शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
2
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
3
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
4
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
7
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
8
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
9
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
10
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
11
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
12
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
13
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
14
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
15
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
16
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
18
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
19
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
20
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?

४३ शहरांना शाश्वत पाणीपुरवठा करणार

By admin | Updated: August 13, 2015 03:39 IST

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेच्या स्पर्धेत पिछाडीवर पडलेल्या मराठवाडा व विदर्भातील ४३ छोट्या शहरांवर शाश्वत पाणीपुरवठ्याच्या योजनेचे अमृत शिंपडण्यात येणार आहे.

- संदीप प्रधान,  मुंबईकेंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेच्या स्पर्धेत पिछाडीवर पडलेल्या मराठवाडा व विदर्भातील ४३ छोट्या शहरांवर शाश्वत पाणीपुरवठ्याच्या योजनेचे अमृत शिंपडण्यात येणार आहे. दोन हजार कोटी रुपयांच्या या योजनेकरिता केंद्र सरकार एक हजार कोटी रुपये देणार असून, उर्वरित रक्कम राज्य शासन व संबंधित शहरांतील स्थानिक स्वराज्य संस्थांना उभे करावे लागणार आहेत.केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेकरिता महाराष्ट्रातून १० शहरांच्या नावाची शिफारस करायची होती. याकरिता स्पर्धेत ४४ शहरे होती. मात्र या योजनेकरिता प्रत्येक शहरातील महापालिकेला पाच वर्षांत २५० कोटी रुपये उभे करायचे होते. साहजिकच मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नागपूरयासारख्या आर्थिकदृष्ट्या सक्षम शहरांनी बाजी मारली. येत्या दोन-तीन वर्षांत महापालिका निवडणुका असलेल्या शहरांचाच स्मार्ट सिटी योजनेत समावेश केला गेला, अशी टीका केली गेली. नांदेड शहराचा समावेश न झाल्याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी टीका केली होती. केंद्राची दुसरी योजना शाश्वत पाणीपुरवठ्याची आहे. या योजनेत पाणीपुरवठ्यातील गळती रोखणे, वितरण व्यवस्था सुधारणे, पाणीपट्टीची वसुली करण्याची यंत्रणा सुधारणे याचा समावेश आहे. एक लाखापेक्षा जास्त वस्ती असलेल्या ४३ शहरांचा या योजनेत समावेश केला जाणार आहे. स्मार्ट सिटी योजनेत समावेश झालेल्या शहरांखेरीज अन्य शहरांचा प्राधान्याने या योजनेत समावेश केला जाईल, असे नगरविकास खात्याच्या सचिव मनीषा म्हैसकर यांनी सांगितले. केंद्राच्या एक हजार कोटी रुपयांखेरीज उर्वरित एक हजार कोटी रुपये उभे करताना राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्था यांचा वाटा किती असेल, त्याचे सूत्र लवकरच नक्की केले जाईल. राज्यातील बहुतांश शहरातील लोकसंख्येला त्यांच्या गरजेइतका पाणीपुरवठा होत नाही. काही शहरांना पाणीपुरवठा पुरेसा केला जातो. मात्र वितरण व्यवस्था सदोष असल्याने नुकसान होते. मराठवाडा व विदर्भातील छोट्या शहरांवर या योजनेत लक्ष केंद्रित केले जाणार आहे.या शहरांचा समावेशसोलापूर, मीरा-भायंदर, भिवंडी, अमरावती, नांदेड, कोल्हापूर, उल्हासनगर, सांगली-मिरज-कुपवाड, मालेगाव, जळगाव, अकोला, लातूर, धुळे, अहमदनगर, चंद्रपूर, परभणी, ईचलकरंजी, जालना, अंबरनाथ, भूसावळ, पनवेल, बदलापूर, बीड, गोंदिया,सातारा, बार्शि, यवतमाळ, अचलपूर, उस्मानाबाद, नंदूरबार, वर्धा, उदगीर, हिंगनघाट