शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

शेतमालाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी

By admin | Updated: April 8, 2017 01:47 IST

ग्राहक आणि शेतकरी हा थेट दुवा जोडण्याची आवश्यकता आहे

बारामती : ग्राहक आणि शेतकरी हा थेट दुवा जोडण्याची आवश्यकता आहे. त्यातून शेतमाल विक्रीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वाजवी भाव आणि ग्राहकांना योग्य दरात शेतमाल ही संकल्पना यशस्वी होऊ शकते. शेतमालाला हमीभाव आणि हक्काची बाजारपेठ प्रत्येक तालुक्यात उपलब्ध झाली पाहिजे, असे मत अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी येथे व्यक्त केले.ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्र व बाजार समितीच्या वतीने आयोजित पाचव्या धान्य महोत्सवाचे उद्घाटन त्यांच्यासह नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, अतारीचे संचालक डॉ. लखनसिंग यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वेळी संस्थेचे विश्वस्त विष्णूपंत हिंगणे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. सय्यद शाकीरअली, उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे, बाजार समितीचे संचालक राजेंद्र बोरकर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)या वेळी पवार म्हणाल्या, शेतकऱ्यांना वाजवी भाव आणि ग्राहकांना योग्य दरात शेतमाल ही संकल्पना यशस्वी होऊ शकते. त्यासाठी अगदी गावनिहाय, केंद्रनिहाय कायमस्वरूपी असे उपक्रम राबवावेत. यावर्षीच्या धान्य महोत्सवात शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले खपली, गहू, ज्वारीच्या विविध जातींचे उत्पादन, बाजरी, तांदूळ, कडधान्ये, देवगड व हापूस आंबा, डाळी, प्रक्रियायुक्त पदार्थ, मातीची भांडी असे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. एकूण ५७ स्टॉल या महोत्सवात आहेत. महिला बचत गटही यामध्ये सहभागी आहेत.