शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

शाळाबाह्य मुलांसाठीचा उपक्रम थंडावला

By admin | Updated: June 24, 2017 03:48 IST

राज्यातील प्रत्येक मुलाला शिक्षण मिळायला हवे. कोणीही वंचित राहता कामा नये, त्यामुळे शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार गेल्या

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यातील प्रत्येक मुलाला शिक्षण मिळायला हवे. कोणीही वंचित राहता कामा नये, त्यामुळे शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार गेल्या काही वर्षापासून मोहीम राबवत आहे. पण, आता ही मोहीम थंडावली असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केले आहे. ही प्रक्रिया पुन्हा सुरू करावे, असे निवेदन कुलकर्णी यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे दिले आहे. या निवेदनानुसार, पटनोंदणी पंधरवडा १५ जून ते ३० जून या काळात असतो. या काळात जास्तीत जास्त शाळाबाह्य मुले शाळेत दाखल करणे शक्य आहे. यासाठी तालुकानिहाय याद्या करण्याची सूचना केली आहे, तर २०१५-१६ या वर्षात जी ४ सर्वेक्षण झाली त्या सर्वात जवळपास ७४ हजार विद्यार्थी सापडले. किमान त्या संख्येवर अधिकाऱ्यांचे एकमत आहे. ती संख्येची तालुकानिहाय विभागणी करावी व तशा याद्या कराव्यात, असे मत त्यांनी व्यक्त केले. राज्यातील स्वयंसेवी संस्थांची लवकरात लवकर बैठक घ्यावी. या बैठकीत त्या-त्या संस्थांनी त्यांच्या परिसरात शोधलेल्या मुलांची यादी घ्यावी व ती नावे त्या-त्या जिल्हा तालुका यादीत समाविष्ट करावी, असे नमूद केले आहे. गेल्या वर्षी ही प्रक्रिया थंडाविल्याचे मत कुलकर्णी यांनी व्यक्त करत शिक्षणमंत्र्यांना नुकतेच एक निवेदन दिले आहे.