शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

सागरी शिवस्मारकापेक्षा गड टिकवा

By admin | Updated: February 22, 2016 02:14 IST

राज्यातील गडकिल्ले पुढच्या पिढीने पाहिले पाहिजेत. तेथे गिर्यारोहकांचा राबता असेल तरच ते शक्य होईल. समुद्रात पुतळा बांधण्यापेक्षा गडकिल्ले टिकविणे गरजेचे आहे़ हीच शिवाजी महाराजांची

पुणे : राज्यातील गडकिल्ले पुढच्या पिढीने पाहिले पाहिजेत. तेथे गिर्यारोहकांचा राबता असेल तरच ते शक्य होईल. समुद्रात पुतळा बांधण्यापेक्षा गडकिल्ले टिकविणे गरजेचे आहे़ हीच शिवाजी महाराजांची स्मारके आहेत, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले़‘गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट आॅफ माउंटेनिअरिंग’च्या वतीने ज्येष्ठ गिर्यारोहक एऩ के. महाजन आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना रविवारी जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले़ पुतळे बांधणे ही लोकांच्या आवडीची गोष्ट आहे़ अमेरिकेतील स्टॅच्यू आॅफ लिबर्टीपेक्षा मोठा शिवाजी महाराजांचा पुतळा समुद्रामध्ये उभारण्याची काय गरज आहे, असा सवाल राज यांनी केला. डोंगर पोखरले जात आहेत़ प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे़ गडकिल्ले कायम तसेच राहतील यासाठी काय करता येईल ते पाहावे़, असे ते म्हणाले.बाबासाहेब पुरंदरे यांनी ‘शिवाजी’ या तीन अक्षरांसाठी संपूर्ण हयात खर्च केली़ शिवाजी महाराजांचा इतिहास घराघरांत पोहोचवला, पण त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्याचे वाटेल तसेच राजकारण केले़ शिवाजी महाराज गेले नसतील, त्यापेक्षा अधिक वेळा एऩ के. महाजन हे सिंहगडावर गेले आहेत, असे ठाकरे यांनी सांगितले़शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास करावा़ मतभेद असतील तर ते व्यक्त करावेत़ प्रखर टीका करावी़ पण गडकिल्ले आणि शिवाजी महाराजांची चेष्टा करू नये, असे पुरंदरे यांनी सांगितले़ गडकिल्ल्यांवर गेल्याने स्फूर्ती आणि ऊर्जा मिळते़ मी तरुणांना किल्ल्यांवर घेऊन जातो़ हे तरुण माझी स्फूर्ती आहेत.गडकिल्ले चढण्यात जो आनंद आहे़ तो बाजारात विकत मिळणार नाही, असे महाजन यांनी सांगितले़ पुरंदरे आणि महाजन यांच्या कार्यामध्ये साथ देणारे त्यांचे सहकारी प्रतापराव टिपरे, शैलेश वरखडे, ज्ञानेश्वर जाधव, मकरंद कोलटकर, शरदचंद्र टिळे यांचाही सन्मान करण्यात आला़ (प्रतिनिधी)