरवठ्यासाठी ९५0 एमएलडी पाण्याची गरज आहे. हे जादा पाणी खडकवासला बंद जलवाहिनीतून घेणे शक्य आहे. त्यातच गेल्या २0 दिवसांपासून खडकवासला धरणातून दररोज ११00 क्युसेक्स पाणी सोडले जात आहे. या पाण्यातील अवघे २00 एमएलडी पाणी शहराला दिवसातून एकदा पुरविण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने आडमुठेपणा केला नसता तर २0 दिवसांपूर्वीच पाणीकपात मागे घेणे शक्य होते, अशी टीका होत आहे.>श्रेयवादाचा फटका पुणेकरांना का ? जूनच्या अखेरीस खडकवासला धरणसाखळीमधील धरणांमध्ये अवघा १.४२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. त्यातच जुलैच्या पहिल्याच आठवड्यात दमदार पाऊस सुरू झाल्याने धरणसाठा वाढण्यास सुरुवात झाली होती. या वेळी पाणीसाठा १0 टीएमसीच्या वर जाताच महापौरांनी घाईगडबडीने जलपूजन करून पाणीकपात मागे घेतली असल्याची घोषणा केली. मात्र, पालकमंत्री बापट यांनी त्यास नकार देत आॅगस्ट महिन्यात निर्णय घेण्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, पुन्हा पाऊस सुरू झाल्याने पाणीसाठा मागील वर्षीपेक्षा चार टीएमसीने अधिक आहे. त्यामुळे कालव्यातून जाणाऱ्या पाण्यातून पुणेकरांना जादा पाणी का नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. पाणीसाठा १९ टीएमसीवरमागील वर्षी खडकवासला धरणसाखळीत आॅक्टोबर २0१५ अखेर अवघे १५ टीएमसी पाणी होते. यातील केवळ साडेसात ते आठ टीएमसी पाणीच महापालिकेने गेल्या दहा महिन्यांत वापरले आहे. मात्र, या वर्षी आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच धरणांचा पाणीसाठा १९ टीएमसीच्या घरात पोहोचला आहे. तर आणखी दोन महिने चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविलेली आहे. तर ही धरणे ६४ टक्के भरलेली आहेत. त्यामुळे ही धरणे ८0 टक्के भरल्यानंतर पुढील पावसाचा विचार करून मर्यादित पाणीसाठा धरणांमध्ये ठेवावा लागणार असल्याने हे पाणी पुन्हा नदीत सोडले जाणार आहे. त्यामुळे अत्ता पासून महापालिकेस दररोज 100 एमएलडी जादा पाणी मिळाल्यास पुणेकरांना सहज दररोज एकवेळ पाणी देता येणार आहे.