शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

४३ शहरांना शाश्वत पाणीपुरवठा करणार

By admin | Updated: August 13, 2015 03:39 IST

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेच्या स्पर्धेत पिछाडीवर पडलेल्या मराठवाडा व विदर्भातील ४३ छोट्या शहरांवर शाश्वत पाणीपुरवठ्याच्या योजनेचे अमृत शिंपडण्यात येणार आहे.

- संदीप प्रधान,  मुंबईकेंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेच्या स्पर्धेत पिछाडीवर पडलेल्या मराठवाडा व विदर्भातील ४३ छोट्या शहरांवर शाश्वत पाणीपुरवठ्याच्या योजनेचे अमृत शिंपडण्यात येणार आहे. दोन हजार कोटी रुपयांच्या या योजनेकरिता केंद्र सरकार एक हजार कोटी रुपये देणार असून, उर्वरित रक्कम राज्य शासन व संबंधित शहरांतील स्थानिक स्वराज्य संस्थांना उभे करावे लागणार आहेत.केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेकरिता महाराष्ट्रातून १० शहरांच्या नावाची शिफारस करायची होती. याकरिता स्पर्धेत ४४ शहरे होती. मात्र या योजनेकरिता प्रत्येक शहरातील महापालिकेला पाच वर्षांत २५० कोटी रुपये उभे करायचे होते. साहजिकच मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नागपूरयासारख्या आर्थिकदृष्ट्या सक्षम शहरांनी बाजी मारली. येत्या दोन-तीन वर्षांत महापालिका निवडणुका असलेल्या शहरांचाच स्मार्ट सिटी योजनेत समावेश केला गेला, अशी टीका केली गेली. नांदेड शहराचा समावेश न झाल्याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी टीका केली होती. केंद्राची दुसरी योजना शाश्वत पाणीपुरवठ्याची आहे. या योजनेत पाणीपुरवठ्यातील गळती रोखणे, वितरण व्यवस्था सुधारणे, पाणीपट्टीची वसुली करण्याची यंत्रणा सुधारणे याचा समावेश आहे. एक लाखापेक्षा जास्त वस्ती असलेल्या ४३ शहरांचा या योजनेत समावेश केला जाणार आहे. स्मार्ट सिटी योजनेत समावेश झालेल्या शहरांखेरीज अन्य शहरांचा प्राधान्याने या योजनेत समावेश केला जाईल, असे नगरविकास खात्याच्या सचिव मनीषा म्हैसकर यांनी सांगितले. केंद्राच्या एक हजार कोटी रुपयांखेरीज उर्वरित एक हजार कोटी रुपये उभे करताना राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्था यांचा वाटा किती असेल, त्याचे सूत्र लवकरच नक्की केले जाईल. राज्यातील बहुतांश शहरातील लोकसंख्येला त्यांच्या गरजेइतका पाणीपुरवठा होत नाही. काही शहरांना पाणीपुरवठा पुरेसा केला जातो. मात्र वितरण व्यवस्था सदोष असल्याने नुकसान होते. मराठवाडा व विदर्भातील छोट्या शहरांवर या योजनेत लक्ष केंद्रित केले जाणार आहे.या शहरांचा समावेशसोलापूर, मीरा-भायंदर, भिवंडी, अमरावती, नांदेड, कोल्हापूर, उल्हासनगर, सांगली-मिरज-कुपवाड, मालेगाव, जळगाव, अकोला, लातूर, धुळे, अहमदनगर, चंद्रपूर, परभणी, ईचलकरंजी, जालना, अंबरनाथ, भूसावळ, पनवेल, बदलापूर, बीड, गोंदिया,सातारा, बार्शि, यवतमाळ, अचलपूर, उस्मानाबाद, नंदूरबार, वर्धा, उदगीर, हिंगनघाट