शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
4
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
5
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
6
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
7
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
8
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
9
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
10
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
11
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
12
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
13
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
14
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
15
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
16
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
17
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
18
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
19
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
20
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार

टेनिस विश्वात पडणार ‘पुणेरी’ छाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 03:45 IST

भारतातील एकमेव एटीपी स्पर्धा असलेली ‘चेन्नई ओपन’ पुढील वर्षापासून पुण्यामध्ये खेळविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, पुढील वर्षापासून ही स्पर्धा ‘महाराष्ट्र ओपन’

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भारतातील एकमेव एटीपी स्पर्धा असलेली ‘चेन्नई ओपन’ पुढील वर्षापासून पुण्यामध्ये खेळविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, पुढील वर्षापासून ही स्पर्धा ‘महाराष्ट्र ओपन’ नावाने ओळखली जाणार असून, आता जागतिक टेनिसमध्ये महाराष्ट्राचे नाव चमकताना दिसेल. दरम्यान, सध्या ही स्पर्धा पुढील पाच वर्षांपर्यंत पुण्यात खेळविण्यात येईल, अशी माहिती एमएसएलटीएचे सचिव सुंदर अय्यर यांनी दिली.भारताच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा वेळापत्रकामध्ये मानाचे स्थान मिळवलेल्या चेन्नई ओपनमध्ये गेल्या २१ वर्षांत जगातील अनेक आघाडीच्या खेळाडूंनी आपले कौशल्य दाखवले आहे. विशेष म्हणजे, १५ ग्रँडस्लॅम विजेता असलेला स्पेनचा राफेल नदालनेही या स्पर्धेत आपली चमक दाखवली असून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावण्याच्या प्रवासामध्ये त्याने ही स्पर्धा महत्त्वाची असल्याचे म्हटले होते. तसेच, अनेक खेळाडूंनी नव्या मोसमातील आपली पहिली स्पर्धा म्हणून या स्पर्धेला महत्त्व दिले आहे. तसेच, या मानाच्या स्पर्धेचे यजमानपद मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेचे (एमएसएलटीए) सचिव सुंदर अय्यर आणि स्पर्धा निर्देशक प्रशांत सुतार यांनीही आनंद व्यक्त केला. जागतिक दर्जाच्या एटीपी स्पर्धेचे आम्ही आमच्या राज्यात स्वागत करतो. महाराष्ट्र ओपनच्या यजमानपदाचा आम्हाला अभिमान आहे. तसेच, प्रत्येक वर्षी या स्पर्धेत अव्वल दर्जाच्या खेळाडूंना निमंत्रित करुन, या स्पर्धेचा दर्जा आणखी उंचावू, असा विश्वास आम्ही देतो. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री चेन्नईमधून ही स्पर्धा बाहेर हलविण्याचा विचार सुरूच होता. तसेच स्पर्धा आयोजक ही स्पर्धा भारताबाहेर नेण्याचाही विचार सुरू होता. परंतु, मिळणारा प्रतिसाद पाहता ही स्पर्धा भारतातच होणे आवश्यक होते आणि त्यासाठी आम्ही पुढाकार घेतला. तसेच, ५ वर्षांनंतरही ही स्पर्धा महाराष्ट्रातच आयोजित करण्याचा आम्ही प्रयत्न करू. शिवाय, स्पर्धेमुळे महाराष्ट्राचे नाव एटीपी टेनिस वेळापत्रकामध्ये येणार असल्याचा अभिमान आहे. या स्पर्धेत जागतिक स्तरावरील अव्वल खेळाडूंना महाराष्ट्रात निमंत्रित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. - सुंदर अय्यर, सचिव एमएसएलटीए