शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

शेतमालाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी

By admin | Updated: April 8, 2017 01:47 IST

ग्राहक आणि शेतकरी हा थेट दुवा जोडण्याची आवश्यकता आहे

बारामती : ग्राहक आणि शेतकरी हा थेट दुवा जोडण्याची आवश्यकता आहे. त्यातून शेतमाल विक्रीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वाजवी भाव आणि ग्राहकांना योग्य दरात शेतमाल ही संकल्पना यशस्वी होऊ शकते. शेतमालाला हमीभाव आणि हक्काची बाजारपेठ प्रत्येक तालुक्यात उपलब्ध झाली पाहिजे, असे मत अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी येथे व्यक्त केले.ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्र व बाजार समितीच्या वतीने आयोजित पाचव्या धान्य महोत्सवाचे उद्घाटन त्यांच्यासह नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, अतारीचे संचालक डॉ. लखनसिंग यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वेळी संस्थेचे विश्वस्त विष्णूपंत हिंगणे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. सय्यद शाकीरअली, उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे, बाजार समितीचे संचालक राजेंद्र बोरकर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)या वेळी पवार म्हणाल्या, शेतकऱ्यांना वाजवी भाव आणि ग्राहकांना योग्य दरात शेतमाल ही संकल्पना यशस्वी होऊ शकते. त्यासाठी अगदी गावनिहाय, केंद्रनिहाय कायमस्वरूपी असे उपक्रम राबवावेत. यावर्षीच्या धान्य महोत्सवात शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले खपली, गहू, ज्वारीच्या विविध जातींचे उत्पादन, बाजरी, तांदूळ, कडधान्ये, देवगड व हापूस आंबा, डाळी, प्रक्रियायुक्त पदार्थ, मातीची भांडी असे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. एकूण ५७ स्टॉल या महोत्सवात आहेत. महिला बचत गटही यामध्ये सहभागी आहेत.