शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

‘घोटभर’ पाण्यासाठी पुणेकरांचा ‘घसा’ कोरडा

By admin | Updated: August 3, 2016 00:34 IST

जिल्ह्यातील सिंचन योजनांसाठी गेल्या २0 दिवसांपासून दरदिवशी एक हजार क्युसेक्स पाणी सोडले

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून जिल्ह्यातील सिंचन योजनांसाठी गेल्या २0 दिवसांपासून दरदिवशी एक हजार क्युसेक्स पाणी सोडले जात असतानाच; पुणे महापालिकेस दिवसाआड असलेली पाणीकपात मागे घेण्यासाठी अवघे २00 एमएलडी पाणी देण्यास पाटबंधारे विभागाकडून नकार दिला जात आहे. विशेष म्हणजे गेल्या २0 दिवसांपासून हे पाणी कालव्याच्या माध्यमातून शहरातूनच जात असताना ते पालिकेला मिळत नसल्याने ऐन पावसाळ्यातही पुणेकरांना दिवसाआड पाणीकपातीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, पाण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये राजकारण रंगले असल्याने अवघ्या ‘घोटभर’ पाण्यासाठी पुणेकरांचा घसा कोरडाच असल्याचे चित्र दिसत आहे. >हवे अवघे २00 एमएलडी पाणी पाणीकपात मागे घेऊन पुणे शहराला दररोज एकवेळ पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेस अवघ्या २00 एमएलडी अतिरिक्त पाण्याची गरज आहे. शहराला दोन वेळ पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेस प्रतिदिन १२५0 एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी ११५0 एमएलडी आणि दिवसाआड पाणीपुरवठ्यासाठी ९५0 एमएलडी पाण्याची गरज आहे. हे जादा पाणी खडकवासला बंद जलवाहिनीतून घेणे शक्य आहे. त्यातच गेल्या २0 दिवसांपासून खडकवासला धरणातून दररोज ११00 क्युसेक्स पाणी सोडले जात आहे. या पाण्यातील अवघे २00 एमएलडी पाणी शहराला दिवसातून एकदा पुरविण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने आडमुठेपणा केला नसता तर २0 दिवसांपूर्वीच पाणीकपात मागे घेणे शक्य होते, अशी टीका होत आहे.>श्रेयवादाचा फटका पुणेकरांना का ? जूनच्या अखेरीस खडकवासला धरणसाखळीमधील धरणांमध्ये अवघा १.४२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. त्यातच जुलैच्या पहिल्याच आठवड्यात दमदार पाऊस सुरू झाल्याने धरणसाठा वाढण्यास सुरुवात झाली होती. या वेळी पाणीसाठा १0 टीएमसीच्या वर जाताच महापौरांनी घाईगडबडीने जलपूजन करून पाणीकपात मागे घेतली असल्याची घोषणा केली. मात्र, पालकमंत्री बापट यांनी त्यास नकार देत आॅगस्ट महिन्यात निर्णय घेण्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, पुन्हा पाऊस सुरू झाल्याने पाणीसाठा मागील वर्षीपेक्षा चार टीएमसीने अधिक आहे. त्यामुळे कालव्यातून जाणाऱ्या पाण्यातून पुणेकरांना जादा पाणी का नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. पाणीसाठा १९ टीएमसीवरमागील वर्षी खडकवासला धरणसाखळीत आॅक्टोबर २0१५ अखेर अवघे १५ टीएमसी पाणी होते. यातील केवळ साडेसात ते आठ टीएमसी पाणीच महापालिकेने गेल्या दहा महिन्यांत वापरले आहे. मात्र, या वर्षी आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच धरणांचा पाणीसाठा १९ टीएमसीच्या घरात पोहोचला आहे. तर आणखी दोन महिने चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविलेली आहे. तर ही धरणे ६४ टक्के भरलेली आहेत. त्यामुळे ही धरणे ८0 टक्के भरल्यानंतर पुढील पावसाचा विचार करून मर्यादित पाणीसाठा धरणांमध्ये ठेवावा लागणार असल्याने हे पाणी पुन्हा नदीत सोडले जाणार आहे. त्यामुळे अत्ता पासून महापालिकेस दररोज 100 एमएलडी जादा पाणी मिळाल्यास पुणेकरांना सहज दररोज एकवेळ पाणी देता येणार आहे.