शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

'शासनच नष्ट करते शेतकरी आत्महत्येचे पुरावे'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 06:02 IST

शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करतो, हे सरकारला मान्यच नाही.

यवतमाळ : शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करतो, हे सरकारला मान्यच नाही. सावळेश्वर (उमरखेड) येथील घटनेला अपघाताचा रंग देऊन शेतकरी आत्महत्या दडपण्याचा प्रयत्न शासनाकडून करण्यात आला. एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे सरकार पुरावे नष्ट करण्यासाठी धडपडत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथे केला.सावळेश्वर येथील शेतकरी माधव शंकर रावते (७५) यांनी शेतात सरण रचून आत्महत्या केली. त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी १७ एप्रिलला आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात नमूद आहे. त्यानंतर घटनेला अपघाताचा रंग देण्याचा प्रयत्न सरकारी यंत्रणेकडून करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावात ही आत्महत्या झाली. अब्रू झाकण्यासाठी सरकार गुन्हेगाराप्रमाणे पुरावे नष्ट करते, ही अतिशय खेदाची बाब असल्याचे विखे पाटील म्हणाले.मंत्री, आमदार, उपविभागीय अधिकारी यांच्यावर तत्काळ गुन्हे दाखल केले जावे, अशी मागणीही त्यांनी केली. जिल्ह्यातील राजूरवाडी, टिटवी येथील शेतकरी आत्महत्या सरकारच्या नावाने चिठ्ठी लिहून झाल्या आहेत. संबंधित कुटुंबीयांची त्यांनी भेट दिली. देशाचे पंतप्रधान २०१४ मध्ये जिल्ह्यात येऊन शेतकºयांना आश्वासन देतात. मात्र त्याची पूर्तता करण्यासाठी चार वर्षात एकदाही फिरकले नाही. त्यांनी दत्तक घेतलेल्या गावांची अवस्था बिकट आहे, असेही विखे यांनी सांगितले.काँग्रेस दाखल करणार अवमान याचिकाटिटवी येथील शेतकºयाची आत्महत्या सुरुवातीला २६/९/२०१७ च्या अहवालानुसार आर्थिक मदतीस पात्र असल्याचे दाखविले गेले. नंतर २४/१०/२०१७ च्या अहवालात ती आत्महत्या नसल्याचे सांगण्यात आले. सर्व विरोधाभास आहे. यवतमाळ जिल्ह्यात यापूर्वी कीटकनाशकांच्या वापराने शेतकरी मृत्युमुखी पडले. काहींना अपंगत्व आले. सरकारने त्यांना कुठलीच मदत केली नाही.एसआयटी स्थापन करून उलट शेतकºयांनाच दोषी धरण्यात आले. कीटकनाशक कंपन्या व शासकीय यंत्रणेला सरळसरळ क्लीन चिट दिली. न्यायालयाने बाधित शेतकरी कुटुंबाला चार लाख रुपये देण्याचा आदेश दिला. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. काँग्रेस याबाबत अवमान याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.