शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

ठाणे बँकेत पदोन्नतीत गैरव्यवहार?

By admin | Updated: July 7, 2017 04:01 IST

तब्बल सात हजार कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीमध्ये गैरव्यवहार

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : तब्बल सात हजार कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करून कथित भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्याची मागणी पालघरच्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नीलेश सांबरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, बँकेत सर्वपक्षीय संचालक मंडळ आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा एककलमी कार्यक्रम राबवून १४० कर्मचाऱ्यांची पदोन्नती केली. यात सहकार आयुक्त आणि मंत्रीमहोदयांच्या नावाखाली प्रत्येक कर्मचाऱ्याकडून पाच लाखांची लाच घेतल्याचा त्यांचा आरोप आहे. यात संचालक दोन ते तीन, अध्यक्ष पाच, उपाध्यक्ष पाच, लोकप्रतिनिधी तथा आजी माजी दोन अशा जागा वाटप करून पैसे महाव्यवस्थापकांकडे जमा ेकरावे. या पदोन्नती रद्द करून यातील कथित भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत १०१ कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या संवर्गातील पदोन्नती या रीतसर मुलाखती घेऊन तसेच पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करूनच केल्या आहेत. बँकेच्या बाहेरील काही राजकीय आकसापोटी हे तथ्यहीन आरोप केले आहेत. त्यामुळे या आरोपांमध्ये कोणतीही तथ्यता नाही.- राजेंद्र पाटील, अध्यक्ष, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, ठाणे