शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षक भिंत ही काळाची गरज - उच्च न्यायालय

By admin | Updated: March 18, 2017 01:51 IST

रेल्वे रुळांलगत संरक्षक भिंत उभारून प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे काम एकट्या रेल्वेचे नाही, तर त्यात केंद्र, राज्य आणि महापालिकेनेही सहभागी व्हावे.

मुंबई : रेल्वे रुळांलगत संरक्षक भिंत उभारून प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे काम एकट्या रेल्वेचे नाही, तर त्यात केंद्र, राज्य आणि महापालिकेनेही सहभागी व्हावे. कारण त्यांचे बहुतांश कर्मचारी लोकलने प्रवास करतात. संरक्षक भिंत बांधणे ही काळाही गरज आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने रेल्वेला रुळांजवळ संरक्षक भिंत उभारण्याचे काम कधी पूर्ण करणार, याची माहिती तीन आठवड्यांत देण्याचे निर्देश दिले. रूळ ओलांडताना होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी संरक्षक भिंत बांधणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सब-वेही बांधलेत तर प्रवासी त्याचा वापर करतील. त्यामुळे संरक्षक भिंतीबरोबर सब-वे बांधण्याचाही विचार करावा, अशी सूचना न्या. व्ही.एम. कानडे व न्या. अजय गडकरी यांच्या खंडपीठाने केली. काही दिवसांपूर्वी दिवा व नवी मुंबईच्या एका स्थानकासह राज्यातील अन्य स्थानकांजवळील रेल्वे रुळांवर लोखंडी वस्तू व जिलेटीन ठेवून घातपात घडवण्याचे प्रयत्न करण्यात आले. याची गांभीर्याने दखल घेत खंडपीठाने अशा प्रकारे रुळांवर काही ठेवले असेल तर ते समजण्यासाठी अ‍ॅलर्ट देण्याची काही यंत्रणा उपलब्ध आहे का, अशी विचारणा गेल्याच आठवड्यात रेल्वेकडे केली होती. शुक्रवारच्या सुनावणीत रेल्वेतर्फे अ‍ॅड. सुरेश कुमार यांनी सध्या तरी असे कोणतेच तंत्रज्ञान उपलब्ध नसल्याची माहिती खंडपीठाला दिली. ‘अशा प्रकारचे घातपात टाळण्यासाठी रेल्वेने तज्ज्ञांच्या मदतीने तंत्रज्ञान विकसित करावे. त्यांनी सर्व शक्यता पडताळून पाहाव्यात,’ अशी सूचनाही रेल्वेला केली.या घटनांना आळा घालण्यासाठी जीआरपी आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने गस्त घालण्यात येत असल्याची माहिती या वेळी कुमार यांनी खंडपीठाला दिली.‘घातपात टाळण्यासाठी राज्य सरकार व रेल्वेने परदेशातील काही तज्ज्ञांशी संपर्क साधून असे काही तंत्रज्ञान उपलब्ध आहे का? याची पडताळणी करावी,’ असेही खंडपीठाने म्हटले. ‘तंत्रज्ञान खूप प्रगत आहे. अंतराळात सोडलेल्या उपग्रहांवरून जमिनीवरील गोष्टी टिपण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही (राज्य सरकार आणि रेल्वे) योग्य त्या दिशेने विचार करा. तुम्हाला तोडगा मिळेल,’ असे न्या. कानडे यांनी म्हटले. तसेच खंडपीठाने नागरिकांनाही जबाबदारीने वागणे आवश्यक असल्याचे म्हटले. ‘एकट्या रेल्वेला दोष देण्यात अर्थ नाही. नागरिकांनीही जबाबदारीने वागले पाहिजे. त्यांनीही नियमांचे आणि शिस्तीचे पालन करावे. सगळीकडे शॉर्टकटचा वापर करू नये. कारण या बेशिस्तीला एकच दंड आहे तो म्हणजे मृत्यू. त्यामुळे प्रवाशांनीही काळजी घ्यावी,’ असे खंडपीठाने म्हटले. (प्रतिनिधी)