शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; जन्मदात्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
4
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
5
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
6
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
7
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
8
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
9
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
11
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
12
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
13
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
14
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
15
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
16
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
17
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
18
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर टाकण्याची धमकी: कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
19
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
20
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू

मनोरुग्ण निघाला १६० एकराचा मालक

By admin | Updated: September 20, 2016 02:05 IST

वाढलेली दाढी व केस, फाटलेले कपडे अशा अवतारात कित्येक महिन्यांपासून तो वेड्यासारखा फिरत होता़

नवनाथ शिंदे,

पिंपरी- वाढलेली दाढी व केस, फाटलेले कपडे अशा अवतारात कित्येक महिन्यांपासून तो वेड्यासारखा फिरत होता़ पुण्यातील जुना बाजाराच्या पुलाखाली एका पिशवीसह आणि काही सामानासह रात्रीच्या मुक्कामाला असायचा.विमनस्क अवस्थेत भटकत असताना फ रासखाना पोलिसांनी त्याची माहिती एका सामाजिक संस्थेला दिली़ संस्थेने उपचारासाठी त्याला येरवडा मनोरुग्णालयात दाखल केले़ दीड महिन्याच्या उपचारानंतर तो बरा झाला़ बोलू लागला़ मी इथे कसा, याची विचारणा करू लागला़ तपासाअंती तो तामिळनाडूतील १६० एकर जमिनीचा मालक असल्याचा उलगडा झाला. अखेर त्याच्या परिवाराला तो मिळाला. स्मृतिभ्रंश झालेला शिक्षित तरुण पुन्हा एकदा कुटुंबासह आपल्या राज्यात परतला़ व्यंकटेश नायडू (रा़ तामिळनाडू ) असे त्या कुबेराचे नाव आहे़शेतीची आवड नसल्याने आठ वर्षांपूर्वी तामिळनाडू राज्यातून तो पुण्यात नोकरीला आला होता़ काही दिवस नोकरी केल्यानंतर मानसिक ताणामुळे त्याचा स्मृतिभ्रंश झाला आणि तो रस्त्यांवर वेड्यासारखा फि रू लागला़ कित्येक महिने एकाच पुलाखाली राहत असल्याने शेजारील लोक आणि परिसरातील व्यावसायिकांशी त्याची गट्टी झाली होती़ काही दिवसांनी फ रासखाना पोलिसांनी स्माइल ग्रुपचे संचालक योगेश मालखरे यांना त्याची माहिती दिली़ मालखरेंनी त्याला उपचारासाठी मनोरुग्णालयात दाखल केले़ उपचारानंतर त्याने स्वत:चे नाव, घराचा पत्ता सांगितला़ त्यानंतर पुणे पोलिसांनी तामिळनाडूतील पोलिसांशी संपर्क साधून त्याच्या कुटुंबाला माहिती दिली़ नायडूच्या कुटुंबाने पुण्यातील ओळखीच्या लोकांना संपर्क साधून अधिक माहिती मिळवली आणि ते पुण्यात दाखल झाले़ सुमारे आठ वर्षांपासून घरातून निघून आलेला आपला भाऊ पाहताच त्याला घ्यायला आलेल्या बहीण आणि भावाला अश्रूंचा पाझर फु टला़ अनेक दिवसांनंतर आपण बोलू लागलो, परिवाराची झालेली भेट आणि स्मृतिभ्रंश विकारातून बरा होऊन थेट कुटुंबाशी संवाद याचा आनंद व्यंकटेशच्या डोळ्यात दिसत होता़रुग्णालयातून सुटका झाल्यानंतर व्यंकटेशने स्माइल ग्रुपच्या सदस्यांसह ज्या ठिकाणी तो अनेक वर्षे पुलाखाली स्मृतिभ्रंश झाल्याने राहत होता तेथे जाऊन त्याला जेवण देणाऱ्या लोकांना भेटला़ >वेड्यासारखा भटकणारा व्यंकटेश आता बरा होऊन त्याच्या गावाला जाणार असल्याने सुमारे २०० ते २५० जण त्याला भेटायला आले होते़ काही दिवसांपूर्वी तामिळनाडूला जाताना त्याने हात जोडत नमस्कार करीत पुण्याचा निरोप घेतला़ तो अनेक वर्षे पुलाखाली स्मृतिभ्रंश झाल्याने राहत होता. स्माईल ग्रुपच्या सदस्यांनी त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. उपचारानंतर तो बरा झाल्यानंतर स्वगृही परतला.