शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

लबाड सरकारला खाली खेचा - शरद पवार; औरंगाबादला ‘हल्लाबोल’ मोर्चाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 05:42 IST

लबाडाचे आवतण जेवल्याशिवाय खरे नसते. सध्याचे सरकारही लबाड आहे. नुसतेच आश्वासने देतेय. ही आश्वासने पदरात पडल्याशिवाय काही खरे नाही. उत्पादन खर्चावर आधारित भाव देऊ व त्यात ५० टक्के नफा मिळवू, हे ताजे आश्वासन सपशेल खोटे आहे.

औरंगाबाद : लबाडाचे आवतण जेवल्याशिवाय खरे नसते. सध्याचे सरकारही लबाड आहे. नुसतेच आश्वासने देतेय. ही आश्वासने पदरात पडल्याशिवाय काही खरे नाही. उत्पादन खर्चावर आधारित भाव देऊ व त्यात ५० टक्के नफा मिळवू, हे ताजे आश्वासन सपशेल खोटे आहे. सरकार शेतक-यांची पुन्हा फसवणूक करीत आहे. त्यामुळे लबाडांना सत्तेतून बाहेर काढा, असे आवाहन शरद पवार यांनी येथे केले.केंद्र व राज्य सरकारच्या मराठवाडा विरोधी भूमिकेचा निषेध करून विकासप्रक्रिया सुरू करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीतर्फे ‘हल्लाबोल’ संघर्ष यात्रा काढण्यात आली. त्याचा समारोप शनिवारी येथे विराट सभेने झाला. आधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चा काढण्यात आला. शरद पवार यांनी केंद्र व राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली. ‘तीन तलाक’च्या मुद्द्यावरून सरकार धर्मात लुडबुड करीत आहे. कुराणाने ‘तीन तलाक’ सांगितलेले आहेत. एका धर्माच्या लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे, असा आरोप करून नोटाबंदीने कुणाचे भले झाले, असा मार्मिक सवालही त्यांनी केला.अजितदादांची पोलिसांना तंबीपत्रकारांना अडवून त्यांचे मोबाइल नंबर्स लिहून घेतले जात आहेत, अशी तक्रार अजित पवार यांच्यापर्यंत गेली आणि दादा खवळले. हे अजिबात सहन करणार नाही. पत्रकारांना त्रास देण्याची गरज नाही. त्यांना त्यांचे काम करू द्या. राज्यात एक प्रकारची आणीबाणी चालू आहे. जनतेचा आवाज दाबाल तर बटणं कोणती दाबायची हे जनता ठरवते, हे लक्षात ठेवा, असे त्यांनी सुनावले.- गाजर दाखविण्यालाही काही मर्यादा असतात. आता गाजरसुद्धा यांच्यामुळे बदनाम झाल्याची खरमरीत टीका आमदार अजित पवार यांनी केली. माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनीही मार्गदर्शन केले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी हल्लाबोल आंदोलनाचा कार्य अहवाल सादर करून उर्वरित महाराष्ट्रातही आंदोलन करण्याची घोषणा केली.महिलांना ५०टक्के आरक्षणद्या : सुप्रिया सुळेकेंद्र सरकार मुस्लीम महिलांना न्याय देण्यासाठी ‘तीन तलाक’विरोधी कायदा करीत आहे. महिलांना न्याय द्यायचाच असेल, तर सर्व क्षेत्रात ५० टक्के आरक्षण देण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAurangabadऔरंगाबाद