शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

प्रचारफेरी

By admin | Updated: February 18, 2017 01:58 IST

विदर्भवीर आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींचे भाषण म्हणजे, आकड्यांचा खेळ आणि शब्दांची नागपुरी भेळ. नितीनभौ, तसेही आरपार बोलण्याबद्दल प्रसिद्ध.

नितीनभौ लई भारी!विदर्भवीर आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींचे भाषण म्हणजे, आकड्यांचा खेळ आणि शब्दांची नागपुरी भेळ. नितीनभौ, तसेही आरपार बोलण्याबद्दल प्रसिद्ध. कोणाची भीडभाड, मुलाहिजा आणि तमा न बाळगता दे धडक, बेधडक बोलून मोकळे होतात. विशेषत: राजकारणी, अधिकारी आणि पत्रकार हे तर त्यांची खास गिऱ्हाईकं. त्यामुळे नितीनभौचं भाषण म्हटलं की, सगळ्यांचेच कान टवकारले जातात. मुंबई महापालिकेच्या रणसंग्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकटेच किल्ला लढवित होते. त्यामुळे नितीनभौ कुठंय, अशी विचारणा होत होती. शेवटी काल पार्ल्यात त्यांची सभा झाली. ‘पैसा कमावणं हा काही गुन्हा नाही, पण राजकारण हा पैसे कमावण्याचा मार्ग नाही. मी फोकनाड नाही, नुसती घोषणा करत नाही तर कामं पण करतो.’ असं नितीनभौ यांनी सांगताच पार्लेकर मंडळींमध्ये कानकुन सुरू झाली. ‘फोकनाड म्हणजे काय हो?’ असं प्रत्येकजण एकमेकांना विचारत होता. तेवढ्यात भौ नी दुसरा टाकला, ‘टक्क्यानंच मुंबईचा घात केला!’ नितीनभौंच्या शब्दांचे अर्थ शोधण्यासाठी पार्लेकर मंडळी कालपासून डिक्सनरी घेऊन बसलेत म्हणे!रावसाहेबांचा जावईशोध!विख्यात अर्थतज्ज्ञ, भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि सलग दहा वर्ष देशाचे पंतप्रधानपद भूषविलेले डॉ. मनमोहन सिंग यांना कोणी ओळखत नव्हते, असा जावईशोध भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी लावला आहे. रावसाहेब तेवढ्यावरच थांबले नाहीत, तर पुढे म्हणाले, भारत हा देश आहे, हे नरेंद्र मोदींमुळेच जगाला कळले! आपल्या अशा बोलभांडपणामुळे दानवे यापूर्वी अडचणीतही आलेले आहेत. नुकत्याच झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीत त्यांनी मतदारांना ‘लक्ष्मीदर्शन’ घेण्याचा सल्ला दिला होता. त्यावरून निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावली होती. त्यामुळे किमान आतातरी ते सांभाळून बोलतील अशी अपेक्षा होती. पण रावसाहेबांना कोण अडविणार? तसेही ते जालना जिल्ह्यात ‘चकवा’ म्हणूनच ओळखले जातात. त्यामुळे ते कधीकोणाला चकवा देतील, याचा थांगपत्ता लागत नाही. कदाचित त्यांच्या या गुणविशेषामुळेच त्यांना अमित शहा यांनी भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक केली असावी! भावाची पाठराखणराष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे संवेदनशील युवानेत्या म्हणून ओळखल्या जातात, तर त्यांचे चुलतबंधू अजितदादा यांचा स्वभाव नेमका उलट. ठाकरे, मुंडे, मोहिते आदी राजकीय घराण्यांमध्ये भाऊबंदकी झाली असली तरी बारामतीचे पवार घराणे मात्र त्यास अपवाद ठरले. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अजित पवार,सुप्रिया सुळे राजकारणात सक्रिय आहेत. आता तिसरी पिढीही राजकारणात येऊ घातली आहे. शरद पवारांचा राजकीय वारसा नेमका कोण चालविणार, असा प्रश्न जेव्हा उपस्थित केला जातो, त्यावेळी ‘आम्ही दोघंही’ असं उत्तर सुप्रियाताई देतात. त्यावरून त्यांच्यातील ‘अंडरस्टँडिंग’ दिसून येतं. अजितदादांवर ज्यावेळी आरोप झाले, त्यावेळी सुप्रिया यांनीच त्यांची पाठराखण केली. परवा त्यांना दादांच्या स्वभावाबद्दल छेडलं असता, माझ्या भावाला तुम्ही ओळखलंच नाहीत. दादा माझ्यापेक्षा दहापटीने इमोशनल आहे. लोक उगीच गैरसमज पसरवितात. स्पष्टवक्तेपणा आणि फटकळपणा, यातील फरकच काही लोकांना कळत नाही.एवढंच काय, मुंबईत आम्ही पक्षसंघटना बांधण्यात कमी पडलो, अशी कबुलीही दिली. मागे एकदा भाषणात त्यांनी ‘मी नागिण आहे, माझ्या वाट्याला जाऊ नका’, असा इशारा दिला होता. त्यावर त्या म्हणाल्या, मुख्यमंत्री कुंडल्या काढणार म्हणाले होते, त्यावेळी भाषणाच्या ओघात नागिन असं संबोधलं. मुख्यमंत्री माझी कुंडली काढणार असतील, तर मी नाही ऐकून घेणार !