शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
2
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
3
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
4
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
5
​​​​​​​Kotak Mahindra Bank Success Story: २ खोल्यांपासून झाली सुरुवात, आज ४ लाख कोटींचा टर्नओव्हर; वाचा कोटक महिंद्रा बँकेची अनटोल्ड स्टोरी
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, राफेलचीही बदनामी केली; अहवालात खुलासा
7
VIDEO : तिकडं स्टार्कचा अप्रतिम फ्लाइंग कॅच; इकडं नेटकऱ्यांनी KL राहुलची उडवली खिल्ली; कारण...
8
Astro Tips: कुंडलीतील गुरुचे स्थान निश्चित करते, तुम्हाला संसार सुख मिळणार की वैराग्य!
9
भयंकर! चालत्या कारला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी लोकांनी मारल्या उड्या
10
सॅलरी कमी होणार, PF-ग्रॅच्युईटीमध्ये वाढ होणार? नोकरी करणाऱ्या लोकांसाठी अनेक गोष्टी बदलणार
11
जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये तडजोडी, आयात उमेदवार अन् फोडाफोडी; अजितदादांच्या ‘ताकदीच्या मर्यादा’ उघड
12
Video - "मी तुम्हाला आणि तुमच्या मुलीला मारून टाकेन"; प्रिन्सिपलची जीवे मारण्याची धमकी
13
‘या’ सरकारी बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या शर्यतीत दिग्गज बँक; अनेक दिवसांपासून सुरू आहे खासगीकरणाचा विचार
14
उपराष्ट्रपतीपद सोडल्यावर जगदीप धनखड पहिल्यांदाच बोलले, म्हणाले मला बोलायला...
15
Smriti Mandhana Haldi Ceremony : टीम इंडियाच्या 'राणी'च्या हळदी समारंभात संघातील साऱ्याजणींचा झिंगाट डान्स
16
ऑपरेशन सिंदूरनंतर काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हालचालींना वेग; महत्त्वाची माहिती उघड...
17
दिल्लीत पाकिस्तानातून पाठवलेला शस्त्रांचा साठा जप्त; लॉरेन्स टोळीसह कुख्यात गुंडांना हत्यार पुरवणार होते
18
हृदयस्पर्शी! मेकअपला जाताना वधूचा अपघात; नवरदेवाने रुग्णालयातच केलं लग्न, घातलं मंगळसूत्र
19
"लोकशाही पायदळी तुडवून धमकावून राज्यात निवडणुका बिनविरोध होत आहेत", काँग्रेसची टीका
20
Delhi Blast : डॉक्टर गायब, सोशल मीडिया अकाउंट डिलीट; अल-फलाह युनिव्हर्सिटीबाबत धक्कादायक खुलासे
Daily Top 2Weekly Top 5

कायद्याच्या चौकटीत प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन !

By admin | Updated: July 22, 2016 01:58 IST

प्रकल्पग्रस्तांची चळवळ पुढे घेवून जाण्यासाठी तरूणांनी पुढाकार घेतला आहे.

नवी मुंबई : प्रकल्पग्रस्तांची चळवळ पुढे घेवून जाण्यासाठी तरूणांनी पुढाकार घेतला आहे. भविष्यात सनदशीर मार्गाने व कायद्याच्या चौकटीत राहून हक्कांसाठीचा लढा सुरू ठेवला जाणार आहे. यासाठी संघटनात्मक बांधणी केली जाणार असून सोशल मीडिया, विधी, माहिती अधिकार व इतर कामांसाठी स्वतंत्र टीम तयार केल्या जाणार आहेत. नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांनी १८ जुलै रोजी पहिल्यांदा नवी मुंबई बंदचे आवाहन केले होते. आक्रमक म्हणून ओळख असणाऱ्या तरूणांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. महामार्गानजीक असलेल्या सानपाडा दत्तमंदिरजवळ प्रकल्पग्रस्तांचा मेळावा होणार असल्याने महामार्ग अडविला जाणार असल्याची चर्चा शहरभर सुरू झाली होती. व्यावसायिकांना धमकाविण्याची व रिक्षा, बसवर दगडफेक केली जाईल अशीही शक्यता वर्तविली जात होती. मोर्चाला ठोस अनुभवी नेतृत्व नसल्याने संतप्त जमावाला कोण रोखणार असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु आगरी कोळी युथ फाऊंडेशनने आंदोलन हे शांततेमध्ये व कायद्याच्या चौकटीत राहण्याचे आवाहन केल्यामुळे दिवसभरामध्ये एकही अनुचित प्रकार घडला नाही. कुठेही तोडफोड, रास्ता रोको झाले नाही. यामुळे चळवळीची धुरा नव्याने खांद्यावर घेतलेल्या तरूणांविषयी पोलिसांसह शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे. चळवळीची पुढील दिशा ठरविण्यासाठी बुधवारी रात्री कोपरखैरणेमधील शेतकरी समाजमंदिरामध्ये विशेष बैठकीचे आयोजन केले होते. ३०० पेक्षा जास्त तरूण या बैठकीला आले होते. या बैठकीमध्ये प्रकल्पग्रस्तांनी आतापर्यंत केलेल्या आंदोलनाची यशोगाथा सर्वांना सांगण्यात आली. कूळ कायद्यापासून विमानतळापर्यंतच्या सर्व लढ्यांवर प्रकाश टाकण्यात आला. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन व पाठपुरावा केला जाईल. कोणत्याही प्रकारे हिंसक आंदोलने केली जाणार नाहीत. कायद्याच्या चौकटीत राहून यापूर्वी अनेक प्रश्न सोडविण्यात आले आहेत. यापुढेही विविध समस्यांचा अभ्यास करण्यासाठी व त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी तरूणांच्या वेगवेगळ्या टीम तयार केल्या जातील. माहिती अधिकाराचा वापर करणे, कायदेविषयक मार्गदर्शन, गावपातळीवर समन्वय टीम, सेंट्रल युनिट अशाप्रकारे रचना करण्याचे बैठकीमध्ये निश्चित करण्यात आले. यावेळी संजय पाटील व मंगेश म्हात्रे यांनी बैठकीचा उद्देश पटवून दिला. नीलेश पाटील व राहुल ठाकूर यांनी उपस्थितांना चळवळ व नियोजनातील बदलांविषयी मार्गदर्शन केले. >प्रकल्पग्रस्तांच्या लढ्याचा इतिहास तरूणांच्या बैठकीमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या लढ्यावर प्रकाश टाकण्यात आला. पहिले आमदार व शेतकरी नेते नारायण नागू पाटील यांनी १९३२ ते १९३९ दरम्यान कूळ कायद्याविरोधात शेतकऱ्यांचा संप घडवून आणला. एवढ्या प्रदीर्घ काळ चाललेला शेतकऱ्यांचा हा जगातील एकमेव संप आहे. दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सिडको व शासनाविरोधात लढा. यामुळे साडेबारा टक्के योजना देणे शासनास भाग पडले. विमानतळ, सेस, जेएनपीटी विरोधात लढलेल्या लढ्यांविषयी माहिती यावेळी देण्यात आली.