शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
3
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
5
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
6
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
7
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
8
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
9
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
10
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
11
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
12
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
13
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
14
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
15
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
16
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
17
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
18
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
19
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
20
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल

'शासनच नष्ट करते शेतकरी आत्महत्येचे पुरावे'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 06:02 IST

शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करतो, हे सरकारला मान्यच नाही.

यवतमाळ : शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करतो, हे सरकारला मान्यच नाही. सावळेश्वर (उमरखेड) येथील घटनेला अपघाताचा रंग देऊन शेतकरी आत्महत्या दडपण्याचा प्रयत्न शासनाकडून करण्यात आला. एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे सरकार पुरावे नष्ट करण्यासाठी धडपडत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथे केला.सावळेश्वर येथील शेतकरी माधव शंकर रावते (७५) यांनी शेतात सरण रचून आत्महत्या केली. त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी १७ एप्रिलला आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात नमूद आहे. त्यानंतर घटनेला अपघाताचा रंग देण्याचा प्रयत्न सरकारी यंत्रणेकडून करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावात ही आत्महत्या झाली. अब्रू झाकण्यासाठी सरकार गुन्हेगाराप्रमाणे पुरावे नष्ट करते, ही अतिशय खेदाची बाब असल्याचे विखे पाटील म्हणाले.मंत्री, आमदार, उपविभागीय अधिकारी यांच्यावर तत्काळ गुन्हे दाखल केले जावे, अशी मागणीही त्यांनी केली. जिल्ह्यातील राजूरवाडी, टिटवी येथील शेतकरी आत्महत्या सरकारच्या नावाने चिठ्ठी लिहून झाल्या आहेत. संबंधित कुटुंबीयांची त्यांनी भेट दिली. देशाचे पंतप्रधान २०१४ मध्ये जिल्ह्यात येऊन शेतकºयांना आश्वासन देतात. मात्र त्याची पूर्तता करण्यासाठी चार वर्षात एकदाही फिरकले नाही. त्यांनी दत्तक घेतलेल्या गावांची अवस्था बिकट आहे, असेही विखे यांनी सांगितले.काँग्रेस दाखल करणार अवमान याचिकाटिटवी येथील शेतकºयाची आत्महत्या सुरुवातीला २६/९/२०१७ च्या अहवालानुसार आर्थिक मदतीस पात्र असल्याचे दाखविले गेले. नंतर २४/१०/२०१७ च्या अहवालात ती आत्महत्या नसल्याचे सांगण्यात आले. सर्व विरोधाभास आहे. यवतमाळ जिल्ह्यात यापूर्वी कीटकनाशकांच्या वापराने शेतकरी मृत्युमुखी पडले. काहींना अपंगत्व आले. सरकारने त्यांना कुठलीच मदत केली नाही.एसआयटी स्थापन करून उलट शेतकºयांनाच दोषी धरण्यात आले. कीटकनाशक कंपन्या व शासकीय यंत्रणेला सरळसरळ क्लीन चिट दिली. न्यायालयाने बाधित शेतकरी कुटुंबाला चार लाख रुपये देण्याचा आदेश दिला. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. काँग्रेस याबाबत अवमान याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.