शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
3
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
4
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
5
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
6
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
7
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
8
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
9
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
10
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
11
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
12
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
13
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
14
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
15
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
16
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
17
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
18
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
19
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
20
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

कायद्याच्या चौकटीत प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन !

By admin | Updated: July 22, 2016 01:58 IST

प्रकल्पग्रस्तांची चळवळ पुढे घेवून जाण्यासाठी तरूणांनी पुढाकार घेतला आहे.

नवी मुंबई : प्रकल्पग्रस्तांची चळवळ पुढे घेवून जाण्यासाठी तरूणांनी पुढाकार घेतला आहे. भविष्यात सनदशीर मार्गाने व कायद्याच्या चौकटीत राहून हक्कांसाठीचा लढा सुरू ठेवला जाणार आहे. यासाठी संघटनात्मक बांधणी केली जाणार असून सोशल मीडिया, विधी, माहिती अधिकार व इतर कामांसाठी स्वतंत्र टीम तयार केल्या जाणार आहेत. नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांनी १८ जुलै रोजी पहिल्यांदा नवी मुंबई बंदचे आवाहन केले होते. आक्रमक म्हणून ओळख असणाऱ्या तरूणांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. महामार्गानजीक असलेल्या सानपाडा दत्तमंदिरजवळ प्रकल्पग्रस्तांचा मेळावा होणार असल्याने महामार्ग अडविला जाणार असल्याची चर्चा शहरभर सुरू झाली होती. व्यावसायिकांना धमकाविण्याची व रिक्षा, बसवर दगडफेक केली जाईल अशीही शक्यता वर्तविली जात होती. मोर्चाला ठोस अनुभवी नेतृत्व नसल्याने संतप्त जमावाला कोण रोखणार असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु आगरी कोळी युथ फाऊंडेशनने आंदोलन हे शांततेमध्ये व कायद्याच्या चौकटीत राहण्याचे आवाहन केल्यामुळे दिवसभरामध्ये एकही अनुचित प्रकार घडला नाही. कुठेही तोडफोड, रास्ता रोको झाले नाही. यामुळे चळवळीची धुरा नव्याने खांद्यावर घेतलेल्या तरूणांविषयी पोलिसांसह शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे. चळवळीची पुढील दिशा ठरविण्यासाठी बुधवारी रात्री कोपरखैरणेमधील शेतकरी समाजमंदिरामध्ये विशेष बैठकीचे आयोजन केले होते. ३०० पेक्षा जास्त तरूण या बैठकीला आले होते. या बैठकीमध्ये प्रकल्पग्रस्तांनी आतापर्यंत केलेल्या आंदोलनाची यशोगाथा सर्वांना सांगण्यात आली. कूळ कायद्यापासून विमानतळापर्यंतच्या सर्व लढ्यांवर प्रकाश टाकण्यात आला. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन व पाठपुरावा केला जाईल. कोणत्याही प्रकारे हिंसक आंदोलने केली जाणार नाहीत. कायद्याच्या चौकटीत राहून यापूर्वी अनेक प्रश्न सोडविण्यात आले आहेत. यापुढेही विविध समस्यांचा अभ्यास करण्यासाठी व त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी तरूणांच्या वेगवेगळ्या टीम तयार केल्या जातील. माहिती अधिकाराचा वापर करणे, कायदेविषयक मार्गदर्शन, गावपातळीवर समन्वय टीम, सेंट्रल युनिट अशाप्रकारे रचना करण्याचे बैठकीमध्ये निश्चित करण्यात आले. यावेळी संजय पाटील व मंगेश म्हात्रे यांनी बैठकीचा उद्देश पटवून दिला. नीलेश पाटील व राहुल ठाकूर यांनी उपस्थितांना चळवळ व नियोजनातील बदलांविषयी मार्गदर्शन केले. >प्रकल्पग्रस्तांच्या लढ्याचा इतिहास तरूणांच्या बैठकीमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या लढ्यावर प्रकाश टाकण्यात आला. पहिले आमदार व शेतकरी नेते नारायण नागू पाटील यांनी १९३२ ते १९३९ दरम्यान कूळ कायद्याविरोधात शेतकऱ्यांचा संप घडवून आणला. एवढ्या प्रदीर्घ काळ चाललेला शेतकऱ्यांचा हा जगातील एकमेव संप आहे. दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सिडको व शासनाविरोधात लढा. यामुळे साडेबारा टक्के योजना देणे शासनास भाग पडले. विमानतळ, सेस, जेएनपीटी विरोधात लढलेल्या लढ्यांविषयी माहिती यावेळी देण्यात आली.