शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

विदर्भातील नव्या जिल्ह्यांचे प्रस्ताव धूळ खात

By admin | Updated: June 9, 2014 01:12 IST

गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून अहेरी तर चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून चिमूर हा नवा जिल्हा निर्माण करण्यात यावा, अशी गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे. मात्र या मागणीकडे राज्य सरकारचे

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून अहेरी तर चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून चिमूर हा नवा जिल्हा निर्माण करण्यात यावा, अशी  गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे. मात्र या मागणीकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे.शुक्रवारी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुंबईलगत असलेल्या ठाणे जिल्ह्याचे १५ ऑगस्टपूर्वी विभाजन करण्यात येईल, अशी घोषणा  विधान परिषदेत केली. राज्य सरकार विदर्भातील नव्या जिल्ह्यांच्या निर्मिती प्रस्तावावर उदासीन आहे. आजवर अनेकदा अहिंसात्मक मार्गाने आंदोलन  करून जिल्हा निर्मितीची मागणी विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांकडून करण्यात आली. परंतु सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला  नाही. गडचिरोली हा नक्षलग्रस्त जिल्हा आहे. या जिल्ह्यात अहेरी उपविभाग नक्षली कारवायांच्या दृष्टीने संवेदनशील आहे. ही बाब लक्षात घेऊनच राज्याच्या  गृहमंत्रालयाने स्वतंत्र अहेरी जिल्हा तीन वर्षापूर्वीच घोषित केला. मात्र महसूल प्रशासन याबाबत उदासीन आहे. नवा जिल्हा निर्माण करण्याऐवजी  अहेरी येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी देण्यात आला व जिल्हा निर्मितीची मागणी दाबून टाकण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. नाग विदर्भ आंदोलन  समितीसह अहेरी जिल्हा निर्माण संघर्ष कृती समितीने या प्रश्नावर सातत्याने जनआंदोलन केले आहे. अहेरी उपविभागात असलेल्या पाच तालुक्यांसह आणखी सहा नवीन तालुके निर्माण करून अहेरी हा स्वतंत्र जिल्हा १५ ऑगस्ट २0१४ ला घोषित  करावा, अशी मागणी अहेरी परिसरातील जनतेने केली आहे.राज्य सरकारने गेल्या अनेक  वर्षापासून चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून चिमूर हा नवीन जिल्हा निर्माण करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.  मुख्यमंत्र्यांनी चिमूरला जिल्ह्याचा दर्जा देण्याऐवजी नगर परिषद करण्यात येईल, अशी घोषणा एका कार्यक्रमात केली होती. मात्र नगर परिषद न करता  नगर पंचायतीचा दर्जा देण्यात आला. चिमूर ही क्रांतिभूमी असल्याने स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा देण्यात यावा, अशी चिमूरवासीयांचीही मागणी आहे. परंतु  राज्य सरकार विदर्भातील नव्या जिल्ह्याच्या निर्मितीबाबत उदासीन आहे. (जिल्हा प्रतिनिधी)