शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
13
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
14
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
16
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
17
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
18
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
19
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
20
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

सुविधा द्या, मगच गाव सोडण्यास सांगा

By admin | Updated: June 16, 2014 01:11 IST

प्रकल्पबाधित स्थलांतरणाच्या विरोधात नाही, उलट त्यांची सहकार्याची भूमिका आहे. मात्र ज्या गावात जायचे आहे तेथे किमान पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्या, नंतरच स्थलांतरणाचे आदेश काढा,

गोसेखुर्द : संघर्ष समितीची विनंतीनागपूर : प्रकल्पबाधित स्थलांतरणाच्या विरोधात नाही, उलट त्यांची सहकार्याची भूमिका आहे. मात्र ज्या गावात जायचे आहे तेथे किमान पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्या, नंतरच स्थलांतरणाचे आदेश काढा, असे गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने म्हटले आहे.गोसेखुर्द प्रकल्पबाधित गावांपैकी नागपूर जिल्ह्यातील जीवनापूर,सिर्सी, खराडा व पांजरेपार या चार गावांना ३० जूनपर्यंत स्थलांतरण करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत. स्थलांतरणासाठी फक्त १५ दिवसांचा काळ शिल्लक आहे. गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शासनासाठी धरणातील पाण्याची पातळी वाढविणे महत्त्वाचे आहे. मात्र प्रकल्पबाधितांना सुविधा उपलब्ध करून देण्याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. प्रशासनाने स्थलांतरणासाठी नोटीस बजावल्या. पण गावकऱ्यांना ज्या गावात जायचे आहे तेथे नागरी सुविधाही नाहीत, याकडे संघर्ष समितीचे संयोजक विलास भोंगाडे यांनी लक्ष वेधले आहे. सिर्सीला स्थलांतरणाची नोटीस बजावण्यात आली आहे. या गावचे सोनपूर येथे पुनर्वसन करण्यात येणार आहे. तेथे विहीर खोदण्यात आली. पण त्यात पाणी नाही. पाणीच नसेल तर गावकरी राहतील कसे, असा सवाल त्यांनी केला. पाणी नसल्याने पुनर्वसित गावातील बांधकामेही थांबली आहेत. पुनर्वसित गावात किती सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या याचा सविस्तर आढावा प्रशासनाने घ्यावा तसेच सर्व प्रलंबित प्रश्नांचा निपटारा केल्यावर स्थलांतरणाचे आदेश काढावे, असे भोंगाडे यांनी सांगितले.अनेक पुनर्वसित गावात दहा वर्षापूर्वी कामे करण्यात आली. त्याची अवस्था सध्या दयनीय आहे. या कामाच्या दुरुस्तीची गरज असताना प्रशासन त्याबाबत गंभीर नाही. प्रकल्पबाधितांना त्यांच्या घराच्या कर्जाच्या रकमेवरील व्याज मिळाले नाही. यासंदर्भात प्रस्ताव पाठवण्यात आले. पण त्यावर निर्णय झाला नाही. याबाबत पाठपुरावाही केला जात नाही, याकडे भोंगाडे यांनी लक्ष वेधले. (प्रतिनिधी)