शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

प्रचारफेरी

By admin | Updated: February 14, 2017 01:02 IST

मनसेचे प्रमुख राज ठाकरे अजूनही प्रचारात पूर्णपणे उतरलेले नाहीत. खास ठाकरे शैलीतील त्यांच्या भाषणाची तोफ अद्याप धडाडलेली नाही.

मुख्यमंत्र्यांच्या आईचे मनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या प्रचारात प्रचंड व्यग्र आहेत. रोज झोपायला पहाटे ३-४ वाजतात. पुन्हा सकाळी ८ वाजता वर्षावरून प्रचारासाठी बाहेर पडतात. त्यांच्या या प्रचंड दगदगीची वर्षा बंगल्यावर दोन व्यक्तींना तेवढीच काळजी असते. पती, कन्या दिविजा, बँक आणि सोशल कमिटमेंटस् एकाच वेळी सांभाळण्याची कसरत अमृतावहिनी करत असतात. आई सरिता या राजकीय घडामोडींबद्दल नेहमीच जागृत राहत आल्या आहेत. त्यांचे पती गंगाधरराव फडणवीस हे राजकारणातील एक वादळच होते. दिलदारी अन् निष्ठेचा अपूर्व मिलाफ असलेले गंगाधरराव आजही अनेकांना आठवतात. तेव्हापासून माणसांचा राबता फडणवीसांचे घर अनुभवत आले आहे. सरिताकाकूंना नागपूरच्या राजकारणाची चांगली ओळख आहे आणि तेथील घडामोडींची माहितीही त्या घेत असतात. नागपुरात महापालिकेची निवडणूक असताना खरे तर तेथेच राहणे त्यांनी पसंत केले असते, पण निवडणुकीपर्यंत त्या वर्षावरच थांबणार आहेत, ते केवळ ‘देवेन’च्या काळजीपोटी. मुलावर निराधार आरोप वा अनावश्यक टीका झाली की, त्या व्यथित होतात. ‘एवढ्या घबडग्यात त्याला एकदा नुसतं पाह्यलं तरी बरं वाटतं अन् एक आई म्हणून त्याची मानसिकता त्याच्या देहबोलीतूनच कळते, असे काकू सांगत होत्या. २१ तारखेला मात्र, त्या ‘देवेन’बरोबर मतदानाला नागपूरला जाणार आहेत. राज यांची घालमेलमनसेचे प्रमुख राज ठाकरे अजूनही प्रचारात पूर्णपणे उतरलेले नाहीत. खास ठाकरे शैलीतील त्यांच्या भाषणाची तोफ अद्याप धडाडलेली नाही. मुलगा अमितच्या आजारपणामुळे राज यांना त्याच्याजवळ राहणे निकडीचे आहे. त्यामुळे नेता व पिता यात घालमेल होतेय. अर्थात, व्हॅलेंटाइन डे पासून त्यांच्या सभांचा धडाका सुरू होतोय. पिता म्हणून त्यांना असलेली काळजी नक्कीच दूर होईल आणि नेता म्हणूनही त्यांना चांगले यश मिळेल, अशी सदिच्छा बाळगायला काय हरकत आहे? तर मग ‘जाहीरनामा’ की ‘वचननामा’?शिवसेना आणि भाजपाची जोरदार टक्कर मुंबई महापालिकेत होतेय. शिवसेनेने परंपरेप्रमाणे वचननामा दिला अन् मग त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाँड पेपरवर भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. दोघांनाही स्वबळावर सत्तेत येण्याचा विश्वास आहे आणि त्यामुळे एकमेकांची गरज भासणार नाही, असे ते ठणकावून सांगताहेत. असेच ते विधानसभेच्या वेळीही बोलत होते, पण गरज पडलीच ना! मग दोघेही एकत्र येऊन सत्तेत सहभागी झाले. आताही तशी परिस्थिती आली, तर वचननाम्याची अंमलबजावणी होणार की जाहीरनाम्याची? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन्हींचा संकर करून ‘जाहीवचनामा’ किंवा ‘वचजाहीरनामा’ असे संकर करण्याचा एक विषय समोर येईल आणि या संकरासाठी विनोद तावडे, अनिल देसाई, आशिष शेलार, अनिल परब यांची एक समन्वय समिती स्थापन होईल. तब तक चलने दो भाई!त्याचे नाव शिवसेनाशिवसेनेच्या प्रचारफेऱ्या पाहण्यासारख्या असतात. इतर काही पक्षांसारखे भाडोत्री लोक त्यात आणलेले नसतात. भगवा दुपट्टा गळ्यात टाकून शिवसैनिक अन् महिला आघाडीच्या कार्यकर्त्या दिलेल्या वेळेत, दिलेल्या ठिकाणी प्रचारफेरीसाठी सज्ज असतात. सरकारी वा खासगी नोकरीत असलेले शिवसैनिक आठ-पंधरा दिवसांची रजा टाकून प्रचारात उतरतात. सकाळी उमेदवाराकडून वडापाव, दुपारी पोळीभाजी वा खिचडी आणि संध्याकाळीही खिचडी वगैरे खायला मिळते, बस तेवढेच. यापेक्षा जास्त अपेक्षाही कोणालाच नसते. प्रचारातील भारावलेपण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसते. परवा दुपारी लालबागमध्ये प्रचार संपवून कार्यकर्ते बसलेले होते. डाळखिचडीचे छोटे डबे वाटले गेले. सगळे खात असताना एक जुना शिवसैनिक दुसऱ्याला तो डबा देत म्हणाला, ‘अरे! मला शुगर आहे ना! भात चालत नाही, तू खा. इकडे माझी बहीण राहते ती दोन पोळ्या अन् मेथीची भाजी आणते म्हणाली, तिची वाट पाहतोय.’ सेनेच्या कार्यकर्त्यांचे असे नेटवर्क अन् असे कमिटमेंट.. जय महाराष्ट्र!!!