शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
5
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
6
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
7
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
8
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
9
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
10
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
11
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
12
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
13
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
14
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
15
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
16
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
18
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
19
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
20
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला

आंदोलक धरणापर्यंत पोहोचलेच नाहीत

By admin | Updated: March 12, 2016 01:34 IST

जमावबंदी आदेश लागू करून आंदोलकांना अर्ध्या रस्त्यातच पोलिसांनी आमदार संग्राम थोपटे यांच्यासह ताब्यात घेतल्याने ते धरणापर्यंत पोहोचलेच नाहीत.

मार्गासनी : जमावबंदी आदेश लागू करून आंदोलकांना अर्ध्या रस्त्यातच पोलिसांनी आमदार संग्राम थोपटे यांच्यासह ताब्यात घेतल्याने ते धरणापर्यंत पोहोचलेच नाहीत. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या बैठकीमध्ये समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने गुंजवणी धरणाचे काम बंद पाडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला होता. वेल्हे तालुक्यातील काँग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रवारी हे आंदोलन करण्यात आले. या वेळी येथील शिवगोरक्ष कार्यालयात झालेल्या सभेस आमदार संग्राम थोपटे, वेल्हे तालुका राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष शंकरराव भुरुक, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष दसवडकर, तालुकाध्यक्ष दिगंबर चोरघे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप लोहकरे, नाना राऊत, रामनाना कोकाटे, वेल्हेच्या सभापती सविता वाडघरे, चतुरा नगिणे, जिल्हा परिषद सदस्या वसुधा नलावडे, उपसभापती चंद्रकांत शेंडकर, भगवान पासलकर, आकाश वाडघरे, संदीप नगिने, गणपत देवगिरीकर आदी कार्यकर्ते व सुमारे ४०० धरणग्रस्त आंदोलनासाठी उपस्थित होते.जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांनी, ‘धरणग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही’ या दिलेल्या शब्दावर आम्ही विश्वास ठेवून आतापर्यंत वाट पाहिली. शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त करून आम्ही पाणी जाऊ देणार नाही. जलसंपदामंत्र्यांच्या तालुक्यात एक गुंठाही जमीन संपादित नाही. यावर ते एक शब्दही काढत नाहीत. मात्र पाणी नेण्यासाठी खटाटोप करत आहेत. आज होणाऱ्या आंदोलनासाठी मोठा पोलीस फौजफाटा पाठवून आंदोलन गप्प करण्याचा हा प्रयत्न धरणग्रस्त खपवून घेणार नाहीत़, असा इशारा या वेळी आमदार संग्राम थोपटे यांनी दिला. या वेळी भोरच्या प्रांताधिकारी मौसमी बर्डे, तहसीलदार रामलिंग चव्हाण, प्रकल्प अधिकारी आर. बी. पवार यांनी आंदोलकांची भेट घेऊन धरणाचे काम बंद न करण्याची विनंती केली. येत्या १४ मार्चला बैठक होणार असल्याचे सांगितले. मात्र, आंदोलकांनी बैठक घेईपर्र्यंत धरणाचे काम बंद करण्याची मागणी केली. मात्र त्यास नकार मिळाल्यावर थोपटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी धरणाकडे जाण्यास सुरुवात केली. पोलिसांनी धरणाकडे जाणारा रस्ता बंद करून थोपटे यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेतले. जमावबंदीचा आदेश मोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून जामिनावर सोडण्यात आले.बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, हवेलीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली कडूकर, पोलीस निरीक्षक एन. एम. सारंगकर, शाहीद पठाण यांच्यासह मोठा बंदोबस्त व राखीव पोलीस दल या वेळी तैनात करण्यात आले होते. (वार्ताहर)