शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

डाळींनी गाठली शंभरी

By admin | Updated: June 19, 2016 02:18 IST

अत्यल्प पावसामुळे राज्यभरात दुष्काळाचे सावट पसरले असून, उत्पादन घटल्याने एपीएमसीच्या धान्य मार्केटमध्ये डाळींची आवक कमी झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे डाळींचे

- प्राची सोनवणे,  नवी मुंबईअत्यल्प पावसामुळे राज्यभरात दुष्काळाचे सावट पसरले असून, उत्पादन घटल्याने एपीएमसीच्या धान्य मार्केटमध्ये डाळींची आवक कमी झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे डाळींचे घाऊक दरही कडाडल्याने त्याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसत आहे. गेल्या आठवड्यात धान्य मार्केटमध्ये दिवसाला डाळींचे सरासरी १०९ ट्रक व २७६ टेम्पोंची आवक झाली होती. परंतु डाळींचे उत्पन्न घटल्याने या आठवड्यात दिवसाला डाळींचे सरासरी १०३ ट्रक २७० टेम्पोची आवक झाली आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून किरकोळ बाजारातील डाळींचे दर प्रतिकिलो दीडशे ते दोनशे रुपयांच्या घरात गेले आहेत. मागणी-पुरवठ्याचे गणित जुळेनागेल्यावर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने बळीराजावर मोठ्या प्रमाणात संकट ओढवले आहे. पाण्याअभावी उत्पादन घटल्याने मागणी तसा पुरवठा केला जात नाही. डिझेलचे वाढते दर, ट्रान्सपोर्टच्या वाढत्या खर्चामुळेही किमतींमध्ये वाढ झाली आहे. साठेबाजांवर कठोर कारवाई केली तर नक्कीच मागणी तसा पुरवठा करता येणे शक्य आहे. तूरडाळीची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे, मात्र त्यादृष्टीने उत्पादन न झाल्याने मागणीनुसार पुरवठा होत नसून किमती वाढल्या आहेत., असे ग्रेन राईस अ‍ॅण्ड आॅईल सिडस् मर्चंट असोसिएशन (ग्रोमा)चे सचिव पोपटलाल भंडारी यांनी सांगितले.सर्वच डाळींच्या किमतीत वाढ झाली असून, चणाडाळ १०० ते १३० रुपये किलो, मसूर डाळ ८० ते १०० रुपये, मूगडाळ ९० ते १२० रुपये, उडीद डाळ १५५ ते १८० रुपये किलो, वाल ८० ते ११० रुपये किलो, वाटाणे ६० ते ८० रुपये किलो आणि शेंगदाणे ९० ते १४० रुपये किलो दराने मिळत आहेत. घाऊक बाजारपेठेतील दरडाळप्रतिक्विंटल (कमीत कमी -जास्तीत जास्त)हरभरा ७,७०० - १०,६००मसूर डाळ६,२०० - ७,३००माठ ६,५०० - ७,३००मुग डाळ७,६०० - ८,१००उडीद डाळ१४,८०० - १६,०००वाल ७,१०० - ७,८००पांढरा वाटाणा३,६०० - ४,०००शेंगदाणे६,००० - ९,०००