शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मंत्रिमंडळ बैठकीत भगतसिंह कोश्यारींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव; सरकारने मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 15:39 IST

मंगळवारी झालेल्या बैठकीत माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं अभिनंदन करण्यात आले

मुंबई - महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे अलीकडच्या काळात सातत्याने वादात राहिलेत. महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे कोश्यारी यांच्याविरोधात महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला. कोश्यारींच्या वादग्रस्त विधानांनी भाजपाचीही कोंडी झाली. त्यानंतर कोश्यारींना हटवण्याची मागणी जोर धरू लागली. 

राज्यपालपदावरून भगतसिंह कोश्यारी पायउतार झाल्यानंतर आता राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कोश्यारींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. मंगळवारी झालेल्या बैठकीत माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं अभिनंदन करण्यात आले. राज्याचे हिताचे निर्णय घेण्यात शासनाला मार्गदर्शन केल्याबद्दल मंत्रिमंडळाने अभिनंदन प्रस्ताव मांडला होता. त्याला मंजुरी देण्यात आली. 

वादग्रस्त विधानांमुळे कोश्यारी चर्चेतमहात्मा फुले आणि सावित्रीबाईंचे लहान वयात लग्न, गुजरातींनी पैसा काढून घेतला तर मुंबईत काही उरणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या जमान्यातील आदर्श अशा विविध वक्तव्यांनी भगतसिंह कोश्यारी अडचणीत आले होते. विरोधकांसह अनेक संघटनांनी कोश्यारींच्या विधानाचा निषेध करत आंदोलन केले होते. कोश्यारींना राज्यपाल पदावरून हटवावं अशी मागणी होत होती. त्यानंतर नुकतेच भगतसिंह कोश्यारी यांच्या जागेवर रमेश बैस यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

कोण आहेत महाराष्ट्राचे नवे राज्यपाल?वेगवेगळे राजकीय निर्णय आणि विधानांमुळे सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले भगतसिंह कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरची कारकीर्द संपुष्टात आली आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेला राज्यपालपदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केल्यानंतर रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. रमेश बैस यांनी याआधी झारखंड आणि त्रिपुराचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे. तसेच वाजपेयी सरकारच्या काळात त्यांनी मंत्रिपदही सांभाळले होते. २०१९ मध्ये महाराष्ट्रात घडलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडी आणि नंतर आलेले महाविकास आघाडीचे सरकारच्या काळात घेतलेल्या विविध राजकीय भूमिका, रखडवून ठेवलेली १२ राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती यामुळे भगतसिंह कोश्यारींवर टीका झाली होती. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेले विधान, तसेच महात्मा फुलेंबाबत काढलेल्या उदगारांमुळे कोश्यारी हे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.  

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीState Governmentराज्य सरकारMahavikas Aghadiमहाविकास आघाडी