शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

४३ शहरांना शाश्वत पाणीपुरवठा करणार

By admin | Updated: August 13, 2015 03:39 IST

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेच्या स्पर्धेत पिछाडीवर पडलेल्या मराठवाडा व विदर्भातील ४३ छोट्या शहरांवर शाश्वत पाणीपुरवठ्याच्या योजनेचे अमृत शिंपडण्यात येणार आहे.

- संदीप प्रधान,  मुंबईकेंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेच्या स्पर्धेत पिछाडीवर पडलेल्या मराठवाडा व विदर्भातील ४३ छोट्या शहरांवर शाश्वत पाणीपुरवठ्याच्या योजनेचे अमृत शिंपडण्यात येणार आहे. दोन हजार कोटी रुपयांच्या या योजनेकरिता केंद्र सरकार एक हजार कोटी रुपये देणार असून, उर्वरित रक्कम राज्य शासन व संबंधित शहरांतील स्थानिक स्वराज्य संस्थांना उभे करावे लागणार आहेत.केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेकरिता महाराष्ट्रातून १० शहरांच्या नावाची शिफारस करायची होती. याकरिता स्पर्धेत ४४ शहरे होती. मात्र या योजनेकरिता प्रत्येक शहरातील महापालिकेला पाच वर्षांत २५० कोटी रुपये उभे करायचे होते. साहजिकच मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नागपूरयासारख्या आर्थिकदृष्ट्या सक्षम शहरांनी बाजी मारली. येत्या दोन-तीन वर्षांत महापालिका निवडणुका असलेल्या शहरांचाच स्मार्ट सिटी योजनेत समावेश केला गेला, अशी टीका केली गेली. नांदेड शहराचा समावेश न झाल्याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी टीका केली होती. केंद्राची दुसरी योजना शाश्वत पाणीपुरवठ्याची आहे. या योजनेत पाणीपुरवठ्यातील गळती रोखणे, वितरण व्यवस्था सुधारणे, पाणीपट्टीची वसुली करण्याची यंत्रणा सुधारणे याचा समावेश आहे. एक लाखापेक्षा जास्त वस्ती असलेल्या ४३ शहरांचा या योजनेत समावेश केला जाणार आहे. स्मार्ट सिटी योजनेत समावेश झालेल्या शहरांखेरीज अन्य शहरांचा प्राधान्याने या योजनेत समावेश केला जाईल, असे नगरविकास खात्याच्या सचिव मनीषा म्हैसकर यांनी सांगितले. केंद्राच्या एक हजार कोटी रुपयांखेरीज उर्वरित एक हजार कोटी रुपये उभे करताना राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्था यांचा वाटा किती असेल, त्याचे सूत्र लवकरच नक्की केले जाईल. राज्यातील बहुतांश शहरातील लोकसंख्येला त्यांच्या गरजेइतका पाणीपुरवठा होत नाही. काही शहरांना पाणीपुरवठा पुरेसा केला जातो. मात्र वितरण व्यवस्था सदोष असल्याने नुकसान होते. मराठवाडा व विदर्भातील छोट्या शहरांवर या योजनेत लक्ष केंद्रित केले जाणार आहे.या शहरांचा समावेशसोलापूर, मीरा-भायंदर, भिवंडी, अमरावती, नांदेड, कोल्हापूर, उल्हासनगर, सांगली-मिरज-कुपवाड, मालेगाव, जळगाव, अकोला, लातूर, धुळे, अहमदनगर, चंद्रपूर, परभणी, ईचलकरंजी, जालना, अंबरनाथ, भूसावळ, पनवेल, बदलापूर, बीड, गोंदिया,सातारा, बार्शि, यवतमाळ, अचलपूर, उस्मानाबाद, नंदूरबार, वर्धा, उदगीर, हिंगनघाट