शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कायद्याच्या चौकटीत प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन !

By admin | Updated: July 22, 2016 01:58 IST

प्रकल्पग्रस्तांची चळवळ पुढे घेवून जाण्यासाठी तरूणांनी पुढाकार घेतला आहे.

नवी मुंबई : प्रकल्पग्रस्तांची चळवळ पुढे घेवून जाण्यासाठी तरूणांनी पुढाकार घेतला आहे. भविष्यात सनदशीर मार्गाने व कायद्याच्या चौकटीत राहून हक्कांसाठीचा लढा सुरू ठेवला जाणार आहे. यासाठी संघटनात्मक बांधणी केली जाणार असून सोशल मीडिया, विधी, माहिती अधिकार व इतर कामांसाठी स्वतंत्र टीम तयार केल्या जाणार आहेत. नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांनी १८ जुलै रोजी पहिल्यांदा नवी मुंबई बंदचे आवाहन केले होते. आक्रमक म्हणून ओळख असणाऱ्या तरूणांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. महामार्गानजीक असलेल्या सानपाडा दत्तमंदिरजवळ प्रकल्पग्रस्तांचा मेळावा होणार असल्याने महामार्ग अडविला जाणार असल्याची चर्चा शहरभर सुरू झाली होती. व्यावसायिकांना धमकाविण्याची व रिक्षा, बसवर दगडफेक केली जाईल अशीही शक्यता वर्तविली जात होती. मोर्चाला ठोस अनुभवी नेतृत्व नसल्याने संतप्त जमावाला कोण रोखणार असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु आगरी कोळी युथ फाऊंडेशनने आंदोलन हे शांततेमध्ये व कायद्याच्या चौकटीत राहण्याचे आवाहन केल्यामुळे दिवसभरामध्ये एकही अनुचित प्रकार घडला नाही. कुठेही तोडफोड, रास्ता रोको झाले नाही. यामुळे चळवळीची धुरा नव्याने खांद्यावर घेतलेल्या तरूणांविषयी पोलिसांसह शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे. चळवळीची पुढील दिशा ठरविण्यासाठी बुधवारी रात्री कोपरखैरणेमधील शेतकरी समाजमंदिरामध्ये विशेष बैठकीचे आयोजन केले होते. ३०० पेक्षा जास्त तरूण या बैठकीला आले होते. या बैठकीमध्ये प्रकल्पग्रस्तांनी आतापर्यंत केलेल्या आंदोलनाची यशोगाथा सर्वांना सांगण्यात आली. कूळ कायद्यापासून विमानतळापर्यंतच्या सर्व लढ्यांवर प्रकाश टाकण्यात आला. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन व पाठपुरावा केला जाईल. कोणत्याही प्रकारे हिंसक आंदोलने केली जाणार नाहीत. कायद्याच्या चौकटीत राहून यापूर्वी अनेक प्रश्न सोडविण्यात आले आहेत. यापुढेही विविध समस्यांचा अभ्यास करण्यासाठी व त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी तरूणांच्या वेगवेगळ्या टीम तयार केल्या जातील. माहिती अधिकाराचा वापर करणे, कायदेविषयक मार्गदर्शन, गावपातळीवर समन्वय टीम, सेंट्रल युनिट अशाप्रकारे रचना करण्याचे बैठकीमध्ये निश्चित करण्यात आले. यावेळी संजय पाटील व मंगेश म्हात्रे यांनी बैठकीचा उद्देश पटवून दिला. नीलेश पाटील व राहुल ठाकूर यांनी उपस्थितांना चळवळ व नियोजनातील बदलांविषयी मार्गदर्शन केले. >प्रकल्पग्रस्तांच्या लढ्याचा इतिहास तरूणांच्या बैठकीमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या लढ्यावर प्रकाश टाकण्यात आला. पहिले आमदार व शेतकरी नेते नारायण नागू पाटील यांनी १९३२ ते १९३९ दरम्यान कूळ कायद्याविरोधात शेतकऱ्यांचा संप घडवून आणला. एवढ्या प्रदीर्घ काळ चाललेला शेतकऱ्यांचा हा जगातील एकमेव संप आहे. दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सिडको व शासनाविरोधात लढा. यामुळे साडेबारा टक्के योजना देणे शासनास भाग पडले. विमानतळ, सेस, जेएनपीटी विरोधात लढलेल्या लढ्यांविषयी माहिती यावेळी देण्यात आली.