शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

राज्यात तिळाचे उत्पादन घटले

By admin | Updated: January 15, 2016 01:54 IST

मकर संक्रातीत तिळाचा गोडवा शेंगदाण्याला; तीळ ३0 रुपयांनी महाग.

ब्रम्हानंद जाधव/मेहकर (बुलडाणा): राज्यात तीळ उत्पादनाचे क्षेत्र ३.७९७ लाख हेक्टर असून, तिळाच्या तुलनेत शेंगदाण्याचे उत्पादन दुप्पट म्हणजे ६.६११ लाख हेक्टर झाले आहे. यावर्षी तिळाचे उत्पादन घटले असून, बाजारातही तिळापेक्षा शेंगदाण्याची आवक ५0 टक्क्यांपेक्षा जास्त आहे; त्यामुळे मकर संक्रातीच्या पर्वावर तीळगुळात शेंगदाण्याचा वापर करण्याकडे महिलांचा कल असल्याने 'तीळगुळ' ऐवजी 'शेंगदाणा गुळ' ही नवी संकल्पना तयार होत आहे. 'तीळगुळ' म्हटलं की प्रत्येकालाच मकर संक्रात आठवते. बाजारात मकर संक्रातीच्या पर्वावर तीळ खरेदी करण्यासाठी ग्राहकांचीही मोठय़ा प्रमाणात गर्दी वाढते; परंतू गत पाच वर्षापासून तिळाच्या उत्पादनाकडे शेतकर्‍यांनी पाठ फिरविल्याने राज्यात तीळाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घटत आहे. राज्यात सुमारे ३.७९७ लाख हेक्टर क्षेत्रावर तिळाचे उत्पादन घेतले जाते. त्यापासून 0.७७५ लाख मेट्रीक टन उत्पादन मिळून तिळाचे उत्पादन २0५ प्रति हेक्टर होते. हे पीक राज्यातील चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा व नांदेड जिल्ह्याच्या काही भागात अर्ध रब्बी हंगामातही घेतले जाते. जळगाव, धुळे, लातूरबरोबरच पश्‍चिम वर्‍हाडातील बुलडाणा, अकोला व वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामात तीळाचे उत्पादन घेतात. विदर्भाच्या काही भागात हे पीक उन्हाळ्यातसुद्धा घेतले जाते. तिळाचे सलग पीक अथवा मिश्रपीक घेतात. खाद्यतेलाव्यतिरिक्त मसाला, रेवडी यासाठी तिळाचा उपयोग होतो. त्यापेक्षाही मकरसंक्रातीला तिळगुळासाठी तिळाची सर्वाधिक मागणी होते; परंतू तिळाचे उत्पादन घटल्याने बाजारातही तिळाची आवक कमी प्रमाणात दिसत आहे. तीळ उत्पादनाच्या तुलनेत शेंगदाण्याचे क्षेत्र दुपटीने वाढले आहे. राज्यातील ६.६११ लाख हेक्टर क्षेत्रावर शेंगदाण्याचे उत्पादन घेतले जाते. त्यामध्ये राज्यात ५.९९९ लाख टन उत्पादन शेंगदाण्याचे होत आहे. बाजारात तिळाच्या तुलनेत शेंगदाण्याची आवक ५0 टक्के जास्त असल्याने महिला मकर संक्रातीच्या पर्वावर तीळ घेण्याऐवजी शेंगदाण्यास पसंती देत आहेत. त्यामुळे मकर संक्रातीमधील 'तीळ गुळ' ही संकल्पना 'शेंगदाना गुळ' मध्ये परिवर्तीत होत आहे.व-हाडात ७२५ हेक्टरवर तीळपश्‍चिम वर्‍हाडातील शेतकर्‍यांनी तीळ उत्पादनाकडे पाठ फिरवल्याने तीळाचे उत्पन्नात मोठय़ा प्रमाणावर घट झाली आहे. खरीप हंगामात पश्‍चिम वर्‍हाडातील अकोला जिलत ७१0 हेक्टर क्षेत्रावर तीळ पिकाचे उत्पन्न घेण्यात आले आहे. बुलडाणा जिलत केवळ १0 हेक्टर क्षेत्रावर तीळ पीक घेण्यात आले आहे. सर्वात कमी वाशिम जिलत केवळ ५ हेक्टर क्षेत्रावरच तीळ पिकाचे उत्पन्न घेण्यात आले आहे. पश्‍चिम वर्‍हाडात केवळ ७२५ हेक्टर क्षेत्रावरच तीळ पीक घेतल्याने बाजारात तिळाचा तुटवडा जाणवत आहे.