शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

नोंदणी रद्द झालेल्या ट्रस्टची मालमत्ता होणार सरकारजमा; पडताळणीचे धर्मादाय आयुक्तांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 10:59 IST

नोंदणी रद्द झालेल्या संस्थांची स्थावर आणि जंगम मालमत्ता संबंधीत धर्मादाय उपआयुक्त किंवा सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी मालमत्तेची योग्य प्रकारे विक्री करून ती रक्कम सार्वजनिक न्यास प्रशासन निधीमध्ये जमा करण्याची कायद्यात तरतूद आहे.

गौरीशंकर घाळे -मुंबई : महाराष्ट्रातील नोंदणी रद्द झालेल्या विश्वस्त संस्थांची स्थावर आणि जंगम मालमत्ता सरकारजमा होणार आहे. नोंदणी रद्द झालेल्या संस्थांच्या मालमत्तांची पडताळणी करण्याचे निर्देश राज्याचे धर्मादाय आयुक्तांनी संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर ट्रस्ट, संस्थांची नोंदणी होत असते. यातील अनेक संस्था नियमानुसार ऑडिट रिपोर्ट आणि चेंज रिपोर्ट सादर करत नाहीत. तर, अनेक संस्था या वर्षानुवर्षे निष्क्रिय असतात, त्यांच्या मार्फत कोणतेच कामकाज होत नाही. मात्र, त्या नोंदणीकृत असल्याने धर्मादाय आयुक्तालयावर निष्क्रिय संस्थांचा बोजा मात्र वाढत असतो. या पार्श्वभूमीवर १३ सप्टेंबर २०१७ रोजी तत्कालीन धर्मादाय आयुक्तांच्या निर्देशानंतर राज्यभरात अशा संस्थांची नोंदणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. तेव्हाच्या एकूण ८ लाख १७ हजार ४१६ नोंदणीकृत संस्थांपैकी आतापर्यंत १ लाख ३९ हजार ५१६ संस्थांची नोंदणी रद्द केली गेली.नोंदणी रद्द झालेल्या संस्थांची स्थावर आणि जंगम मालमत्ता संबंधीत धर्मादाय उपआयुक्त किंवा सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी मालमत्तेची योग्य प्रकारे विक्री करून ती रक्कम सार्वजनिक न्यास प्रशासन निधीमध्ये जमा करण्याची कायद्यात तरतूद आहे. मात्र, अद्याप तशी कार्यवाही झाली नाही. या पार्श्वभूमीवर धर्मादाय आयुक्त प्रमोद तरारे यांनी नोंदणी रद्द झालेल्या ट्रस्टच्या मालमत्तांची पडताळणी करून योग्य कार्यवाही करण्याचे तसेच त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्व विभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.

- नोंदणी रद्द झाल्यानंतर अनेक ठिकाणी संबंधीत ट्रस्टची मालमत्ता सरकारजमा न होता ती बळकावली जाते. विश्वस्त संस्थांची मालमत्ता खासगी बनवून त्याचा वापर केला जातो. - या प्रकाराला आळा घालण्यासाठी मालमत्तांची पडताळणी आणि ती सरकारजमा करण्याची मोहीम धर्मादाय आयुक्तालयाकडून घेतली जाणार आहे. 

टॅग्स :GovernmentसरकारState Governmentराज्य सरकार