शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

एमआरव्हीसीचा रेल्वे अपघात रोखण्यास ५८0 कोटींचा प्रस्ताव

By admin | Updated: September 25, 2016 00:56 IST

रूळ ओलांडताना मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे अपघात होतात. हे अपघात रोखण्यासाठी पश्चिम आणि मध्य रेल्वे एमआरव्हीसीच्या (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) सहकार्याने

मुंबई : रूळ ओलांडताना मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे अपघात होतात. हे अपघात रोखण्यासाठी पश्चिम आणि मध्य रेल्वे एमआरव्हीसीच्या (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) सहकार्याने उपाय करीत आहे. यासाठी रूळ ओलांडणारी विविध स्थानकांमधील २२ धोकादायक ठिकाणे शोधली असून, त्यावर उपाययोजनांसाठी एमआरव्हीसीला तब्बल ५८0 कोटी रुपये खर्च येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठवला आहे. रूळ ओलांडण्याचे प्रकार थांबविण्यासाठी आधीच १२0 कोटी रुपयांचे नियोजन करून त्यातून स्थानकांवर विविध सुविधांचे कामही करण्यात येत आहे. रेल्वे बोर्डातील अधिकाऱ्यांच्या एका समितीची बैठक मंत्रालयात पार पडली. या बैठकीला मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मुंबई पालिका, एमएमआरडीए, सिडको आणि शासनाचे अन्य अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात चर्चा करण्यात आली. यासंदर्भात मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रवींद्र गोयल यांनी सांगितले की, रूळ ओलांडण्यात येत असलेल्या ठिकाणांच्या केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्यात आला. अशा प्रकारची जवळपास १७४ ठिकाणे आहेत. त्याचप्रमाणे एमआरव्हीसी, रेल्वे प्रशासनाकडून आवश्यकता असेल अशा स्थानकांवर सरकते जिने, पादचारी पुलांच्या सुविधा देतानाच संरक्षक भिंत व कुंपणही बांधण्याचे नियोजन केले आहे. (प्रतिनिधी)एमआरव्हीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय म्हणाले, रूळ ओलांडण्याचे प्रकार रोखण्यासाठी अनेक उपाय केले जात आहेत. एमयूटीपी-२ अंतर्गत १२ स्थानकांवर सरकते जिने, पादचारी पूल, संरक्षक भिंत बांधण्याचे नियोजन केले आहे. त्यावर काम सुरू असून, तब्बल १२0 कोटींचा खर्च आहे. याचबरोबर दोन स्थानकांमध्येही रूळ ओलांडण्याचे प्रमाण अधिक आहे. अशी २२ ठिकाणे शोधण्यात आली असून, एमयूटीपी-३ अंतर्गत संरक्षक भिंत, पादचारी पूल, कुंपण इत्यादी सुविधा देण्यात येणार आहेत. हा प्रस्ताव मंजुरीसाठी रेल्वे प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे.