शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

एलईडीच्या विरोधात अपप्रचार

By admin | Updated: March 23, 2015 02:13 IST

एलईडी दिव्यांमुळे ५० टक्के वीज बचत होणार असून येत्या तीन वर्षात सररकारी कार्यालये आणि घराघरातही हेच दिवे लावण्यात येणार आहे,

नागपूर : एलईडी दिव्यांमुळे ५० टक्के वीज बचत होणार असून येत्या तीन वर्षात सररकारी कार्यालये आणि घराघरातही हेच दिवे लावण्यात येणार आहे, असे सांगतानाच काही लोकं या विरोधात अपप्रचार करीत आहे, अशी टीका केंद्रीय ऊर्जा व कोळसा खाण राज्यमंत्री पीयूष गोयल यांनी शिवसेनेचे नाव न घेता केली.वेस्टर्न कोलफिल्ड लि.च्या कार्यालयात रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुंबईत एलईडी दिवे लावण्यास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोध केला होता व दिवे खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोपही केला होता. यासंदर्भात गोयल यांना विचारले असता त्यांनी राऊत यांचे नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. काही लोक या विरोधात अपप्रचार करीत आहेत. कदाचित त्यांची रुची ही खासगी क्षेत्रात असावी, असे गोयल म्हणाले.केंद्रीय योजनेनुसारच जुने पथदिवे बदलून त्याजागी एलईडी लावण्याचा निर्णय झाला. या दिव्यांमुळे ५० टक्के वीज बचत होते. त्यामुळे पुढील तीन वर्षात शासकीय कार्यालये आणि घराघरातसुद्धा एलईडी लावण्यास मान्यता दिली आहे. यामुळे १० हजार मे.वॅ.विजेची मागणी कमी होईल व देशात १२ ते १५ हजार कोटींची बचत होईल. एकट्या मुंबईत ८० कोटी रुपये यामुळे वाचतील व त्यासाठी महापालिकेला काहीही खर्च येणार नाही. मागणी वाढल्याने एलईडीच्या किंमतीही कमी होत असून खरेदीची प्रक्रियाही पारदर्शकतेनेच पूर्ण केली जात आहे, याकडेही गोयल यांनी लक्ष वेधले. रद्द झालेल्या कोळसा खाण पट्टे वाटपाच्या संदर्भात न्यायालयाने संबंधितांकडून दंड वसूल करण्याचे आदेश दिले आहे. दंड न भरणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. सुधारित पद्धतीने झालेल्या कोळसा खाणपट्याच्या लिलावातून सरकारला महसूल अधिक मिळणार असला तरी त्यामुळे विजेचे दर वाढणार नाही. कारण लिलाव करतानाच यासंदर्भात अट घालण्यात आली आहे, असे गोयल म्हणाले. कोळशाच्या दर्जावरून राज्यात वेकोलि आणि महाजन्को यांच्यातील सर्व वाद संपुष्टात आले असून आता नवीन सुरुवात झाली आहे. यापूर्वीच्या सरकारने याकडे लक्षच दिले नव्हते, असे गोयल म्हणाले.(प्रतिनिधी)