शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

समृद्धी महामार्ग विकासाची वाहिनी ठरणार !

By admin | Updated: October 7, 2016 19:03 IST

गाव व शहरांचा कायापालट करण्याच्या दृष्टिने रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. याच प्रयत्नातून नागपूर ते मुंबई हा समृद्धी महामार्ग

ऑनलाइन लोकमत
 
वाशिम, दि. 07 -  गाव व शहरांचा कायापालट करण्याच्या दृष्टिने रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. याच प्रयत्नातून नागपूर ते मुंबई हा समृद्धी महामार्ग प्रस्तावित असून, शेतकºयांसह सर्वांसाठीच हा महामार्ग विकासाची वाहिनी ठरणार, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. वाशिम येथे २३५ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा तसेच शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
स्थानिक पाटणी कमर्शियल कॉम्प्लेक्स येथे शुक्रवारी आयोजित या सोहळ्याला राज्याचे कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, नगर विकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार, खासदार संजय धोत्रे, आमदार राजेंद्र पाटणी, लखन मलिक, अमित झनक, गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर, डॉ. सुनील देशमुख, आमदार रायमूलकर, जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांच्यासह लोकप्रतिनिधी व अधिकाºयांची उपस्थिती होती. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांचा सत्कार प्रशासकीय अधिकाºयांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते २३५ कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शेतकरी विकासाला केंद्रबिंदू मानून सरकारने विविध उपक्रम व योजना अंमलात आणल्या आहेत. जलयुक्त शिवार योजनेतून राज्यात जलक्रांती होत असून, दुष्काळाचे चटके सोसणारी दोन हजार गावे आता दुष्काळमुक्त झाली आहेत. येत्या तीन वर्षात राज्यातील ११ हजार गावे दुष्काळमुक्त होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. शेतक-यांना  सुजलाम् सुफलाम् दिवस आणण्यासाठी नागपूर ते मुंबई असा समृद्धी महामार्ग प्रस्तावित असून, यामध्ये विदर्भात सर्वाधिक लाभ वाशिम जिल्ह्यातील शेतकºयांना होणार आहे. या महामार्गामुळे वाशिमचे शेतकरी आपला शेतमाल सहा ते सात तासात मुंबई येथील बंदरामध्ये (जेएनपीटी) पोहोचवू शकतील. येथून जगाच्या पाठिवर कुठेही शेतमाल पाठवू शकणार असल्याने शेतकºयांचा खºया अर्थाने विकास साधला जाईल. तसेच या महामार्गादरम्यानच्या कृषी समृद्धी हबमध्ये शेतकºयांना भागीदार करून घेतले जाणार असल्याचे सांगत, या महामार्गाला विरोध केला तर शेतकरी सर्वांगीन समृद्धीपासून वंचित राहतील, अशी भीतीही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. तसेच यावेळी आमदार लखन मलिक यांनी एकबुर्जी धरण उंचीसंदर्भात, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी समृद्धी महामार्गासह अमरावती विद्यापीठ उपकेंद्र वाशिम येथे देण्याची मागणी केली. जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी जिल्ह्यातील सिंचन व्यवस्थेबाबत विचार व्यक्त केले. तर कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी मराठवाडा विभागाच्या धर्तीवर, नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे न करता विदर्भातील शेतकºयांना भरीव मदत दिली जाईल, अशी घोषणा केली. तसेच विविध कृषी योजनांसंदर्भात माहिती देत शेतकºयांना वीज द्या, पाणी द्या; दुसरे काहिही नको, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी तर आभार बांधकाम विभागाचे कार्यकारी अधिकारी काशीनाथ गाडेकर यांनी मानले.
 
आमदार राजेंद्र पाटणी यांच्या मागण्यांची मुख्यमंत्र्यांनी घेतली तातडीने दखल !
या सोहळ्याचे मुख्य आयोजक तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार राजेंद्र पाटणी यांचा उल्लेख ‘कार्यप्रबळ, धडाडीचे आमदार’ असा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरूवातीलाच पाटणी यांच्या विकास कामांबाबतच्या ‘तळमळी’चे तोंडभरून कौतुक केले. तसेच पाटणी यांनी आपल्या भाषणातून मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या मागण्यांना फडणवीस यांनी तातडीने मंजूरात दिली. यामध्ये विजेच्या सुविधेसाठी ७० कोटी रुपये मागितलेले असताना, मुख्यमंत्र्यांनी ११४ कोटी रुपये देण्याची घोषणा केली. नद्यांचे खोलीकरण व रूंदीकरणाचा मुद्दाही गांभीर्याने घेत लोकसहभाग, स्वयंसेवी संस्था व शासनाच्या सहकार्यातून वाशिम जिल्ह्यातील नद्यांचे पुनरूज्जिविकरण केले जाईल, अशी ग्वाही दिली. मानव विकास निर्देशांकात वाशिमचा असलेला ३३ वा क्रमांक लवकरच २०-२५ च्या दरम्यान आणण्यासाठी ठोस पावले उचलले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.  तसेच या दरम्यान आमदार राजेंद्र पाटणी यांनी जिल्हा विकासाच्या दृष्टिकोनातून विविध प्रश्न मांडले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सदर प्रश्न लवकरच निकाली काढण्याचेही आश्वासन दिले.