शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
5
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
6
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
7
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
8
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
9
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
10
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
11
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
12
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
13
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
14
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
15
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
16
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
17
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
18
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
19
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
20
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो

कायद्याच्या चौकटीत प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन !

By admin | Updated: July 22, 2016 01:58 IST

प्रकल्पग्रस्तांची चळवळ पुढे घेवून जाण्यासाठी तरूणांनी पुढाकार घेतला आहे.

नवी मुंबई : प्रकल्पग्रस्तांची चळवळ पुढे घेवून जाण्यासाठी तरूणांनी पुढाकार घेतला आहे. भविष्यात सनदशीर मार्गाने व कायद्याच्या चौकटीत राहून हक्कांसाठीचा लढा सुरू ठेवला जाणार आहे. यासाठी संघटनात्मक बांधणी केली जाणार असून सोशल मीडिया, विधी, माहिती अधिकार व इतर कामांसाठी स्वतंत्र टीम तयार केल्या जाणार आहेत. नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांनी १८ जुलै रोजी पहिल्यांदा नवी मुंबई बंदचे आवाहन केले होते. आक्रमक म्हणून ओळख असणाऱ्या तरूणांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. महामार्गानजीक असलेल्या सानपाडा दत्तमंदिरजवळ प्रकल्पग्रस्तांचा मेळावा होणार असल्याने महामार्ग अडविला जाणार असल्याची चर्चा शहरभर सुरू झाली होती. व्यावसायिकांना धमकाविण्याची व रिक्षा, बसवर दगडफेक केली जाईल अशीही शक्यता वर्तविली जात होती. मोर्चाला ठोस अनुभवी नेतृत्व नसल्याने संतप्त जमावाला कोण रोखणार असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु आगरी कोळी युथ फाऊंडेशनने आंदोलन हे शांततेमध्ये व कायद्याच्या चौकटीत राहण्याचे आवाहन केल्यामुळे दिवसभरामध्ये एकही अनुचित प्रकार घडला नाही. कुठेही तोडफोड, रास्ता रोको झाले नाही. यामुळे चळवळीची धुरा नव्याने खांद्यावर घेतलेल्या तरूणांविषयी पोलिसांसह शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे. चळवळीची पुढील दिशा ठरविण्यासाठी बुधवारी रात्री कोपरखैरणेमधील शेतकरी समाजमंदिरामध्ये विशेष बैठकीचे आयोजन केले होते. ३०० पेक्षा जास्त तरूण या बैठकीला आले होते. या बैठकीमध्ये प्रकल्पग्रस्तांनी आतापर्यंत केलेल्या आंदोलनाची यशोगाथा सर्वांना सांगण्यात आली. कूळ कायद्यापासून विमानतळापर्यंतच्या सर्व लढ्यांवर प्रकाश टाकण्यात आला. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन व पाठपुरावा केला जाईल. कोणत्याही प्रकारे हिंसक आंदोलने केली जाणार नाहीत. कायद्याच्या चौकटीत राहून यापूर्वी अनेक प्रश्न सोडविण्यात आले आहेत. यापुढेही विविध समस्यांचा अभ्यास करण्यासाठी व त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी तरूणांच्या वेगवेगळ्या टीम तयार केल्या जातील. माहिती अधिकाराचा वापर करणे, कायदेविषयक मार्गदर्शन, गावपातळीवर समन्वय टीम, सेंट्रल युनिट अशाप्रकारे रचना करण्याचे बैठकीमध्ये निश्चित करण्यात आले. यावेळी संजय पाटील व मंगेश म्हात्रे यांनी बैठकीचा उद्देश पटवून दिला. नीलेश पाटील व राहुल ठाकूर यांनी उपस्थितांना चळवळ व नियोजनातील बदलांविषयी मार्गदर्शन केले. >प्रकल्पग्रस्तांच्या लढ्याचा इतिहास तरूणांच्या बैठकीमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या लढ्यावर प्रकाश टाकण्यात आला. पहिले आमदार व शेतकरी नेते नारायण नागू पाटील यांनी १९३२ ते १९३९ दरम्यान कूळ कायद्याविरोधात शेतकऱ्यांचा संप घडवून आणला. एवढ्या प्रदीर्घ काळ चाललेला शेतकऱ्यांचा हा जगातील एकमेव संप आहे. दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सिडको व शासनाविरोधात लढा. यामुळे साडेबारा टक्के योजना देणे शासनास भाग पडले. विमानतळ, सेस, जेएनपीटी विरोधात लढलेल्या लढ्यांविषयी माहिती यावेळी देण्यात आली.