शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

प्रचारफेरी

By admin | Updated: February 18, 2017 01:58 IST

विदर्भवीर आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींचे भाषण म्हणजे, आकड्यांचा खेळ आणि शब्दांची नागपुरी भेळ. नितीनभौ, तसेही आरपार बोलण्याबद्दल प्रसिद्ध.

नितीनभौ लई भारी!विदर्भवीर आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींचे भाषण म्हणजे, आकड्यांचा खेळ आणि शब्दांची नागपुरी भेळ. नितीनभौ, तसेही आरपार बोलण्याबद्दल प्रसिद्ध. कोणाची भीडभाड, मुलाहिजा आणि तमा न बाळगता दे धडक, बेधडक बोलून मोकळे होतात. विशेषत: राजकारणी, अधिकारी आणि पत्रकार हे तर त्यांची खास गिऱ्हाईकं. त्यामुळे नितीनभौचं भाषण म्हटलं की, सगळ्यांचेच कान टवकारले जातात. मुंबई महापालिकेच्या रणसंग्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकटेच किल्ला लढवित होते. त्यामुळे नितीनभौ कुठंय, अशी विचारणा होत होती. शेवटी काल पार्ल्यात त्यांची सभा झाली. ‘पैसा कमावणं हा काही गुन्हा नाही, पण राजकारण हा पैसे कमावण्याचा मार्ग नाही. मी फोकनाड नाही, नुसती घोषणा करत नाही तर कामं पण करतो.’ असं नितीनभौ यांनी सांगताच पार्लेकर मंडळींमध्ये कानकुन सुरू झाली. ‘फोकनाड म्हणजे काय हो?’ असं प्रत्येकजण एकमेकांना विचारत होता. तेवढ्यात भौ नी दुसरा टाकला, ‘टक्क्यानंच मुंबईचा घात केला!’ नितीनभौंच्या शब्दांचे अर्थ शोधण्यासाठी पार्लेकर मंडळी कालपासून डिक्सनरी घेऊन बसलेत म्हणे!रावसाहेबांचा जावईशोध!विख्यात अर्थतज्ज्ञ, भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि सलग दहा वर्ष देशाचे पंतप्रधानपद भूषविलेले डॉ. मनमोहन सिंग यांना कोणी ओळखत नव्हते, असा जावईशोध भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी लावला आहे. रावसाहेब तेवढ्यावरच थांबले नाहीत, तर पुढे म्हणाले, भारत हा देश आहे, हे नरेंद्र मोदींमुळेच जगाला कळले! आपल्या अशा बोलभांडपणामुळे दानवे यापूर्वी अडचणीतही आलेले आहेत. नुकत्याच झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीत त्यांनी मतदारांना ‘लक्ष्मीदर्शन’ घेण्याचा सल्ला दिला होता. त्यावरून निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावली होती. त्यामुळे किमान आतातरी ते सांभाळून बोलतील अशी अपेक्षा होती. पण रावसाहेबांना कोण अडविणार? तसेही ते जालना जिल्ह्यात ‘चकवा’ म्हणूनच ओळखले जातात. त्यामुळे ते कधीकोणाला चकवा देतील, याचा थांगपत्ता लागत नाही. कदाचित त्यांच्या या गुणविशेषामुळेच त्यांना अमित शहा यांनी भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक केली असावी! भावाची पाठराखणराष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे संवेदनशील युवानेत्या म्हणून ओळखल्या जातात, तर त्यांचे चुलतबंधू अजितदादा यांचा स्वभाव नेमका उलट. ठाकरे, मुंडे, मोहिते आदी राजकीय घराण्यांमध्ये भाऊबंदकी झाली असली तरी बारामतीचे पवार घराणे मात्र त्यास अपवाद ठरले. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अजित पवार,सुप्रिया सुळे राजकारणात सक्रिय आहेत. आता तिसरी पिढीही राजकारणात येऊ घातली आहे. शरद पवारांचा राजकीय वारसा नेमका कोण चालविणार, असा प्रश्न जेव्हा उपस्थित केला जातो, त्यावेळी ‘आम्ही दोघंही’ असं उत्तर सुप्रियाताई देतात. त्यावरून त्यांच्यातील ‘अंडरस्टँडिंग’ दिसून येतं. अजितदादांवर ज्यावेळी आरोप झाले, त्यावेळी सुप्रिया यांनीच त्यांची पाठराखण केली. परवा त्यांना दादांच्या स्वभावाबद्दल छेडलं असता, माझ्या भावाला तुम्ही ओळखलंच नाहीत. दादा माझ्यापेक्षा दहापटीने इमोशनल आहे. लोक उगीच गैरसमज पसरवितात. स्पष्टवक्तेपणा आणि फटकळपणा, यातील फरकच काही लोकांना कळत नाही.एवढंच काय, मुंबईत आम्ही पक्षसंघटना बांधण्यात कमी पडलो, अशी कबुलीही दिली. मागे एकदा भाषणात त्यांनी ‘मी नागिण आहे, माझ्या वाट्याला जाऊ नका’, असा इशारा दिला होता. त्यावर त्या म्हणाल्या, मुख्यमंत्री कुंडल्या काढणार म्हणाले होते, त्यावेळी भाषणाच्या ओघात नागिन असं संबोधलं. मुख्यमंत्री माझी कुंडली काढणार असतील, तर मी नाही ऐकून घेणार !