शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
3
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
4
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
5
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
6
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
7
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
8
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
9
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
10
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
11
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
13
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
14
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
15
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
16
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
17
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
18
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
19
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
20
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  

पुणे विद्यापीठातील अभियांत्रिकीची ऑनलाईन परीक्षा बंद होणार ?

By admin | Updated: May 31, 2014 22:19 IST

विद्यापीठाने ५० गुणांची ऑनलाईन परीक्षा बंद करावी, अशी मागणी स्वत: विद्यार्थी,अभियांत्रिकी विद्याशाखेचे काही प्राध्यापक व विद्यापीठ अधिकार मंडळाच्या ज्येष्ठ सदस्यांकडूनही केली जात आहे.

पुणे : पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ५० गुणांची ऑनलाईन व ५० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाते. परंतु, विद्यापीठाने ५० गुणांची ऑनलाईन परीक्षा बंद करावी, अशी मागणी स्वत: विद्यार्थी,अभियांत्रिकी विद्याशाखेचे काही प्राध्यापक व विद्यापीठ अधिकार मंडळाच्या ज्येष्ठ सदस्यांकडूनही केली जात आहे. त्यामुळे ऑनलाईन परीक्षा बंद करण्याबाबत विद्यापीठातर्फे विचार केला जाणार का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.विद्यापीठातर्फे कला, वाणिज्य, विज्ञान आदी अभ्यासक्रमांसाठी ८०/२०चा पॅटर्न राबविला जात आहे. एकट्या अभियांत्रिकी विद्याशाखेसाठी ५०/५०चा पॅटर्न सुरू आहे. परंतु,त्यामुळे सुमार दर्जाचे विद्यार्थी तयार होत आहेत. तसेच ऑनलाईन परीक्षा पद्धतीसुद्धा सदोष आहे. विद्यार्थ्यांना गुगल किंवा इतर संकेतस्थळांवरून विविध प्रश्नांची उत्तरे सहज सापडतात. ऑनलाईन परीक्षेसाठी ऑनलाईन कॉपीची सुविधाच उपलब्ध आहे. त्यामुळे विद्यापीठाने ऑनलाईन पद्धत बंद करावी, अशी मागणी अधिसभेत करण्यात आली होती. अभियांत्रिकीच्या अनेक विद्यार्थ्यांनी स‘ा करून ऑनलाईन परीक्षा बंद करावी, या मागणीचे निवेदन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांना दिले आहे.विद्यापीठाचे माजी अधिसभा सदस्य डॉ. अतुल बागुल यांनी पुढाकार घेऊन अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. बागुल म्हणाले, विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेपूर्वी एक आठवडा अगोदर सर्व प्रश्न मिळत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना एकसारखी ऑनलाईन प्रश्नपत्रिकाही सोडवण्यास मिळत आहे. विद्यार्थी नापास होऊ नयेत आणि महाविद्यालयांना शुल्क मिळत रहावे, या उद्देशानेच ऑनलाईन परीक्षेचा घाट घातला जात आहे. परंतु, या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना पायाभूत ज्ञान मिळत नाही. परिणामी विद्यापीठातून सुमार दर्जाचे विद्यार्थी निर्माण होत असून त्यांना नोकर्‍या मिळविणेसुद्धा कठिण जाणार आहे.विद्या परिषदेत मांडणार भूमिका : अडसूळ अभियांत्रिकी प्रवेशाच्या पात्रतेच्या निकषात बदल करण्यात आला. त्यामुळे कमी टक्के गुण असलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रवेश मिळू लागला. त्यात विद्यापीठातर्फे घेतल्या जाणार्‍या ऑनलाईन परीक्षेमुळे सुमार दर्जाचे विद्यार्थी तयार होत आहेत. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना कोणतेही कौशल्य मिळत नाही. विद्यापीठातर्फे पारंपरिक अभ्यासक्रमांना ८०/२०चा पॅटर्न राबविला जात असताना केवळ अभियांत्रिकीला ५०/५० चा पॅटर्न का?, असा सवाल विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.अरूण अडसूळ यांनी उपस्थित केला असून ३ जून रोजी होणार्‍या विद्या परिषदेच्या बैठकीत सविस्तर भूमिका मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.