शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

प्रचारफेरी

By admin | Updated: February 20, 2017 01:39 IST

भाजपाचे खासदार किरीट सोमय्या हे भाजपाचे ‘स्कॅमस्टार’ आहेत. एकामागून एक घोटाळे काढताना त्यांनी भाजपाच्या काही नेत्यांनादेखील

सोमय्यांना मुख्यमंत्र्यांचा चापभाजपाचे खासदार किरीट सोमय्या हे भाजपाचे ‘स्कॅमस्टार’ आहेत. एकामागून एक घोटाळे काढताना त्यांनी भाजपाच्या काही नेत्यांनादेखील अडचणीत आणले होते. त्यांच्या विश्वासार्हतेवर अनेकदा विरोधक प्रश्नचिन्हदेखील लावतात; पण सोमय्या प्रकरणे बाहेर काढत राहतात. प्रचाराच्या रणधुमाळीत त्यांनी थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात काही आरोप केले. उद्धव यांना संपत्ती जाहीर करण्याचे आणि आरोपांची उत्तरे देण्याचे आव्हान ते दोन-तीन दिवस सतत करीत होते. नंतर त्या आव्हानावर पडदा पडला. माहिती अशी आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिला. ठाकरे वा शिवसेनेच्या कोण्या नेत्यांबाबतचे पुरावे तुमच्याकडे असतील तर ते योग्य त्या यंत्रणेकडे द्या, निवडणुकीच्या काळात वैयक्तिक आरोप टाळून निकोप राजकारण केले पाहिजे, असा समजवजा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला. घाणेरडे राजकारणमतदानाला काही तास उरलेले असताना आता सोशल मीडियातून घाणेरडे राजकारण सुरू झाले आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे हात जोडून नमस्कार करीत असून, शिवसेनेला विजयी करण्याचे आवाहन करीत असल्याची एक दिशाभूल करणारी पोस्ट व्हायरल झाली आहे. भाजपाच्या जाहिरातीत गजरऐवजी गाजर शब्द वापरून अशीच एक फेक पोस्ट फिरविली गेली. शिवसेनेचे खा. संजय राऊत यांच्या लेटरहेडवर एक फेक सर्वेक्षण टाकून पोस्ट फिरवणे सुरू आहे. त्यात भाजपाला १०५ तर शिवसेनेला ८० जागा मिळतील, असे म्हटले आहे. खाली संजय राऊत यांची नकली सही करण्यात आली आहे. निवडणूक निकालाचे एका चॅनेलने केलेले फेक सर्वेक्षण गेल्या आठवड्यात फिरले. आता मतदानाला काहीच तास उरले असताना अशी फेकाफेकी आणखी होऊ शकते. मतदारराजा जागते रहो!जिधर बम उधर हमप्रचाराच्या शेवटच्या दिवशी रविवारी मुंबईतील सगळ्याच प्रभागांमध्ये जंगी प्रचारफेऱ्या निघाल्या. एकाच प्रभागातील सर्व उमदेवारांच्या प्रचारफेऱ्यांमध्ये जबरदस्त गर्दी असल्याचं चित्र अनेक ठिकाणी बघायला मिळालं. त्यामुळे हवा नेमकी कोणाची याचा अंदाज त्यावरून तरी येत नव्हता. वरळी भागात एक कार्यकर्ता राष्ट्रवादीच्या प्रचारफेरीत बेंबीच्या देठापासून घोषणा देत होता. दुपारी १च्या सुमारास तो एका गाडीच्या आडोशाला जाऊन उभा राहिला. राष्ट्रवादीचा दुपट्टा खिश्यात टाकला अन् दुसऱ्या खिश्यातून भाजपाचा दुपट्टा गळ्यात टाकला. एकदम निष्ठा कशी काय बदलली असं विचारलं तर त्यानं अगदीच व्यावहारिक उत्तर दिलं. सकाळपासून साडेबारापर्यंत मी घड्याळाची रोजी घेतली आता सायंकाळपर्यंत भाजपाची घेतलीय, असं सांगत तो लगबगीनं चालू लागला. ते दिवस वेगळे होते...शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ‘शिवसेनेची २५ वर्षे युतीमध्ये सडली,’ अशी खंत प्रत्येक प्रचारसभेमध्ये व्यक्त करीत आहेत. सहज आठवलं... २०१४च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाची युती होती. तेव्हा त्यांनी मुखपत्रात एक मॅरेथॉन मुलाखत दिली. तेव्हा, युतीमुळे दोन्ही पक्षांचा कसा फायदा झाला हे त्यांनी सांगितले होते. दिवस बदलले. विधानसभा निवडणुकीत युती तुटली. दोघांनी एकमेकांविरुद्ध दंड थोपटले. आता तर ‘करो या मरो’ची लढाई चालली आहे. राजकारणामध्ये असे मागचे मागचे शोधून; खोदून काढायचे नसते. मुख्यमंत्र्यांनी बघा ‘माजी गुंड’ हा शब्द कसा शोधून काढलाच ना? भाजपासारख्या संस्कारी पक्षाची त्यामुळे सोय झाली.